शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 09:03 IST

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय.

कोल्हापूर - शिवसेना नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील आलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग त्या पद्धतीने सुरू नसल्याने खऱ्या अर्थानं मृत्युच्या कळा आमच्या लोकांना येत आहेत. 2005 च्या तुलनेत या नैसर्गिक आपत्तीचा विचार केल्यास, बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रसासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, असे म्हणत माने यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.  

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. बोटीमध्ये बसताना लोकं घाबरतायेत, एकट्या कोल्हापुरात 20 बोटी काम करत होत्या. मात्र, शिरोळ तालुक्यात जिथं हजारो लोकं अडकलेत तिथं केवळ 20 बोटी. हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा आहे. मी स्वत:पासून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. पण, प्रशासनाचे खऱ्या अर्थाने कान उघडण्याचे, कान उपटण्याची गरज आहे, अशा शब्दात धैर्यशील माने यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

आमचा एखाद जरी माणूस दगावला तरी, त्याला 100 टक्के आम्हीच कारणीभूत आहोत, असे म्हणत माने यांनी सरकारी यंत्रणाही फोल ठरत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या माणसं जगवणं, त्यांचा जीव वाचवणं हीच प्राथमिकता आहे. त्यानंतर, काय अनुदान द्यायचं, कसं सावरायचं हे पाहता येईल. इचलकरंजी, शिरोळ तालुक्यात अद्यापही पाण्याची पातळी वाढतेय. घरातील लोकं मदतीच्या बोटीची वाट पाहत बसले आहेत. अन्नधान्य संपलंय, केवळ धैर्यशील माने एकटा काहीही करू शकत नाही. प्रशासनाने गंभीर भूमिका घेणं गरजेच असून कलेक्टर ऑफिस शिरोळ तालुक्यात आणलं पाहिजे, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले. 

आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग हवा तेवढा नसल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल, विसर्ग आपला 435 आणि आलमट्टीचा विसर्ग 460 एवढं आहे. म्हणजे केवळ 25 चा डिफरन्स ? 25 च्या या डिफरन्समध्ये आमची गावं बुडून जातील ना. दोन राज्यांचा हा लवाद आहे, दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून किती विसर्ग करायचा हे ठरवावं. त्यांची बुडतील म्हणून जर आमची बुडवत असतील तर पुढं, इथं माझ्या मतदारसंघातून नक्षलवादी जर आलमट्टीच्या धरणामध्ये तयार झाले तर, त्याला शासन जबाबदार आहे, असं माझं प्रामाणिक मत असल्याचा तीव्र संताप धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, कोल्हापूर येथील पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली असली तरी, अद्यापही सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. नागरिकांना मदतीचा हात हवाय, राज्यभरातून मदत मिळतेय, तरीही आणखी मदतीची गरज आहे.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदारKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊस