शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

... 'तर माझ्या मतदारसंघातून आलमट्टीच्या धरणात नक्षलवादी तयार झाल्यास शासनच जबाबदार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 09:03 IST

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय.

कोल्हापूर - शिवसेना नेते आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी आलमट्टी धरणातून विसर्ग वाढविण्याची मागणी केली आहे. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील आलमट्टी धरणाच्या पाण्याचा विसर्ग त्या पद्धतीने सुरू नसल्याने खऱ्या अर्थानं मृत्युच्या कळा आमच्या लोकांना येत आहेत. 2005 च्या तुलनेत या नैसर्गिक आपत्तीचा विचार केल्यास, बारा पट अधिक पाऊस पडला आहे. प्रसासनाच्या नियोजनात चूक आहे म्हणजे आहेच, असे म्हणत माने यांनी सरकार आणि प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.  

कित्येक गावात गेलेल्या बोटी पंक्चर होत्या. कित्येक बोटींचं मॅकेनिज्म बिघडलेलं पाहायला मिळतंय. बोटीमध्ये बसताना लोकं घाबरतायेत, एकट्या कोल्हापुरात 20 बोटी काम करत होत्या. मात्र, शिरोळ तालुक्यात जिथं हजारो लोकं अडकलेत तिथं केवळ 20 बोटी. हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा आहे. मी स्वत:पासून, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वांनी याची जबाबदारी स्विकारली पाहिजे. पण, प्रशासनाचे खऱ्या अर्थाने कान उघडण्याचे, कान उपटण्याची गरज आहे, अशा शब्दात धैर्यशील माने यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. 

आमचा एखाद जरी माणूस दगावला तरी, त्याला 100 टक्के आम्हीच कारणीभूत आहोत, असे म्हणत माने यांनी सरकारी यंत्रणाही फोल ठरत असल्याची खंत व्यक्त केली आहे. सध्या माणसं जगवणं, त्यांचा जीव वाचवणं हीच प्राथमिकता आहे. त्यानंतर, काय अनुदान द्यायचं, कसं सावरायचं हे पाहता येईल. इचलकरंजी, शिरोळ तालुक्यात अद्यापही पाण्याची पातळी वाढतेय. घरातील लोकं मदतीच्या बोटीची वाट पाहत बसले आहेत. अन्नधान्य संपलंय, केवळ धैर्यशील माने एकटा काहीही करू शकत नाही. प्रशासनाने गंभीर भूमिका घेणं गरजेच असून कलेक्टर ऑफिस शिरोळ तालुक्यात आणलं पाहिजे, असेही धैर्यशील माने यांनी म्हटले. 

आलमट्टी धरणातून होणारा विसर्ग हवा तेवढा नसल्याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल, विसर्ग आपला 435 आणि आलमट्टीचा विसर्ग 460 एवढं आहे. म्हणजे केवळ 25 चा डिफरन्स ? 25 च्या या डिफरन्समध्ये आमची गावं बुडून जातील ना. दोन राज्यांचा हा लवाद आहे, दोन्ही राज्यांनी एकमेकांशी चर्चा करून किती विसर्ग करायचा हे ठरवावं. त्यांची बुडतील म्हणून जर आमची बुडवत असतील तर पुढं, इथं माझ्या मतदारसंघातून नक्षलवादी जर आलमट्टीच्या धरणामध्ये तयार झाले तर, त्याला शासन जबाबदार आहे, असं माझं प्रामाणिक मत असल्याचा तीव्र संताप धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, कोल्हापूर येथील पूरस्थिती काही प्रमाणात ओसरली असली तरी, अद्यापही सांगलीतील पूरस्थिती कायम आहे. नागरिकांना मदतीचा हात हवाय, राज्यभरातून मदत मिळतेय, तरीही आणखी मदतीची गरज आहे.   

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाMember of parliamentखासदारKolhapur Floodकोल्हापूर पूरRainपाऊस