शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

रासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:21 AM

गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला.

ठळक मुद्देरासायनिक खतांची दरवाढ मागे न घेतल्यास मंत्र्यांना गाव बंदकिसान कॉँग्रेसचा इशारा

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यांचा भुर्दंड शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत बसतोय. त्यामुळे सरकारने तत्काळ ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा मंत्र्यांना गावबंदी केली जाईल, असा इशारा अखिल भारतीय किसान कॉँगे्रसतर्फे शुक्रवारी देण्यात आला. याबाबतचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, ‘किसान सन्मान योजना’ ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टाच आहे. शेताच्या बांधावर वस्तुस्थिती पाहता प्रतिमहिना ५०० रुपयांनी काय दिलासा मिळणार आहे? त्यातच रासायनिक खतांच्या दरात ५० रुपये किलोंच्या बॅगमागे १०० ते २०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसत आहे. ‘जीएसटी’च्या घोळात ऐन खरिपात किमती वाढविल्या. फेब्रुवारी २०१८ मध्ये संयुक्त खतांच्या किमतीत १३४ रुपयांपर्यंत वाढ झाली.

आॅक्टोबर २०१८ मध्ये इंधन दरवाढीमुळे १०५ ते २५० रुपये प्रतिबॅग अशी घसघशीत वाढ झाली. आताही संयुक्त खतांच्या किमतीत १०० ते २१७ रुपयांची दरवाढ करून शेतकऱ्यांना शॉक दिला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीचा पर्याय निवडला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक बाजू कमकुवत असताना दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.शिष्टमंडळात संपत पाटील, गजानन पाटील, तानाजी मोरे, योगेश हातलगे, सुशांत मगदूम, निवास भारमल, राजेश घाटगे, सत्यजित पाटील, निवास शेट्टे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीcongressकाँग्रेस