शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

Child marriage in kolhapur: साखरपुडा म्हणून बालविवाह उरकला, पोलिसांचीच दिशाभूल; इचलकरंजीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:17 IST

मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले

कोल्हापूर : इचलकरंजी येथील १७ वर्षीय मुलीचा रविवारी सायंकाळी साखरपुडा म्हणून बालविवाह उरकण्यात आला. पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर मुला-मुलीच्या पालकांनी आम्ही मुलीचा फक्त साखरपुडा करणार होतो, तोदेखील करणार नाही, असे खोटे सांगितले. मात्र, सोमवारी मुलीला बालकल्याण समितीसमोर सादर केल्यानंतर तिने आपला बालविवाह झाल्याचे सांगितले.इचलकरंजी येथील १७ वर्षे ६ महिने वय असलेली ही मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. आई परगावी असते, वडील नाहीत. या मुलीचे रविवारी लग्न होणार असल्याची याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांना समजली. त्यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांना कळविले. सायंकाळी ६ वाजता पोलीस घटनास्थळी गेले त्याआधीच कुटुंबीयांना याची कल्पना आली होती. त्यांनी आधीच मुलीचे लग्न उरकले.पोलीस आल्यावर त्यांना आम्ही मुलीचा साखरपुडा करणार होतो, पण आता तुम्ही बालविवाह कायद्याची माहिती दिल्याने साखरपुडादेखील करणार नाही, असे खोटे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलीस निघून गेले. सोमवारी सकाळी मुलीला पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आले. तेथे समुपदेशनासाठी आलेले अवनी जागर प्रकल्पाचे समन्वयक प्रमोद पाटील यांनी कायद्याची माहिती देऊन मुलीला, मुलाला व पालकांना बालकल्याण समितीसमोर सादर केले.येथे मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने रविवारी आपला बालविवाह झाल्याचे सांगितले. बालकल्याण समितीच्या वतीने याबाबतचा अहवाल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठवून पालकांवर गुन्हा नोंद करण्याची शिफारस करण्यात येईल, त्यानुसार पुढील कार्यवाही होईल.

मुलगी आजीच्या ताब्यात

मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला सासरी पाठविले जाणार नाही, असे तिची आजी व आईकडून लिहून घेण्यात आले आहे. तसेच दर महिन्याला तिला बालकल्याण समितीसमोर हजर करावे लागणार आहे. हे बंधपत्र लिहून घेतल्यानंतर मुलीला आजीच्या ताब्यात देण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस