शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

औटघटकेची त्रिशंकू बारावी लोकसभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 01:04 IST

- वसंत भोसले अकराव्या लोकसभेत बहुमत कोणालाही मिळाले नाही. भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर काँग्रेस दुसऱ्या ...

- वसंत भोसलेअकराव्या लोकसभेत बहुमत कोणालाही मिळाले नाही. भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढे आला, तर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होता. या दोन्ही पक्षांची आघाडी होणे शक्य नव्हते. पर्यायाने केवळ ४६ जागा जिंकणाऱ्या जनता दलास अनेक प्रादेशिक पक्ष आणि डाव्या आघाडीने पाठबळ दिले. शिवाय काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला. त्याच्या जोरावर पंतप्रधान पदाच्या चर्चेत नसलेले कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. देवेगौडा यांची पंतप्रधानपदी निवड झाली. तत्पूर्वी माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना विचारणा झाली. त्यांनी नकार दिला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांना सर्वांनी पसंती दर्शविली; मात्र त्यांच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांना पंतप्रधानपद स्वीकारण्यास विरोध केला. या सर्व घडामोडीत देवेगौडा पंतप्रधान झाले. त्यांची कारकिर्द वादग्रस्त नसली, तरी कामगिरीही फारशी चांगली नव्हती. भारतीय कम्युनिस्ट पक्ष सरकारमध्ये सहभागी असला तरी नव्या आर्थिक नीतीला मागे घेण्यात आले नाही. याउलट तीच आर्थिक नीती स्वीकारण्यात आली. हे सरकार काँग्रेसच्या पाठिंब्यावर चालले होते. या पक्षातही अंतर्गत गटबाजीला ऊत आला होता. पी. व्ही. नरसिंहराव यांना पक्षाध्यक्षपदावरून बाजूला करण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. परिणामी, सीताराम केसरी यांच्याकडे अध्यक्षपद आले. त्यांनी देवेगौडा यांना हटविण्याचा प्रयत्न चालविला, जेणेकरून इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन पंतप्रधान होण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही. मात्र, देवेगौडा यांना बाजूला व्हावे लागले आणि परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल यांची पंतप्रधानपदी निवड झाली. ते केवळ सात महिनेच टिकले. कारण काँग्रेसचे सीताराम केसरी अधीर झाले होते. त्यात यश आले नाही, तेव्हा त्यांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकारला राजीनामा द्यावा लागला. पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागले.भारतीय जनता पक्षाने गत दोन निवडणुकांत सर्वांत मोठा पक्ष होऊन चांगले यश मिळविले होते. बाराव्या लोकसभेसाठी ६० कोटी ५९ लाख ८० हजार १९२ मतदारांपैकी ६१.९७ टक्के मतदारांनी मतदान केले. अकरावी लोकसभा ही सर्वांत कमी कालावधीची ठरली होती. देशाचे सरकार अस्थिर करण्याच्या जनता दल आणि काँग्रेसच्या धोरणांने मतदार नाराज झाले होते. या निवडणुकीत भाजपने ३८८ जागा लढवून १८२ जागा जिंकल्या. काँग्रेसला १४१ जागा मिळाल्या. जनता दलाची वाताहत झाली. या पक्षाला केवळ सहा जागा मिळाल्या. प्रादेशिक पक्षांनी १५० जागा जिंकून पुन्हा एकदा आपले महत्त्व अधोरेखित केले होते. त्यात तेलुगू देशम, आण्णा द्रमुक, अकाली दल, आदींचा मोठा वाटा होता.या सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर अटलबिहारीवाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील पुन्हा एकदा भाजपचे सरकार आले. १९९६ मध्ये वाजपेयी यांचे सरकार केवळ तेरा दिवस टिकले होते. अनेक छोट्या-छोट्या पक्षांच्या पाठबळावर हे सरकार किती दिवस टिकणार हा सवाल कायम होताच. या सरकारचे आता तेरा महिने झाले आणि अण्णा द्रमुकने पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे १९९९च्या मध्यावर पुन्हा एकदा देशाचे राजकारण अस्थिर झाले. वाजपेयी सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. आणि केवळ एका मताने या सरकारचा पराभव झाला. वाजपेयी यांनी त्वरित राजीनामा देऊन मतदारांचा कौल पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. इतर पक्षांची आघाडी होत नव्हती. राष्ट्रपतींनी लोकसभा बरखास्त करून निवडणुकांना सामोरे जाण्याचा पर्याय निवडला. १९९६, १९९८ आणि पुन्हा १९९९ अशा तीन वर्षांत तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुका घेण्याची वेळ आली. बारावी लोकसभाही औटघटकेची ठरली.उद्याच्या अंकात ।वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार, कार्यकालही पूर्ण!