शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Ambeohal project: ‘आंबेओहळ’चे पाणी आले; बांधापर्यंत पोहोचणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:11 IST

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे.

राम मगदूम

गडहिंग्लज : गेल्या जूनपासून आंबेओहळ प्रकल्पात पाणीसाठ्याला सुरुवात झाली आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी आंबेओहळमध्ये सोडण्यात येणारे पाणी १७ किलोमीटर लांबीच्या ओढ्यावर ठिकठिकाणी बांधलेल्या ७ बंधाऱ्यांत तुंबविले जाणार आहे; परंतु शेतकऱ्यांनी ते पाणी स्व:खर्चाने उचलायचे आहे. त्यामुळे अल्प भू-धारक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते कसे पोहोचणार ? असा सवाल विचारला जात आहे.

शेतकऱ्यांनी सहकारी किंवा स्व:खर्चाने उपसा जलसिंचन योजना राबवून लाभक्षेत्रातील अधिकाधिक पाण्याचा लाभ घ्यावा, असे शासनाचे धोरण आहे; परंतु वर्षभरात एकही सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन झालेली नाही. शिवाय, वैयक्तिक सिंचनासाठीही शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही.

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाबरोबरच ‘टेंभू’ योजनेप्रमाणे सरकारी उपसा सिंचन योजना राबविण्याची गरज आहे.

गावनिहाय लाभक्षेत्र हेक्टरमध्ये व १७ मेअखेरच्या पाणी परवान्यांची संख्या कंसात

आर्दाळ ११३ (१३), करपेवाडी ४६ (४), महागोंड ३२ (१), चव्हाणवाडी ४६ (०), महागोंडवाडी ३८ (१), हालेवाडी ५२ (२), पेंढारवाडी ४६ (१), वडकशिवाले ४१ (०), मुमेवाडी १७६ (६), उत्तूर ६५७ (३), होन्याळी ६३ (४), गडहिंग्लज, वडरगे व बड्याचीवाडी ८२९ (०), बेकनाळ १७६ (०), बेळगुंदी २३ (०), करंबळी २६१ (०), शिप्पूर ४४ (०), लिंगनूर २२९ (१), गिजवणे २२२ (०), अत्याळ १५४ (१), जखेवाडी ७५ (०), कडगाव ६०२ (१)

  • प्रकल्पाची क्षमता १२४० द.ल.घ.फू.
  • एकूण लाभक्षेत्र - ३९२५ हेक्टर
  • आजअखेरचे पाणी परवाने - ३८
  • एकूण क्षेत्र - ३१२ हेक्टर
  • शिल्लक क्षेत्र - ३६१३

समन्यायी पाणी वाटप आणि पाण्याच्या उत्पादक वापरासाठी नव्या चळवळीची गरज आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि तारळी योजनेप्रमाणे गडहिंग्लज विभागातही सरकारी उपसा सिंचन योजनांची गरज आहे. त्यांच्या देखभालीची जबाबदारी सहकारी पाणी पुरवठा संस्थांकडे देता येईल, असे झाले तरच आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी मिळेल. - कॉ. संपत देसाई, कार्याध्यक्ष श्रमीक मुक्ती दल महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणी