शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

Ambeohal project: ‘आंबेओहळ’चे पाणी आले; बांधापर्यंत पोहोचणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:11 IST

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे.

राम मगदूम

गडहिंग्लज : गेल्या जूनपासून आंबेओहळ प्रकल्पात पाणीसाठ्याला सुरुवात झाली आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी आंबेओहळमध्ये सोडण्यात येणारे पाणी १७ किलोमीटर लांबीच्या ओढ्यावर ठिकठिकाणी बांधलेल्या ७ बंधाऱ्यांत तुंबविले जाणार आहे; परंतु शेतकऱ्यांनी ते पाणी स्व:खर्चाने उचलायचे आहे. त्यामुळे अल्प भू-धारक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते कसे पोहोचणार ? असा सवाल विचारला जात आहे.

शेतकऱ्यांनी सहकारी किंवा स्व:खर्चाने उपसा जलसिंचन योजना राबवून लाभक्षेत्रातील अधिकाधिक पाण्याचा लाभ घ्यावा, असे शासनाचे धोरण आहे; परंतु वर्षभरात एकही सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन झालेली नाही. शिवाय, वैयक्तिक सिंचनासाठीही शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही.

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाबरोबरच ‘टेंभू’ योजनेप्रमाणे सरकारी उपसा सिंचन योजना राबविण्याची गरज आहे.

गावनिहाय लाभक्षेत्र हेक्टरमध्ये व १७ मेअखेरच्या पाणी परवान्यांची संख्या कंसात

आर्दाळ ११३ (१३), करपेवाडी ४६ (४), महागोंड ३२ (१), चव्हाणवाडी ४६ (०), महागोंडवाडी ३८ (१), हालेवाडी ५२ (२), पेंढारवाडी ४६ (१), वडकशिवाले ४१ (०), मुमेवाडी १७६ (६), उत्तूर ६५७ (३), होन्याळी ६३ (४), गडहिंग्लज, वडरगे व बड्याचीवाडी ८२९ (०), बेकनाळ १७६ (०), बेळगुंदी २३ (०), करंबळी २६१ (०), शिप्पूर ४४ (०), लिंगनूर २२९ (१), गिजवणे २२२ (०), अत्याळ १५४ (१), जखेवाडी ७५ (०), कडगाव ६०२ (१)

  • प्रकल्पाची क्षमता १२४० द.ल.घ.फू.
  • एकूण लाभक्षेत्र - ३९२५ हेक्टर
  • आजअखेरचे पाणी परवाने - ३८
  • एकूण क्षेत्र - ३१२ हेक्टर
  • शिल्लक क्षेत्र - ३६१३

समन्यायी पाणी वाटप आणि पाण्याच्या उत्पादक वापरासाठी नव्या चळवळीची गरज आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि तारळी योजनेप्रमाणे गडहिंग्लज विभागातही सरकारी उपसा सिंचन योजनांची गरज आहे. त्यांच्या देखभालीची जबाबदारी सहकारी पाणी पुरवठा संस्थांकडे देता येईल, असे झाले तरच आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी मिळेल. - कॉ. संपत देसाई, कार्याध्यक्ष श्रमीक मुक्ती दल महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणी