शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Ambeohal project: ‘आंबेओहळ’चे पाणी आले; बांधापर्यंत पोहोचणार कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 13:11 IST

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे.

राम मगदूम

गडहिंग्लज : गेल्या जूनपासून आंबेओहळ प्रकल्पात पाणीसाठ्याला सुरुवात झाली आहे. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यासाठी आंबेओहळमध्ये सोडण्यात येणारे पाणी १७ किलोमीटर लांबीच्या ओढ्यावर ठिकठिकाणी बांधलेल्या ७ बंधाऱ्यांत तुंबविले जाणार आहे; परंतु शेतकऱ्यांनी ते पाणी स्व:खर्चाने उचलायचे आहे. त्यामुळे अल्प भू-धारक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ते कसे पोहोचणार ? असा सवाल विचारला जात आहे.

शेतकऱ्यांनी सहकारी किंवा स्व:खर्चाने उपसा जलसिंचन योजना राबवून लाभक्षेत्रातील अधिकाधिक पाण्याचा लाभ घ्यावा, असे शासनाचे धोरण आहे; परंतु वर्षभरात एकही सहकारी पाणीपुरवठा संस्था स्थापन झालेली नाही. शिवाय, वैयक्तिक सिंचनासाठीही शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद दिसत नाही.

केवळ धनदांडग्यांनीच उपसा योजना राबविल्या, तर राज्यातील अन्य धरणाप्रमाणे आंबेओहळवरही पाण्याची सावकारी निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळण्यासाठी समन्यायी पाणी वाटपाबरोबरच ‘टेंभू’ योजनेप्रमाणे सरकारी उपसा सिंचन योजना राबविण्याची गरज आहे.

गावनिहाय लाभक्षेत्र हेक्टरमध्ये व १७ मेअखेरच्या पाणी परवान्यांची संख्या कंसात

आर्दाळ ११३ (१३), करपेवाडी ४६ (४), महागोंड ३२ (१), चव्हाणवाडी ४६ (०), महागोंडवाडी ३८ (१), हालेवाडी ५२ (२), पेंढारवाडी ४६ (१), वडकशिवाले ४१ (०), मुमेवाडी १७६ (६), उत्तूर ६५७ (३), होन्याळी ६३ (४), गडहिंग्लज, वडरगे व बड्याचीवाडी ८२९ (०), बेकनाळ १७६ (०), बेळगुंदी २३ (०), करंबळी २६१ (०), शिप्पूर ४४ (०), लिंगनूर २२९ (१), गिजवणे २२२ (०), अत्याळ १५४ (१), जखेवाडी ७५ (०), कडगाव ६०२ (१)

  • प्रकल्पाची क्षमता १२४० द.ल.घ.फू.
  • एकूण लाभक्षेत्र - ३९२५ हेक्टर
  • आजअखेरचे पाणी परवाने - ३८
  • एकूण क्षेत्र - ३१२ हेक्टर
  • शिल्लक क्षेत्र - ३६१३

समन्यायी पाणी वाटप आणि पाण्याच्या उत्पादक वापरासाठी नव्या चळवळीची गरज आहे. लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि तारळी योजनेप्रमाणे गडहिंग्लज विभागातही सरकारी उपसा सिंचन योजनांची गरज आहे. त्यांच्या देखभालीची जबाबदारी सहकारी पाणी पुरवठा संस्थांकडे देता येईल, असे झाले तरच आर्थिक दुर्बल शेतकऱ्यांनाही हक्काचे पाणी मिळेल. - कॉ. संपत देसाई, कार्याध्यक्ष श्रमीक मुक्ती दल महाराष्ट्र

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणी