शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, खासदार विशाल पाटील यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:15 IST

निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते आहेत का?

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पारदर्शीपणे झाल्या नसून लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या सहा महिन्यांत राज्यात ५० लाख मतदार वाढले कसे, असा सवाल सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी शनिवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्याविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली. यानंतर खासदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.विशाल पाटील म्हणाले, २०१९ ची व २०२४ ची निवडणूक या पाच वर्षांत ५ लाख मतदार वाढले होते. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक कालावधीत ५० लाख मतदार वाढले कसे, याची माहिती आयोगाने द्यावी. विधानसभा मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजेनंतर वाढलेली ७६ लाख मते संशयास्पद आहेत. ही मते कशी वाढली, याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकलेला नाही.

गाफील राहिलो त्यामुळे पराभवनिवडणुकीच्या कालावधीत भाजप मतदारवाढीसाठी प्रयत्न करत होते. यावेळी काँग्रेसने दक्ष राहणे गरजेचे होते. मात्र, त्या काळात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. शिवाय लोकसभा निवडणुकीच्या यशामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही गाफील राहिल्याने विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याची कबुलीही खासदार पाटील यांनी दिली.आयुक्त भाजप कार्यकर्ते आहेत का?सध्याचे निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. ईव्हीएमविरोधात पुरावे गोळा करत असून त्यानंतरही ही लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल वेगळा असेलजिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस ताकतीने उतरणार असून, हा निकाल काँग्रेसच्या बाजूने असेल, असा विश्वासही विशाल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvishal patilविशाल पाटीलElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा