शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्याची जबाबदारी सरकारचीच : डॉ. बुधाजीराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:03 IST

परदेशातील ब्राझील, अमेरिकेसारखी राष्ट्रे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखतात, अडचणीच्या वेळी नुकसानीचा भार स्वत: सहन करतात, भविष्यातील बाजारपेठेचा अंदाज धरून उत्पादनाचे प्रमाण ठरवतात. आपल्याकडे मात्र नेमके याच्या उलटे आहे. आपल्याला कवडीभर मदत देऊन त्याचा आकडा मोठा करून सांगण्यातच राज्यकर्ते धन्यता मानतात. आजच्या घडीला साखरेचे अतिरिक्त उत्पन्न, रखडलेली निर्यात, यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने स्वत:हून मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्याची जबाबदारी सरकारचीच : डॉ. बुधाजीराव मुळीककोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप

कोल्हापूर : परदेशातील ब्राझील, अमेरिकेसारखी राष्ट्रे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखतात, अडचणीच्या वेळी नुकसानीचा भार स्वत: सहन करतात, भविष्यातील बाजारपेठेचा अंदाज धरून उत्पादनाचे प्रमाण ठरवतात. आपल्याकडे मात्र नेमके याच्या उलटे आहे. आपल्याला कवडीभर मदत देऊन त्याचा आकडा मोठा करून सांगण्यातच राज्यकर्ते धन्यता मानतात. आजच्या घडीला साखरेचे अतिरिक्त उत्पन्न, रखडलेली निर्यात, यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने स्वत:हून मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.शुक्रवारी दुपारी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात डॉ. मुळीक यांनी केंद्रीय संकल्पात शेतीसाठी केलेल्या तरतुदींवर भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रेस क्लब अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर उपस्थित होते.साखर उद्योगावर डॉ. मुळीक बोलत होते. ते म्हणाले, साखर ही जर जीवनावश्यक वस्तू असेल, तर अत्यावश्यक बाब म्हणून मदतही याच उद्योगाला प्राधान्याने मिळायला हवी. ६५ टक्के साखर ही उद्योगासाठी, तर केवळ ३५ टक्के घरगुती वापरासाठी उपयोगात येत असेल, तर साखरेची किंमतही दुहेरीच असायला हवी. उद्योगासाठीच्या साखरेची किंमत जास्तच हवी.

परदेशातील साखर उद्योगाची माहिती देताना मुळीक म्हणाले, सरकार शेतीत स्वत: पैसे गुंतवते. साखरेचे उत्पादन वाढणार असेल आणि दर पडणार असतील, तर त्याचे इथेनॉल करायचे, की साखर हे आधीच सरकारने ठरवलेले असते, त्याप्रमाणे धोरण राबवली जातात. आपल्याकडे मात्र अतिरिक्त उत्पन्न झाल्यावर काय करायचे याची चर्चा सुरू होती. सरकारकडे मदत मागण्याची वेळ कारखान्यांना येते; पण तरीही सरकार मदत देत नाही.दरमहा ५00 रुपयांसारखी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकण्यापेक्षा उसाला उत्पादनावर आधारित दर जाहीर करावा. तो आजच्या घडीला टनाला ४ हजार रुपयांपर्यंत जाईल. मिळालेल्या पैशातून शेतकरी आपल्या गरजा भागवेल, सरकारकडे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही, असेही मुळीक यांनी सांगितले.साखर कारखान्यावर नियंत्रण ठेवणारी देश व राज्यभरात एकच यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे, तरीही प्रत्येक कारखान्याचा उत्पादन खर्च वेगवेगळा कसा, याचा शोध घेण्याची गरज आहे, असेही डॉ. मुळीक यांनी सांगितले.

पैशाऐवजी साखर देणे मूर्खपणाचेगाळलेल्या उसापायी पैसे देता येत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना साखर घ्या म्हणणे हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. यातून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. याच्या अंमलबजावणीची प्रक्रियाही अवघडच आहे, असे प्रयोग कोणी करूनये, असा सल्लाही डॉ. मुळीक यांनी दिला.

दरमहा ५00 रुपये ही फसवणूकचदोन हेक्टरसाठी दरमहा ५00 प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयावर टीका करताना मुळीक यांनी ५00 रुपयांत काय येते, अशी विचारणा केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणाराच आहे. खातेफोड केलेली नसल्यामुळे तर याचा प्रत्यक्षात लाभ मिळणेही अवघडच आहे. त्यासाठी आधी सरकारने खातेफोड करून घेण्यासाठीचा कायदा सुलभ करावा. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर