शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

अडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्याची जबाबदारी सरकारचीच : डॉ. बुधाजीराव मुळीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 17:03 IST

परदेशातील ब्राझील, अमेरिकेसारखी राष्ट्रे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखतात, अडचणीच्या वेळी नुकसानीचा भार स्वत: सहन करतात, भविष्यातील बाजारपेठेचा अंदाज धरून उत्पादनाचे प्रमाण ठरवतात. आपल्याकडे मात्र नेमके याच्या उलटे आहे. आपल्याला कवडीभर मदत देऊन त्याचा आकडा मोठा करून सांगण्यातच राज्यकर्ते धन्यता मानतात. आजच्या घडीला साखरेचे अतिरिक्त उत्पन्न, रखडलेली निर्यात, यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने स्वत:हून मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअडचणीतील साखर उद्योगाला मदत करण्याची जबाबदारी सरकारचीच : डॉ. बुधाजीराव मुळीककोल्हापूर प्रेस क्लबतर्फे वार्तालाप

कोल्हापूर : परदेशातील ब्राझील, अमेरिकेसारखी राष्ट्रे शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून धोरणे आखतात, अडचणीच्या वेळी नुकसानीचा भार स्वत: सहन करतात, भविष्यातील बाजारपेठेचा अंदाज धरून उत्पादनाचे प्रमाण ठरवतात. आपल्याकडे मात्र नेमके याच्या उलटे आहे. आपल्याला कवडीभर मदत देऊन त्याचा आकडा मोठा करून सांगण्यातच राज्यकर्ते धन्यता मानतात. आजच्या घडीला साखरेचे अतिरिक्त उत्पन्न, रखडलेली निर्यात, यामुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत सरकारने स्वत:हून मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.शुक्रवारी दुपारी कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात डॉ. मुळीक यांनी केंद्रीय संकल्पात शेतीसाठी केलेल्या तरतुदींवर भाष्य केले. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रेस क्लब अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष समीर मुजावर उपस्थित होते.साखर उद्योगावर डॉ. मुळीक बोलत होते. ते म्हणाले, साखर ही जर जीवनावश्यक वस्तू असेल, तर अत्यावश्यक बाब म्हणून मदतही याच उद्योगाला प्राधान्याने मिळायला हवी. ६५ टक्के साखर ही उद्योगासाठी, तर केवळ ३५ टक्के घरगुती वापरासाठी उपयोगात येत असेल, तर साखरेची किंमतही दुहेरीच असायला हवी. उद्योगासाठीच्या साखरेची किंमत जास्तच हवी.

परदेशातील साखर उद्योगाची माहिती देताना मुळीक म्हणाले, सरकार शेतीत स्वत: पैसे गुंतवते. साखरेचे उत्पादन वाढणार असेल आणि दर पडणार असतील, तर त्याचे इथेनॉल करायचे, की साखर हे आधीच सरकारने ठरवलेले असते, त्याप्रमाणे धोरण राबवली जातात. आपल्याकडे मात्र अतिरिक्त उत्पन्न झाल्यावर काय करायचे याची चर्चा सुरू होती. सरकारकडे मदत मागण्याची वेळ कारखान्यांना येते; पण तरीही सरकार मदत देत नाही.दरमहा ५00 रुपयांसारखी तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकण्यापेक्षा उसाला उत्पादनावर आधारित दर जाहीर करावा. तो आजच्या घडीला टनाला ४ हजार रुपयांपर्यंत जाईल. मिळालेल्या पैशातून शेतकरी आपल्या गरजा भागवेल, सरकारकडे मदतीसाठी हात पसरण्याची वेळ येणार नाही, असेही मुळीक यांनी सांगितले.साखर कारखान्यावर नियंत्रण ठेवणारी देश व राज्यभरात एकच यंत्रणा सध्या अस्तित्वात आहे, तरीही प्रत्येक कारखान्याचा उत्पादन खर्च वेगवेगळा कसा, याचा शोध घेण्याची गरज आहे, असेही डॉ. मुळीक यांनी सांगितले.

पैशाऐवजी साखर देणे मूर्खपणाचेगाळलेल्या उसापायी पैसे देता येत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना साखर घ्या म्हणणे हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. यातून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. याच्या अंमलबजावणीची प्रक्रियाही अवघडच आहे, असे प्रयोग कोणी करूनये, असा सल्लाही डॉ. मुळीक यांनी दिला.

दरमहा ५00 रुपये ही फसवणूकचदोन हेक्टरसाठी दरमहा ५00 प्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयावर टीका करताना मुळीक यांनी ५00 रुपयांत काय येते, अशी विचारणा केली. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांची फसवणूक करणाराच आहे. खातेफोड केलेली नसल्यामुळे तर याचा प्रत्यक्षात लाभ मिळणेही अवघडच आहे. त्यासाठी आधी सरकारने खातेफोड करून घेण्यासाठीचा कायदा सुलभ करावा. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर