शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकूळ’मध्ये नेत्यांचा निरोप आला की मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये सत्ताधारी नेत्यांचा निरोप आला की कोणत्याही विषयाला मंजुरी द्यायची, ही पद्धत आहे. यालाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’मध्ये सत्ताधारी नेत्यांचा निरोप आला की कोणत्याही विषयाला मंजुरी द्यायची, ही पद्धत आहे. यालाच आपला विरोध होता. संघाचा हिताचा जरी मुद्दा असला तरी तो कोणी मांडला यालाच महत्त्व दिल्याने गेल्या पाच वर्षात अनेक निर्णय चुकीचे झाले, असा आरोप ‘गोकूळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

‘गोकूळ’चा डोलारा म्हैशीच्या दुधावर आहे, केवळ गायीवर संघ चालला नसता. अलीकडील काळात दूध वाढले, याला कारण संकलन विभाग आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केले. मात्र मार्केटिंगमध्ये खूप मागे राहिलो आहे. भविष्याची वाटचाल म्हणून नेतृत्वाने काहीच करू दिले नाही. आपल्या अध्यक्ष पदाच्या तीन वर्षाच्या कालावधीत संघाच्या प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे, एक लाख लीटर दूध संकलन वाढविले. आनंदराव पाटील-चुयेकर यांचा विचार घेऊन काम केले. मात्र अलीकडे नेत्यांचा निरोप आला की त्यावर चर्चा न करताच मंजुरी देण्याची प्रथा सुरू झाली, त्याला संचालक मंडळातील ८० टक्के लोक हाेय म्हणायचे. आम्ही संघाचे हिताचे विषय मांडले की त्याला दुर्लक्षित करायचे, असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.

बारा लाख संकलन, भरती मात्र २० लाखांची

देशातील अनेक नामवंत दूध संघ कमी कर्मचाऱ्यांवर अतिशय उत्तम सुरू आहेत. पाचशे कर्मचाऱ्यांवर ४० लाख दूध संकलन करणारे संघही आहेत. ‘गोकूळ’मध्ये मात्र १२ लाख दूध संकलन असताना २० लाख लीटर दूध संकलनाएवढी नोकरभरती केल्याचा आरोप डोंगळे यांनी केला.