शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

बाणाने दिग्गज घायाळ

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

गतवेळच्या तुलनेत तीन जागांची भर घालत घवघवीत, दुप्पट यश

प्रवीण देसाई - कोल्हापूर --प्रस्थापितांना धक्का देत शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत सहा जागा काबीज करत जिल्ह्यात भगवा फडकाविला आहे. गतवेळच्या तुलनेत तीन जागांची भर घालत घवघवीत, दुप्पट यश यावेळी शिवसेनेने मिळविले आहे. तरुण, लढाऊ व सर्वसामान्य कार्यकर्ते अशी या विजयी उमेदवारांची ओळख आहे. शिवसेनेच्या ‘बाणा’ने दिग्गजांना घायाळ केले आहे.  -विधानसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी शिवसेनेने चांगले उमेदवार दिले होते. स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय झाल्यानंतरही शिवसेनेला उमेदवारांची वानवा भासली नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील लाट व स्थानिक राजकीय संदर्भातून शिवसेनेने घवघवीत यश मिळविले. कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर, करवीरमधून चंद्रदीप नरके, हातकणंगलेमधून डॉ. सुजित मिणचेकर या विद्यमान आमदारांसह कागलमधून माजी आमदार संजय घाटगे, राधानगरीमधून प्रकाश आबिटकर, शाहूवाडीतून सत्यजित पाटील-सरुडकर, चंदगडमधून नरसिंगराव पाटील, शिरोळमधून पूर्वाश्रमीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सेनापती उल्हास पाटील, इचलकरंजीमधून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, कोल्हापूर दक्षिणमधून जिल्हाप्रमुख विजय देवणे असे तगडे उमेदवार शिवसेनेने दिले होते. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड चुरशीची झाली.क्षीरसागर यांनी काँग्रेसचे उमेदवार सत्यजित कदम यांचा २२,४२१ मतांनी पराभव करीत ‘उत्तर’मध्ये पुन्हा ‘राजेश’ हेच दाखवून दिले. नरके यांनी काँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील यांच्यावर ७१० मतांनी निसटता विजय मिळविला. गतवेळच्या तुलनेत यावेळी पाटील यांनी नरके यांना चांगलाच घाम फोडला. विजयासाठी त्यांना शेवटपर्यंत झुंजावे लागले.डॉ. मिणचेकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा २९ हजार ३७० मतांनी पराभव केला.आबिटकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार के. पी. पाटील यांना ३९ हजार ४०८ इतक्या मतांनी पराभूत केले. त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी उघड पाठिंबा दिला तसेच तरुणाईने त्यांना डोक्यावर घेत निवडणुकीसाठी वर्गणी काढून दिली. सत्यजित पाटील-सरुडकर यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व विद्यमान आमदार विनय कोरे यांच्यावर ३८८ मतांनी निसटता विजय मिळविला. उल्हास पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा २० हजार ३३ मतांनी पराभव करत विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बालेकिल्ल्यात सेनेचा भगवा फडकाविला. संजय घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी कडवी झुंज दिली. त्यांना ५ हजार ९३४ मतांनी मुश्रीफ यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नरसिंगराव पाटील यांना ८ हजार १९९ मतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. जिल्हाप्रमुख असलेले विजय देवणे व मुरलीधर जाधव चमक दाखवू शकले नाहीत. देवणे यांच्या मतदारसंघात कुठलाही वरिष्ठ नेता फिरकला नाही. त्यांच्या सभा किंवा मेळावे या ठिकाणी झाले नाहीत. देवणे यांनी आपल्याच बळावर प्रचारयंत्रणा राबविली. (प्रतिनिधी)