शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गायकवाड कारखान्याची ‘एफआरपी’ मंगळवारपर्यंत, ‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:53 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले साखर सहसंचालक कार्यालयात तासभर ठिय्या

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

संघटनेने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. एफआरपी घेतल्याशिवाय उठणार नसल्याचा दम भरल्यानंतर साखर आयुक्त, सहसंचालक आणि कारखान्याचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी फोनवरच बिले भागविण्याची हमी दिली.या कारखान्यांने २३०० रुपये प्रतिटन याप्रमाणे डिसेंबरअखेरचीच बिले दिली आहेत. हंगाम बंद झाला तरी बिले नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावरच हल्लाबोल केला.

जोरदार घोषणाबाजी करीत कारखान्यावर कारवाई का करीत नाही, कार्यालयाचे नेमके काम काय, दरवेळी आंदोलन केल्यानंतरच यंत्रणा हलणार काय, ‘आरआरसी’च्या कारवाया का थांबविण्यात आल्या, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. प्रशासनातर्फे कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विजय पाटील यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी व आयुक्त स्तरावर कारवाईचे अधिकार असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला; पण संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कारवाईचे लेखी पत्र घेतल्याशिवाय आणि हातात बिले पडल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला.

अखेर तासभर प्रशासनाशी वाटाघाटी केल्यानंतर ५ मार्चपासून बिले जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतरच शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले. आंदोलनात अण्णा मगदूम, तानाजी वठारे, आशिष समगे, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, राजाराम पटील, बाबासो पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, एकनाथ पाटील, एकनाथ पोवार, सागर शंभुशेटे सहभागी झाले.

उर्वरित कारखान्यांनीही थकीत एफआरपी लगेच द्यावी, साखर सहसंचालकांनी तशा सूचना द्याव्यात; नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. येथून पुढे येताना एकेक कारखान्यासाठी येणार नाही, एकदमच येऊन पळता भुई थोडी करीन.भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर