शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

गायकवाड कारखान्याची ‘एफआरपी’ मंगळवारपर्यंत, ‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:53 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले साखर सहसंचालक कार्यालयात तासभर ठिय्या

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

संघटनेने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. एफआरपी घेतल्याशिवाय उठणार नसल्याचा दम भरल्यानंतर साखर आयुक्त, सहसंचालक आणि कारखान्याचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी फोनवरच बिले भागविण्याची हमी दिली.या कारखान्यांने २३०० रुपये प्रतिटन याप्रमाणे डिसेंबरअखेरचीच बिले दिली आहेत. हंगाम बंद झाला तरी बिले नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावरच हल्लाबोल केला.

जोरदार घोषणाबाजी करीत कारखान्यावर कारवाई का करीत नाही, कार्यालयाचे नेमके काम काय, दरवेळी आंदोलन केल्यानंतरच यंत्रणा हलणार काय, ‘आरआरसी’च्या कारवाया का थांबविण्यात आल्या, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. प्रशासनातर्फे कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विजय पाटील यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी व आयुक्त स्तरावर कारवाईचे अधिकार असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला; पण संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कारवाईचे लेखी पत्र घेतल्याशिवाय आणि हातात बिले पडल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला.

अखेर तासभर प्रशासनाशी वाटाघाटी केल्यानंतर ५ मार्चपासून बिले जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतरच शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले. आंदोलनात अण्णा मगदूम, तानाजी वठारे, आशिष समगे, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, राजाराम पटील, बाबासो पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, एकनाथ पाटील, एकनाथ पोवार, सागर शंभुशेटे सहभागी झाले.

उर्वरित कारखान्यांनीही थकीत एफआरपी लगेच द्यावी, साखर सहसंचालकांनी तशा सूचना द्याव्यात; नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. येथून पुढे येताना एकेक कारखान्यासाठी येणार नाही, एकदमच येऊन पळता भुई थोडी करीन.भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर