शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
3
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
4
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
5
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
6
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
7
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
8
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
9
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
10
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
11
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
12
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
13
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
14
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
15
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
16
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
18
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
19
आर्यनच्या सीरिजमध्ये पोलिसाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता कोण? समीर वानखेडेंच्या वादावर म्हणाला..
20
अमानवीय! तुमच्या म्हशी आमच्या शेतात चरायला येतात; शेतकऱ्याचा १२ म्हशींवर कुऱ्हाडीने वार...

गायकवाड कारखान्याची ‘एफआरपी’ मंगळवारपर्यंत, ‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:53 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले साखर सहसंचालक कार्यालयात तासभर ठिय्या

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

संघटनेने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. एफआरपी घेतल्याशिवाय उठणार नसल्याचा दम भरल्यानंतर साखर आयुक्त, सहसंचालक आणि कारखान्याचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी फोनवरच बिले भागविण्याची हमी दिली.या कारखान्यांने २३०० रुपये प्रतिटन याप्रमाणे डिसेंबरअखेरचीच बिले दिली आहेत. हंगाम बंद झाला तरी बिले नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावरच हल्लाबोल केला.

जोरदार घोषणाबाजी करीत कारखान्यावर कारवाई का करीत नाही, कार्यालयाचे नेमके काम काय, दरवेळी आंदोलन केल्यानंतरच यंत्रणा हलणार काय, ‘आरआरसी’च्या कारवाया का थांबविण्यात आल्या, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. प्रशासनातर्फे कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विजय पाटील यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी व आयुक्त स्तरावर कारवाईचे अधिकार असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला; पण संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कारवाईचे लेखी पत्र घेतल्याशिवाय आणि हातात बिले पडल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला.

अखेर तासभर प्रशासनाशी वाटाघाटी केल्यानंतर ५ मार्चपासून बिले जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतरच शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले. आंदोलनात अण्णा मगदूम, तानाजी वठारे, आशिष समगे, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, राजाराम पटील, बाबासो पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, एकनाथ पाटील, एकनाथ पोवार, सागर शंभुशेटे सहभागी झाले.

उर्वरित कारखान्यांनीही थकीत एफआरपी लगेच द्यावी, साखर सहसंचालकांनी तशा सूचना द्याव्यात; नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. येथून पुढे येताना एकेक कारखान्यासाठी येणार नाही, एकदमच येऊन पळता भुई थोडी करीन.भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर