शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

दिवाळीच्या तोंडावर फ्रॉड कॉलद्वारे गंडा, विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचाही वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 17:01 IST

आर्थिक व्यवहार वाढत असल्याने प्रयत्न

कोल्हापूर : मी मुंबई पोलिस बोलतोय, तुमचा मोबाइल क्रमांक बेकायदेशीर असून, ब्लॉक केला जाणार आहे. तुमचा आधार क्रमांक आमच्याकडे आहे. तुमचे बँक डिटेल्स द्या, एफडी कुठे केली आहे ते सांगा, यूपीआयचा वापर केला जातो का, असे नानाविध प्रश्नांचा भडीमार करून फ्रॉड कॉल येण्याचे प्रकार कोल्हापुरात वाढले आहेत. कॉलवरून अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्याशी बोलण्याची भीती घालून बँकेची माहिती, एफडीवरील पैसे वर्ग करण्याचे सांगत सर्वसामान्यांना गंडा घातला जात आहे. दिवाळीमुळे लोकांच्या हातात बोनससह अन्य विविध मार्गाने पैसे येतात हे हेरून अशा कॉलची संख्या वाढली आहे.मंगळवार पेठ परिसरात औषध विक्री करणाऱ्या तरुणाला मुंबई पोलिस बोलतोय, असे सांगून व्हिडीओ कॉल आला. त्यामध्ये कॉल करणारा स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा (TRAI) कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे सिम कार्ड बेकायदेशीर असून, मुंबईतील एका दुकानातून खरेदी केले आहे. तुमचा आधार क्रमांकही माझ्याकडे आहे. या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे, तुम्हाला दोन ते तीन तास बाहेर कोठेही जाता येणार नसल्याचे सांगितले.मुंबई पोलिसांचे ओळखपत्रही संबंधिताने त्याला दाखविले. त्यानंतर त्या तरुणाची तीन तास चौकशी करण्यास सुरुवात केली. गुंतवणूक, खाते क्रमांक आदींचा तपशील विचारला. एफडीमधील पैसे काढून तत्काळ तुमच्या खात्यावर वर्ग करा, अन्यथा तुम्हाला मनी लॉण्ड्रिंगच्या गुन्ह्यात अडकविले जाईल, अशी धमकी दिली. त्यानंतर दोन-तीन जणांनी त्याच्यासोबत संपर्क साधला. त्या तरुणाने ऑनलाइन कोणतेही व्यवहार करत नसल्याचे सांगितले. तो ऐकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक विश्वास नागरे पाटील तुमच्यासोबत बोलणार असल्याचे सांगून एका व्यक्तिला बोलण्यास सांगितले. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार बँकेतील मित्रांना सांगितला. त्यांनी संबंधिताला खडेबोल सुनावल्यानंतर फ्रॉड कॉल बंद झाला.

शुक्रवार पेठेतील एका तरुणाला स्काइप व्हिडीओ कॉल जॉइन करण्यास सांगितले. त्यालाही बॅक डिटेल्स विचारून थोड्यात वेळात ओटीपी येईल, तो तत्काळ देण्याची मागणी केली. मात्र त्या तरुणाने ओटीपी दिला नसल्याने आर्थिक फसवणूक टळली.

कुठे करणार तक्रार?फ्रॉड कॉल आल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनीकडे याविषयीची तक्रार द्या. त्यांच्याकडे त्या क्रमांकाची ओळख पटवा. त्यासह नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार करु शकता. सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करू शकता. जवळच्या पोलिस स्टेशनसह cybercrime.gov.in द्वारे ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी