शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

forest-कोल्हापूरचे वनक्षेत्र साडेनऊ टक्क्यांनी घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:25 IST

वनविभागाने २०१९ चा ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील वनआच्छादन हे सुमारे साडेनऊ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. ही घट अतिशय गंभीर असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहेत.

ठळक मुद्देउपग्रह छायांचित्रांवरून निष्कर्ष ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट’चा अहवाल जाहीर

संदीप आडनाईककोल्हापूर : वनविभागाने २०१९ चा ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट’ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोल्हापुरातील वनआच्छादन हे सुमारे साडेनऊ टक्क्यांनी घटल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते. ही घट अतिशय गंभीर असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी दिली आहेत.कोल्हापूर हे पश्चिम घाटातील महत्त्वाचे जंगलक्षेत्र असून या परिसरातील जंगलाचे क्षेत्र कमी होणे, ही पर्यावरणाची मोठी हानी आहे, असे ते म्हणाले. ‘इंडियाज स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट २०१९’ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील जंगलक्षेत्र हे ९.६८ टक्क्यांनी कमी झाल्याचे आकडेवारी दर्शविते.वृक्षतोड, मानवी हस्तक्षेप, जमिनींचे संपादन, प्राण्यांचा नेहमीचा कॉरिडॉर बंद होणे, जंगलांना लागणारा वणवा आणि मनुष्य-वन्यप्राणी संघर्षाचाही परिणाम जंगलक्षेत्र कमी होण्यामागे असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचाच अर्थ ३३ कोटी वृक्षारोपणाचा कोणताही दृश्य परिणाम झालेला नाही, असा काढता येतो.सन २०१७ ते २०१९ या दोन वर्र्षांतील पाहणीचा हा अहवाल आहे. यामध्ये अतिशय घनदाट, मध्यम आणि खुले वनक्षेत्र अशा तीन प्रकारच्या वर्गवारीच्या नोंदी निरीक्षणासाठी घेतल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत कोल्हापुरातील वनक्षेत्र हे २0१९ च्या डिसेंबरअखेर ९.६८ चौरस किलोमीटर इतके कमी झाल्याचे या अहवालात नोंदविले आहे.जंगल आणि गावातील जागेवर अतिक्रमण होत चालले आहे. माणसांच्या अतिक्रमणापेक्षा बॉक्साईटच्या खाणींचेही अतिक्रमण आहे. गेल्या १० वर्र्षांत या खाणी हळूहळू वाढत चालल्या आहेत. गायरान, पाण्याचे स्रोेत यामुळे नष्ट झाले आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी आणि दाजीपूर ही दोन मोठी अभयारण्ये आहेत. १९८0 पर्यंत ही दोन्ही अभयारण्ये एकच होती. दोन्ही अभयारण्यांचे क्षेत्रफळ ३५१.१६ चौरस किलोमीटर आहे. संरक्षित असूनही गेल्या १० वर्र्षांत या क्षेत्रात प्रचंड जंगलतोड झाली. त्यामुळे त्याचा वातावरणावरही परिणाम झाला आहे. राधानगरी अभयारण्याची ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून नोंद आहे. १९५८ मध्ये दाजीपूर हे गव्यांसाठी राखीव अभयारण्य जाहीर झाले; तर १९८५ मध्ये राधानगरीला अभयारण्याचा दर्जा दिला गेला.पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने घनदाट जंगल असणे महत्त्वाचे आहे. मात्र सर्वत्रच हे जंगल कमी होत चालले आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. खुरट्या जंगलाची आकडेवारी पाहिल्यास हे सिद्ध होते. खुरटे जंगल हे १०२.८३ चौरस किलोमीटर इतके वाढले आहे.

राखीव जंगलांतही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते आहे. इतकेच नव्हे तर राधानगरीसारख्या संरक्षित जंगलालाही वणवा लागतो हे गंभीर आहे. बरेचसे जंगल हे खासगी आहे आणि त्यावर वनखात्याचे नियंत्रण नाही. यासाठी खासगी जंगलही ताब्यात घेण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे. राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप आहे, तो रोखला पाहिजे.चोरटी जंगलतोड मोठ्या प्रमाणात होत आहे. चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा या तीन जिल्ह्यांतील वनक्षेत्र हे संरक्षित केले पाहिजे, अन्यथा जंगल नावालाच उरेल. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडतो; परंतु तेथील सर्वाधिक जंगलक्षेत्र हे खासगी आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे मोठी जंगलतोड वनखात्याच्याच परवानगीने चालते, असा आरोप पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी केला आहे.जंगलाची स्थिती (आकडे स्क्वेअर किलोमीटरमध्ये)

  • भौगोलिक क्षेत्र : ७६८५
  • एकूण जंगल : १७८६.३२
  • घनदाट जंगल : ६४.००
  • मध्यम जंगल : १०२०.४४
  • खुले जंगल : ७०१.८८
  • एकूण घट : ०९.६८
  • भौगोलिक क्षेत्राच्या तलनेत टक्केवारी : २३.२४
  • खुरटे जंगल : १०२.८३

जंगलक्षेत्र कमी होण्याला मानवी हस्तक्षेपच प्रामुख्याने कारणीभूत आहे. राधानगरीसारख््या अभयारण्याला संरक्षित वनाबाबतची अंतिम अधिसूचना अद्यापही निघालेली नाही, यावरूनच सरकार जैवविविधतेच्या बाबतीत किती गंभीर आहे, हे लक्षात येते. पश्चिम घाटाचा समावेश असलेल्या कोल्हापुरातील पश्चिम भागातील आठ तालुक्यांतील जंगल असेच हळूहळू नष्ट होईल, अशी भीती आहे.- डॉ. मधुकर बाचूळकर,पर्यावरण तज्ज्ञ.

टॅग्स :forestजंगलkolhapurकोल्हापूर