शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

पंचगंगेने दिला महापुराचा 'इशारा', कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद; राधानगरी धरण ९० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 14:42 IST

७९ बंधारे पाण्याखाली; ३८ मार्गांवरील वाहतूक ठप्प

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल, साेमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेने इशारा पातळी (४१.२ फूट) ओलांडली. तब्बल ७९ बंधारे आणि ३८ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली गावाजवळ पुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे.राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात ‘वारणा’ धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ हाेत असून, पाणी सांडव्यापर्यंत पोहोचल्याने ‘वारणा’ नदीतील विसर्गही वाढल्याने पाऊस जरी कमी झाला असला तरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून जाेरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रात मात्र अद्याप पाऊस आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून, राधानगरी ९० टक्के तर वारणा ८० टक्के भरले आहे.आठवड्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शनगेली आठ दिवस एकसारखा पाऊस असल्याने ऊन पडलेच नव्हते. सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने दुपारी सूर्यनारायणाने दर्शन दिले.एस.टी.चे सोळा मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस.टी.चे सोळा मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.

असे आहेत मार्ग बंद..राज्य मार्ग - ८प्रमुख जिल्हा मार्ग - १६ग्रामीण मार्ग - १४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीfloodपूर