शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 12:09 IST

शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते.

ठळक मुद्देशिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यूतिघेजण अत्यवस्थ, १९ जखमी

कोल्हापूर/शिरोली : पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या टॅम्पोला दहाचाकी कॅन्टरने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे.  यातील तीन जण अत्यवस्थ अवस्थेत असून सुमारे 19  जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजता पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथे घडला. पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणल्यानंतर या पाचहीजणांवर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी टॅम्पो केला होता. टॅम्पोमध्ये सुमारे ३८ विद्यार्थी होते. सांगलीला परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच टॅम्पो कलंडला. त्याखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.  अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं. 

प्रविण शांताराम तिरलोटकर ((वय २३, रा.टाटा कॉलनी, चेंबूर मुंबई), सुशांत विजय पाटील(वय २२), केतन प्रदीप खोचे (वय २१, दोघे रा. तासगांव, सांगली), अरूण अंबादास बोंडे ((वय २२, रा. रामगाव बुलढाणा), सुमित संजय कुलकर्णी (वय २३, पिरळे , शाहुवाडी) हे पाच तरुण ठार झाले तर मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ आणि तन्मय वडगावकर, हे तिघेजण अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सांगली येथील वालचंद महाविद्यालयातील ४१ विद्यार्थी शिवज्योत आणण्यासाठी रविवारी टॅम्पोमधून गेले होते. रात्री पन्हाळगड येथे ते पोहोचले. पहाटे अडीच वाजता पन्हाळगडावरील शिवमंदिरातून ज्योत घेऊन ते सर्वजण बाहेर पडले. कोडोली-वाठार मार्गे ते महामार्गावरून येत होते. यातील एकजण शिवज्योत घेऊन रस्त्यावरुन धावत होता, तर टॅम्पोमध्ये सुमारे ३८ जण बसले होते. त्यांच्यातील चौघेजण दुचाकीवर बसले होते.

पहाटे साडेचार वाजता शिरोली एमआयडीसी येथील पहिला फाटा , आंबेडकर नगर येथे ते सर्वजण आले असता एका दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे चौघेजण थांबून दुसऱ्या दुचाकीतील पेट्रोल काढत होते. यावेळी मागून आलेला टेम्पोही थांबला. याचवेळी या थांबलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. थांबलेला टेम्पोही उलटला. हा अपघात इतका भयंकर होता की यामधील तीन तरुण जागीच ठार झाले. त्यांचा मेंदू रस्त्यावर पडलेला होता. या अपघातात एकूण पाचजण ठार झाले आहेत.या अपघातात गंभीर जखमी झालेले मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ, तन्मय वडगावकर हे तिघेजण अत्यवस्थ असून प्रणव देशमाने, निलेश तुकाराम बारंगे, धर्मेंद्र पाटील, आदीत्य कोळी, साजीत कनगो, अविनाश रावळ, सुभाष सखर, हर्ष सुभाष इंगळे, प्रणव मुळे, नदीम शेख, संगा शेरपा, रविंद्र नरूटे, शिवकुमार शिराटे, यश रजपुत, ऋषिकेश चव्हाण, गुंडु पटेकरी, प्रतिक सपकाळ, प्रितम सावंत, राहुल शशिकांत सुतार असे एकूण १९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शिरोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मृत सुशांत विजय पाटील 

टॅग्स :AccidentअपघातShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूरSangliसांगली