शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : पन्हाळ्याहून शिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2018 12:09 IST

शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते.

ठळक मुद्देशिवज्योत घेऊन जाताना काळाचा घाला, पाच विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यूतिघेजण अत्यवस्थ, १९ जखमी

कोल्हापूर/शिरोली : पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या सांगली येथील वालचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या टॅम्पोला दहाचाकी कॅन्टरने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यामध्ये सर्वजण महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचे वृत्त समोर आले आहे.  यातील तीन जण अत्यवस्थ अवस्थेत असून सुमारे 19  जण गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात सोमवारी पहाटे साडेचार वाजता पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एमआयडीसी पहिला फाटा आंबेडकर नगर येथे घडला. पन्हाळ्यावरुन शिवज्योत आणल्यानंतर या पाचहीजणांवर काळाने झडप घातली. या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्व विद्यार्थी सांगलीतल्या वालचंद महाविद्यालयातील असून त्यांची ओळख पटविण्यात येत आहे. शिवजयंती निमित्त हे विद्यार्थी पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी टॅम्पो केला होता. टॅम्पोमध्ये सुमारे ३८ विद्यार्थी होते. सांगलीला परतत असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की पुलावरच टॅम्पो कलंडला. त्याखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.  अपघात झाल्याचं कळताच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या जखमींवर उपचार सुरू असून त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतं. 

प्रविण शांताराम तिरलोटकर ((वय २३, रा.टाटा कॉलनी, चेंबूर मुंबई), सुशांत विजय पाटील(वय २२), केतन प्रदीप खोचे (वय २१, दोघे रा. तासगांव, सांगली), अरूण अंबादास बोंडे ((वय २२, रा. रामगाव बुलढाणा), सुमित संजय कुलकर्णी (वय २३, पिरळे , शाहुवाडी) हे पाच तरुण ठार झाले तर मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ आणि तन्मय वडगावकर, हे तिघेजण अत्यवस्थ आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सांगली येथील वालचंद महाविद्यालयातील ४१ विद्यार्थी शिवज्योत आणण्यासाठी रविवारी टॅम्पोमधून गेले होते. रात्री पन्हाळगड येथे ते पोहोचले. पहाटे अडीच वाजता पन्हाळगडावरील शिवमंदिरातून ज्योत घेऊन ते सर्वजण बाहेर पडले. कोडोली-वाठार मार्गे ते महामार्गावरून येत होते. यातील एकजण शिवज्योत घेऊन रस्त्यावरुन धावत होता, तर टॅम्पोमध्ये सुमारे ३८ जण बसले होते. त्यांच्यातील चौघेजण दुचाकीवर बसले होते.

पहाटे साडेचार वाजता शिरोली एमआयडीसी येथील पहिला फाटा , आंबेडकर नगर येथे ते सर्वजण आले असता एका दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे चौघेजण थांबून दुसऱ्या दुचाकीतील पेट्रोल काढत होते. यावेळी मागून आलेला टेम्पोही थांबला. याचवेळी या थांबलेल्या टेम्पोला भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. थांबलेला टेम्पोही उलटला. हा अपघात इतका भयंकर होता की यामधील तीन तरुण जागीच ठार झाले. त्यांचा मेंदू रस्त्यावर पडलेला होता. या अपघातात एकूण पाचजण ठार झाले आहेत.या अपघातात गंभीर जखमी झालेले मुश्ताक मुजावर, प्रतिक संकपाळ, तन्मय वडगावकर हे तिघेजण अत्यवस्थ असून प्रणव देशमाने, निलेश तुकाराम बारंगे, धर्मेंद्र पाटील, आदीत्य कोळी, साजीत कनगो, अविनाश रावळ, सुभाष सखर, हर्ष सुभाष इंगळे, प्रणव मुळे, नदीम शेख, संगा शेरपा, रविंद्र नरूटे, शिवकुमार शिराटे, यश रजपुत, ऋषिकेश चव्हाण, गुंडु पटेकरी, प्रतिक सपकाळ, प्रितम सावंत, राहुल शशिकांत सुतार असे एकूण १९ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. शिरोली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

मृत सुशांत विजय पाटील 

टॅग्स :AccidentअपघातShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजkolhapurकोल्हापूरSangliसांगली