कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:37 IST2025-06-07T12:33:50+5:302025-06-07T12:37:19+5:30
कोल्हापूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी ...

कोल्हापूरच्या पाचजणांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
कोल्हापूर : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजभूषण’ पुरस्कारासाठी कोल्हापुरातील पाचजणांची निवड झाली आहे. शुक्रवारी ही नावे जाहीर करण्यात आली.
दगडू श्रीपती माने - शिरोळ, लालासो आबाजी पोवार - पुनाळ, ता. पन्हाळा, विठ्ठल जोती कदम- श्री कॉलनी गारगोटी, नामदेव दादू कांबळे - शिवाजीनगर, गारगोटी व साताप्पा पुंडलिक कांबळे - बस्तवडे, ता. कागल यांचा समाजभूषण पुरस्कार मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. हे पुरस्कार २०२३-२०२४ सालासाठीचे असून ६० व्यक्ती आणि १० संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती कल्याण, शारीरिक व मानसिकदृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाजकल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा, त्यांच्या कामाची दखल घ्यावी, त्यांच्या कामापासून इतरांना प्रेरणा मिळावी, या हेतूने हा पुरस्कार दिला जातो.