शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

गड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:35 AM

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.

ठळक मुद्देगड किल्ले भाड्याने दिल्यास उग्र आंदोलनकोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा इशारा

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात गडकोट किल्ल्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे; मात्र शासनाने हे किल्ले विकसकांना भाड्याने देण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला डिवचले आहे. हा निर्णय शासनाने त्वरित मागे न घेतल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोमवारी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे.काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत किल्ल्यांची वर्गवारी करून काही किल्ले विकसकांना भाडेतत्वावर देण्याचे ठरले आहे. त्या ठिकाणी हॉटेल, मंगल कार्यालय, लॉज व अन्य व्यवसायाची परवानगी देण्यात येणार आहे.स्वराज्य निर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या शौर्य व बुद्धिमत्तेबरोबरच गनिमी कावा, युद्धनीती व गड-किल्ल्यांची महत्त्वाची साथ लाभली. महाराजांनी किल्ले बांधणीबरोबरच काही किल्ले जिंकून त्यांची डागडुजी करून त्यांचा विकास केला.

हे किल्ले महाराष्ट्राची शान व अस्मिता असून, त्यांचे पावित्र्य व इतिहास चिरंतन राहिले पाहिजे; मात्र शासनाच्या निर्णयामुळे किल्ल्यावर अवैध धंद्याचीही निर्मिती होण्याची शक्यता आहे; त्यामुळे हा अविचारी निर्णय सरकारने त्वरित मागे घ्यावा.

शिष्टमंडळात शहर काँग्रेस अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, संपतराव पाटील, किशोर खानविलकर, तौफिक मुल्लाणी, प्रताप जाधव, मंगल खुडे, रणजित पोवार, उदय चव्हाण, किरण मेथे, संग्राम गायकवाड, संजय पोवार, संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसFortगडkolhapurकोल्हापूर