शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:52 IST

गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आले नाकीनऊ

पोर्ले तर्फ ठाणे : वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेल्या गव्याच्या हल्ल्यात कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.माजगाव परिसरातील तरुणांनी गोंधळ करून गव्याला कसबा ठाण्याच्या डोंगरात हुसकावून लावले होते. बिथरलेल्या गव्याने समोरून येणाऱ्या माणिक पाटील यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा हाकनाक बळी गेला असल्याची चर्चा घटनास्थळी होती. शेतकऱ्यावर हल्ला करून मक्याच्या शेतात बसलेल्या गव्याला बघायला लोकांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,वाघजाई डोंगरावरील कळपातून चुकलेला गवा सातार्डे, पडळ मार्गे रविवारी (दि.२६) सकाळी माजगावाच्या शिवारात दिसला. गव्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. डोंगराच्या दिशेने हुसकावण्यासाठी लोकांनी आरडाओरड करत गोंधळ घातला तसेच दगड आणि काठ्या फेकून मारल्या त्यामुळे गवा बिथरला असल्याचे वनपाल नाथा पाटील यांनी सांगितले.दुपारी गव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने कसबा ठाण्याच्या डोंगराच्या दिशेने घालविले. त्यानंतर डोंगर उतरून गवा कसबा ठाणे गावाच्या शिवारात गेला. दरम्यान माणिक पाटील पायवाटेने वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेला गव्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केला. त्यांना धडक देऊन पोटात शिंग खूपसून जखमी केले. आशिष पाटील आणि सुहास पाटील यांनी जखमी अवस्थेत त्यांना बाहेर आणले माणिक पाटील यांचा उपचारापूर्वीच वाटेत मृत्यू झाला.हकनाक बळीगवे शिवारात किंवा लोकवस्तीत आले की, त्यांना पाहण्यासाठी किंवा हुसकावण्यासाठी लोक गर्दी करतात. वर्षापूर्वी हुसकावताना भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर भुदरगड तालुक्यात शेतकऱ्याचा गव्याच्या धडकेत मृत्यू झाला होता. याचा बोध नसलेल्या माजगाव परिसरातील युवकांनी गव्याच्या पाठी लागून गोंधळ केला आणि त्याला बिथरवले. गव्याचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक युवकांनी त्याच्यामागे जाण्याचा धाडसी प्रयोग केला. सोशल मीडियावर फोटो किंवा चित्रीकरण लवकर टाकण्याची हौस जीवावर बेतण्याची भीती तरुणांत दिसत नव्हती. वनविभागाचे अधिकारी लोकांना समजवून सांगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु माजगावात केलेल्या गोंधळाने कसबा ठाण्यातील शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला.पोर्लेत गव्यांचा कळप आढळलापोर्ले तर्फ ठाणे येथील साळोखे आणि काशिद शिवारात पाच गव्यांचा कळप अन्नाच्या शोधात आला होता. रात्री शिवारात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गवे आढळले. सकाळी त्यांना मार्ग न सापडल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील तीन गवे डोंगराच्या दिशेने गेले, तर दोन गवे उसाच्या शेतात बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूforest departmentवनविभाग