शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:52 IST

गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आले नाकीनऊ

पोर्ले तर्फ ठाणे : वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेल्या गव्याच्या हल्ल्यात कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.माजगाव परिसरातील तरुणांनी गोंधळ करून गव्याला कसबा ठाण्याच्या डोंगरात हुसकावून लावले होते. बिथरलेल्या गव्याने समोरून येणाऱ्या माणिक पाटील यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा हाकनाक बळी गेला असल्याची चर्चा घटनास्थळी होती. शेतकऱ्यावर हल्ला करून मक्याच्या शेतात बसलेल्या गव्याला बघायला लोकांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,वाघजाई डोंगरावरील कळपातून चुकलेला गवा सातार्डे, पडळ मार्गे रविवारी (दि.२६) सकाळी माजगावाच्या शिवारात दिसला. गव्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. डोंगराच्या दिशेने हुसकावण्यासाठी लोकांनी आरडाओरड करत गोंधळ घातला तसेच दगड आणि काठ्या फेकून मारल्या त्यामुळे गवा बिथरला असल्याचे वनपाल नाथा पाटील यांनी सांगितले.दुपारी गव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने कसबा ठाण्याच्या डोंगराच्या दिशेने घालविले. त्यानंतर डोंगर उतरून गवा कसबा ठाणे गावाच्या शिवारात गेला. दरम्यान माणिक पाटील पायवाटेने वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेला गव्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केला. त्यांना धडक देऊन पोटात शिंग खूपसून जखमी केले. आशिष पाटील आणि सुहास पाटील यांनी जखमी अवस्थेत त्यांना बाहेर आणले माणिक पाटील यांचा उपचारापूर्वीच वाटेत मृत्यू झाला.हकनाक बळीगवे शिवारात किंवा लोकवस्तीत आले की, त्यांना पाहण्यासाठी किंवा हुसकावण्यासाठी लोक गर्दी करतात. वर्षापूर्वी हुसकावताना भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर भुदरगड तालुक्यात शेतकऱ्याचा गव्याच्या धडकेत मृत्यू झाला होता. याचा बोध नसलेल्या माजगाव परिसरातील युवकांनी गव्याच्या पाठी लागून गोंधळ केला आणि त्याला बिथरवले. गव्याचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक युवकांनी त्याच्यामागे जाण्याचा धाडसी प्रयोग केला. सोशल मीडियावर फोटो किंवा चित्रीकरण लवकर टाकण्याची हौस जीवावर बेतण्याची भीती तरुणांत दिसत नव्हती. वनविभागाचे अधिकारी लोकांना समजवून सांगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु माजगावात केलेल्या गोंधळाने कसबा ठाण्यातील शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला.पोर्लेत गव्यांचा कळप आढळलापोर्ले तर्फ ठाणे येथील साळोखे आणि काशिद शिवारात पाच गव्यांचा कळप अन्नाच्या शोधात आला होता. रात्री शिवारात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गवे आढळले. सकाळी त्यांना मार्ग न सापडल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील तीन गवे डोंगराच्या दिशेने गेले, तर दोन गवे उसाच्या शेतात बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूforest departmentवनविभाग