शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

Kolhapur News: हुसकावताना गवा बिथरला, हल्ल्यात शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 12:52 IST

गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आले नाकीनऊ

पोर्ले तर्फ ठाणे : वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेल्या गव्याच्या हल्ल्यात कसबा ठाणे (ता. पन्हाळा) येथील शेतकऱ्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. माजी उपसरपंच माणिक बळवंत पाटील (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.माजगाव परिसरातील तरुणांनी गोंधळ करून गव्याला कसबा ठाण्याच्या डोंगरात हुसकावून लावले होते. बिथरलेल्या गव्याने समोरून येणाऱ्या माणिक पाटील यांच्यावर हल्ला केल्याने शेतकऱ्याचा हाकनाक बळी गेला असल्याची चर्चा घटनास्थळी होती. शेतकऱ्यावर हल्ला करून मक्याच्या शेतात बसलेल्या गव्याला बघायला लोकांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगविताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना नाकीनऊ आले.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,वाघजाई डोंगरावरील कळपातून चुकलेला गवा सातार्डे, पडळ मार्गे रविवारी (दि.२६) सकाळी माजगावाच्या शिवारात दिसला. गव्याला हुसकावून लावण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. डोंगराच्या दिशेने हुसकावण्यासाठी लोकांनी आरडाओरड करत गोंधळ घातला तसेच दगड आणि काठ्या फेकून मारल्या त्यामुळे गवा बिथरला असल्याचे वनपाल नाथा पाटील यांनी सांगितले.दुपारी गव्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने कसबा ठाण्याच्या डोंगराच्या दिशेने घालविले. त्यानंतर डोंगर उतरून गवा कसबा ठाणे गावाच्या शिवारात गेला. दरम्यान माणिक पाटील पायवाटेने वैरण आणण्यासाठी जात असताना बिथरलेला गव्याने त्यांच्यावर समोरून हल्ला केला. त्यांना धडक देऊन पोटात शिंग खूपसून जखमी केले. आशिष पाटील आणि सुहास पाटील यांनी जखमी अवस्थेत त्यांना बाहेर आणले माणिक पाटील यांचा उपचारापूर्वीच वाटेत मृत्यू झाला.हकनाक बळीगवे शिवारात किंवा लोकवस्तीत आले की, त्यांना पाहण्यासाठी किंवा हुसकावण्यासाठी लोक गर्दी करतात. वर्षापूर्वी हुसकावताना भुयेवाडी येथील तरुणाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर भुदरगड तालुक्यात शेतकऱ्याचा गव्याच्या धडकेत मृत्यू झाला होता. याचा बोध नसलेल्या माजगाव परिसरातील युवकांनी गव्याच्या पाठी लागून गोंधळ केला आणि त्याला बिथरवले. गव्याचे चित्रीकरण करण्यासाठी अनेक युवकांनी त्याच्यामागे जाण्याचा धाडसी प्रयोग केला. सोशल मीडियावर फोटो किंवा चित्रीकरण लवकर टाकण्याची हौस जीवावर बेतण्याची भीती तरुणांत दिसत नव्हती. वनविभागाचे अधिकारी लोकांना समजवून सांगत असताना, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु माजगावात केलेल्या गोंधळाने कसबा ठाण्यातील शेतकऱ्याचा हकनाक बळी गेला.पोर्लेत गव्यांचा कळप आढळलापोर्ले तर्फ ठाणे येथील साळोखे आणि काशिद शिवारात पाच गव्यांचा कळप अन्नाच्या शोधात आला होता. रात्री शिवारात पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना गवे आढळले. सकाळी त्यांना मार्ग न सापडल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यातील तीन गवे डोंगराच्या दिशेने गेले, तर दोन गवे उसाच्या शेतात बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यूforest departmentवनविभाग