शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

वळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 2:09 PM

अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे.

ठळक मुद्देवळीव बरसला, चिंता मिटली, दमदार पावसाने शेतकरी सुखावलापेरण्यांना सुरुवात, उभ्या पिकाला जीवदान

कोल्हापूर: अडीच महिन्यापासून पाठ फिरवलेल्या पावसाने वायू चक्रीवादळाच्या रुपाने का होईना कोल्हापुरात दमदार एन्ट्री केल्याने बळीराजा सुखावला असून त्याची चिंता कांहीअंशी मिटली आहे. पावसाअभावी भेगाळलेल्या जमिनींचीही तहान भागली आहे. पुरेसा ओलावा झाल्याने मशागत करुन ठेवलेल्या शिवारांमध्ये पेरणीची लगबगही सुरु झाली आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या पिकांसाठी हा पाउस संजीवनी देणारा ठरला आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर आगमन झालेल्या पावसात न्हाउन निघण्याचा आनंद अख्खी सृष्टी अनुभवत आहे.मान्सूनचे आगमन आणखी दोन दिवस लांबणीवर पडले असलेतरी अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण, मुंबई, मध्यमहाराष्ट्रासह दक्षिण महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार, मंगळवारी रात्री तासभर पावसाने चांगली हजेरी लावली.

आभाळ भरुन येत होते, पण जोराचा पाउस पडत नव्हता. बुधवारी सकाळी पावसाला सुरुवात झाल्याने प्रतिक्षा संपल्याचे वाटप असतानाच दुपारी परत उन पडले, पण अधेमधे एखादी येणारी सर दिलासा देउन जात होती. संध्याकाळी साडेपाचनंतर मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली. जवळपास दीडतासाहून अधिक काळ पाउस पडला.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १४५.६२ मिलीमीटर पाउस नोंदवण्यात आला. यात सर्वाधिक ३८ मिलीमीटर पाउस गगनबावड्यात झाला. चंदगडमध्ये २४.३३ तर आजºयात १३ आणि करवीरमध्ये १२. २७ मिलीमीटर तर भूदरगडमध्ये ११ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कागल, हातकणंगले, शिरोळमध्ये सर्वात कमी म्हणजे ३ ते ४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

उर्वरीत तालुक्यात चांगला पाउस झाल्याने शेतकऱ्यांची पिकांची चिंता मिटली आहे. पेरणीयोग्य पाउस असल्याने आणि चार दिवसात मान्सूनचे आगमन होणार असल्याने पेरणी आटोपून घेण्याच्या नियोजनात शेतकरी आहे. भात, सोयाबीन, भूईमुगाच्या पेरण्या आता वेग घेणार आहेत. राने तयार असल्याने आता केवळ टोकण करण्याचे काम शिल्लक राहिले आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर