शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्नाटकात १५ नोव्हेंबरनंतर गळीत हंगाम, सीमाभागातील साखर कारखान्यांना दिलासा 

By राजाराम लोंढे | Updated: September 16, 2024 14:03 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळामुळे कर्नाटकात उसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने दुष्काळामुळे कर्नाटकात उसाचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम १५ नोव्हेंबर नंतरच सुरू करावा, असे आदेश कर्नाटक सरकारने कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या अगोदर हंगाम सुरू होऊन उसाची होणारी पळवापळवी थांबणार असल्याने सीमाभागातील साखर कारखान्यांना काहिसा दिलासा मिळाला आहे.कर्नाटकातील विशेषत: उत्तर भागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १ ऑक्टोबरपासूनच सुरू होतो. महाराष्ट्राच्या अगोदर साधारणत: महिनाभर हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमा भागातील उसाची पळवापळवी होते. त्यामुळे सीमाभागातील साखर कारखान्यांच्या हंगामावर परिणाम होतो.मात्र, गेल्यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटकात पाऊस कमी झाला. कर्नाटकात वार्षिक सरासरीच्या जेमतेम ६० टक्केच पाऊस झाल्याने काही तालुक्यात उसाची लागवड कमी झाली. त्याचा परिणाम यंदाच्या हंगामावर होणार आहे. उसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा गळीत हंगाम १ डिसेंबरला सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू होता. कर्नाटक साखर संघ व सरकार यांनी १५ नोव्हेंबरच्या पुढे हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

उशिरा हंगामाचे फायदे 

  • कमी कालावधीच्या उसात पाण्याचे प्रमाण खूप असते.
  • परिपक्व उसाचे गाळप केल्यास शेतकऱ्यांना वजनही चांगले मिळते.
  • साखर उतारा चांगला मिळाल्याने कारखान्यांचाही फायदा होतो.
  • साधारणत: १३ ते १४ महिन्यांच्या उसाचे गाळप शेतकरी व कारखान्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

मंत्री समितीची बैठक आणि आचारसंहितासाखर हंगामाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची बैठक वेळेत होणे गरजेचे असते. या बैठकीत हंगामाबाबत धोरण ठरवले जाते. कर्नाटक सरकारने हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने १ नोव्हेंबरपासून परवानगी दिली तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकते. मात्र १५ ऑक्टोबरपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू शकते. तत्पूर्वी बैठक घेणे गरजेचे आहे.

कर्नाटक सरकारचा हा निर्णय सीमाभागातील कारखान्यांच्या दृष्टीने फायदेशीर आहे. महाराष्ट्र सरकारने मंत्री समितीची बैठक लवकर घेतली तर कारखान्यांना हंगामाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल. - पी. जी. मेढे (साखर उद्योजक अभ्यासक)

टॅग्स :Karnatakकर्नाटकSugar factoryसाखर कारखाने