शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

आता संध्याकाळपर्यंत कधीही होणार शालेय पोषण आहाराची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 20:31 IST

तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रवीण यादव यांचा निर्णय

कोल्हापूर : जिल्'ातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शालेय पोषण आहाराच्या दर्जाची आता कधीही तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे नूतन शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रोज सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहाराचा नमुना शिल्लक ठेवण्याचे आदेश सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

शाळांमध्ये दिल्या जात असलेल्या पोषण आहाराचा दर्जा चांगला नसल्याची बाब यादव यांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याशी चर्चा करून याबाबत दोघांच्या सहीने परिपत्रक काढले आहे.जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, शिक्षण सभापती व समिती सदस्य यांच्याकडून या पोषण आहाराची कधीही तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आहाराचा नमुना सायंकाळी पाच वाजेपर्यंत शाळेतच ठेवणे बंधनकारक राहणार आहे. आहाराचा दर्जा चांगला नसेल तर संबंधित ठेका रद्द करण्यात येणार आहे. आहारामध्ये वापरण्यात येणारा भाजीपाला, फळे, तांदूळ, कडधान्ये, तेल, पीठ या साहित्याचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे.

स्वयंपाकासाठीची भांडी स्वच्छ असावीत. परिसरामध्येही स्वच्छता असावी. पिण्यासाठीचे पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे. स्थानिक शिक्षण समिती सदस्यांनीही आहार संध्याकाळपर्यंत ठेवला आहे किंवा नाही याची खात्री करावी. तो सायंकाळी पाचनंतर नष्ट करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे. या एकूणच सर्व प्रक्रियेची जबाबदारी मुख्याध्यापकांवर निश्चित करण्यात आली आहे. 

 

शालेय पोषण आहाराच्या दर्जाबाबत बहुतांश जिल्हा परिषद सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा पोषण आहार मिळावा, तेथे स्वच्छता असावी, यासाठी कधीही तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शालेय पोषण आहाराचा दर्जा चांगला राहण्यासाठी मदत होईल.- प्रवीण यादवसभापती, शिक्षण समिती, जिल्हा परिषद, कोल्हापूर 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदPoshan Parikramaपोषण परिक्रमाkolhapurकोल्हापूर