शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

वीस जवान शहीद झाले तरीही धोरण अस्पष्ट : पालकमंत्री पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:51 IST

चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले

ठळक मुद्देवीस जवान शहीद झाले तरीही धोरण अस्पष्ट : पालकमंत्री पाटीलअसा दुर्दैवी पंतप्रधान झाला नाही

कोल्हापूर : चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.कसलेही कारण नसताना चीनने भारतावर हल्ला केला. भारतीय जवानांना मारले. त्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह बोलायला तयार नाहीत. एवढे होऊनही चीनचा साधा उल्लेखही त्यांनी केलेला नाही. पंतप्रधान तर चीनने घुसखोरी केली नाही, असे सांगत आहेत. चीनची वृत्तपत्रे पंतप्रधानांचे कौतुक करू लागली आहेत. त्यामुळे जनता संभ्रमात आहे. म्हणूनच नेमके सत्य बाहेर आले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका, धोरण काय हे कळले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.गलवान परिसर, तेथील सरोवर आपल्या हद्दीत आहे की नाही, याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका सतत बदलत आहे. केवळ दिशाभूल करून विषयांतर करायचे. शहिदांचा विषय बाजूला केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.डोळे कोणी लाल केले?तुम्ही चीनला लाल डोळे दाखविणार होता. नेमके लाल डोळे तुम्ही दाखविले की तुम्हाला त्यांनी दाखविले हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच केंद्र सरकारचे धोरण खरे आहे की खोटे आहे, तेही कळायला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.असा दुर्दैवी पंतप्रधान झाला नाहीकेंद्र सरकारने चीनच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालावा. त्यांची कोणतीही वस्तू घेऊ नये, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी केली. मोदी कोणतीच गोष्ट खरी बोलत नाहीत. केवळ दिशाभूल करीत आहेत. असा दुर्दैवी पंतप्रधान यापूर्वी कधीही झाला नाही, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर