शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वीस जवान शहीद झाले तरीही धोरण अस्पष्ट : पालकमंत्री पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 17:51 IST

चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले

ठळक मुद्देवीस जवान शहीद झाले तरीही धोरण अस्पष्ट : पालकमंत्री पाटीलअसा दुर्दैवी पंतप्रधान झाला नाही

कोल्हापूर : चीनने केलेल्या हल्ल्यात २० जवान शहीद झाले. जागतिक पातळीवर भारताची मोठी नामुष्की झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने चीनबाबतची नेमकी भूमिका तसेच धोरण काय आहे, घडलेल्या प्रकाराबाबतचे नेमके सत्य काय आहे, हे एकदा जनतेला सांगावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले.कसलेही कारण नसताना चीनने भारतावर हल्ला केला. भारतीय जवानांना मारले. त्याबाबत संरक्षणमंत्री राजनाथसिंह बोलायला तयार नाहीत. एवढे होऊनही चीनचा साधा उल्लेखही त्यांनी केलेला नाही. पंतप्रधान तर चीनने घुसखोरी केली नाही, असे सांगत आहेत. चीनची वृत्तपत्रे पंतप्रधानांचे कौतुक करू लागली आहेत. त्यामुळे जनता संभ्रमात आहे. म्हणूनच नेमके सत्य बाहेर आले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका, धोरण काय हे कळले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.गलवान परिसर, तेथील सरोवर आपल्या हद्दीत आहे की नाही, याचे स्पष्टीकरण झाले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका सतत बदलत आहे. केवळ दिशाभूल करून विषयांतर करायचे. शहिदांचा विषय बाजूला केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.डोळे कोणी लाल केले?तुम्ही चीनला लाल डोळे दाखविणार होता. नेमके लाल डोळे तुम्ही दाखविले की तुम्हाला त्यांनी दाखविले हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. म्हणूनच केंद्र सरकारचे धोरण खरे आहे की खोटे आहे, तेही कळायला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.असा दुर्दैवी पंतप्रधान झाला नाहीकेंद्र सरकारने चीनच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घालावा. त्यांची कोणतीही वस्तू घेऊ नये, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी केली. मोदी कोणतीच गोष्ट खरी बोलत नाहीत. केवळ दिशाभूल करीत आहेत. असा दुर्दैवी पंतप्रधान यापूर्वी कधीही झाला नाही, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर