शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

माणूस जंगलात अन् गवे गावात, संघर्ष टाळण्याची गरज

By संदीप आडनाईक | Updated: September 22, 2022 19:14 IST

गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : राधानगरी अभयारण्य परिसरात असलेल्या ग्रामस्थांचा मुख्य प्रश्न आहे, तो गव्यांचा. गव्यापासून होणाऱ्या त्रासांचा आणि नुकसानीचा. गेल्या काही वर्षांपासून गवे वनक्षेत्रापासून जवळच्या मनुष्यवस्तीत व गावांमध्ये शिरून, शेतीचे नुकसान करीत आहेत. माणसांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत. यामुळे गवा-मानव संघर्ष वाढीस लागले आहेत. गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे.अभयारण्यातील कोअर झोनमध्ये काही नैसर्गिक जलसाठे आहेत. जिवंत झरे आहेत. गव्यांसाठी हेच महत्त्वाचे पाण्याचे स्रोत. गव्यांसाठी हेच पाणी आवश्यक असताना या झऱ्यांचे पाणी सायफन पद्धतीने खाली आणून अभयारण्यातील वाड्या-वस्त्यांना, गावांना पुरविले जाते. यामुळे गव्यांना पाणीटंचाईमुळे, पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासातून बाहेर यावे लागते. गव्यांना आवश्यक असलेल्या अन्नाच्या टंचाईमुळेही अन्नाच्या शोधात गव्यांना अधिवासातून बाहेर पडावे लागते.गव्यांचे खाद्य वन विभागानेच टाकले होते जाळून

  • अभयारण्यातील कारवी या वनस्पतींचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने गव्यांचे चराऊ क्षेत्र कमी होत आहे. यामुळे गवे चाऱ्याच्या शोधात त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत, या समजुतीतून कोल्हापूर वन्यजीव विभागाने सन २००९ मध्ये येथील कारवीची तोड करून, कारवी जाळली होती.
  • या चुकीच्या कृतीला निसर्ग अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी आक्षेप घेऊन, कारवीची पुढील तोड थांबवली होती. कारवीची कोवळी पाने गव्यांचे खाद्य आहे, हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. कारवी सात वर्षांनी एकदाच फुलते व नंतर वाळून जाते. यामुळे कारवीची दरवर्षी वाढ होऊन ती वेगाने सर्वत्र पसरते.
  • हा वन विभागाचा समजही शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे, हे पटवून दिले होते. अभ्यासक व तज्ज्ञ समितीने गव्यांच्या खाद्य वनस्पतींबाबत अभ्यास करून त्यांच्या यादीसहित सविस्तर शास्त्रीय अहवाल वन विभागास सादर केला होता.

अभयारण्यात आणि त्याच्या शेजारी असलेली गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी गावाजवळच भाताची व उसाची शेती केली आहे. यामुळे येथील गवे आणि इतर तृणभक्षी वन्यप्राण्यांना हिरवागार चारा वर्षभर उपलब्ध झाल्याने हे सर्व वन्यप्राणी मानवी वस्त्यांतील पिकांचे नुकसान करू लागले. या क्षेत्रातील ग्रामस्थ, त्यांची पाळीव जनावरे, चोरटे शिकारी, हौशी पर्यटक यांचे बेकायदेशीरपणे अभयारण्यात शिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforestजंगल