शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

माणूस जंगलात अन् गवे गावात, संघर्ष टाळण्याची गरज

By संदीप आडनाईक | Updated: September 22, 2022 19:14 IST

गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे.

संदीप आडनाईककोल्हापूर : राधानगरी अभयारण्य परिसरात असलेल्या ग्रामस्थांचा मुख्य प्रश्न आहे, तो गव्यांचा. गव्यापासून होणाऱ्या त्रासांचा आणि नुकसानीचा. गेल्या काही वर्षांपासून गवे वनक्षेत्रापासून जवळच्या मनुष्यवस्तीत व गावांमध्ये शिरून, शेतीचे नुकसान करीत आहेत. माणसांवर जीवघेणे हल्ले करीत आहेत. यामुळे गवा-मानव संघर्ष वाढीस लागले आहेत. गवे आपल्या नैसर्गिक अधिवासातून बाहेर पडण्याची काही कारणे आहेत. हा संघर्ष थांबवण्यासाठी उपाययोजनाची गरज आहे.अभयारण्यातील कोअर झोनमध्ये काही नैसर्गिक जलसाठे आहेत. जिवंत झरे आहेत. गव्यांसाठी हेच महत्त्वाचे पाण्याचे स्रोत. गव्यांसाठी हेच पाणी आवश्यक असताना या झऱ्यांचे पाणी सायफन पद्धतीने खाली आणून अभयारण्यातील वाड्या-वस्त्यांना, गावांना पुरविले जाते. यामुळे गव्यांना पाणीटंचाईमुळे, पाण्याच्या शोधात त्यांच्या अधिवासातून बाहेर यावे लागते. गव्यांना आवश्यक असलेल्या अन्नाच्या टंचाईमुळेही अन्नाच्या शोधात गव्यांना अधिवासातून बाहेर पडावे लागते.गव्यांचे खाद्य वन विभागानेच टाकले होते जाळून

  • अभयारण्यातील कारवी या वनस्पतींचे क्षेत्र दरवर्षी वाढत असल्याने गव्यांचे चराऊ क्षेत्र कमी होत आहे. यामुळे गवे चाऱ्याच्या शोधात त्यांच्या अधिवासातून बाहेर पडत आहेत, या समजुतीतून कोल्हापूर वन्यजीव विभागाने सन २००९ मध्ये येथील कारवीची तोड करून, कारवी जाळली होती.
  • या चुकीच्या कृतीला निसर्ग अभ्यासकांनी व तज्ज्ञांनी आक्षेप घेऊन, कारवीची पुढील तोड थांबवली होती. कारवीची कोवळी पाने गव्यांचे खाद्य आहे, हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. कारवी सात वर्षांनी एकदाच फुलते व नंतर वाळून जाते. यामुळे कारवीची दरवर्षी वाढ होऊन ती वेगाने सर्वत्र पसरते.
  • हा वन विभागाचा समजही शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आहे, हे पटवून दिले होते. अभ्यासक व तज्ज्ञ समितीने गव्यांच्या खाद्य वनस्पतींबाबत अभ्यास करून त्यांच्या यादीसहित सविस्तर शास्त्रीय अहवाल वन विभागास सादर केला होता.

अभयारण्यात आणि त्याच्या शेजारी असलेली गावे, वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांनी गावाजवळच भाताची व उसाची शेती केली आहे. यामुळे येथील गवे आणि इतर तृणभक्षी वन्यप्राण्यांना हिरवागार चारा वर्षभर उपलब्ध झाल्याने हे सर्व वन्यप्राणी मानवी वस्त्यांतील पिकांचे नुकसान करू लागले. या क्षेत्रातील ग्रामस्थ, त्यांची पाळीव जनावरे, चोरटे शिकारी, हौशी पर्यटक यांचे बेकायदेशीरपणे अभयारण्यात शिरण्याचे प्रमाणही वाढले आहे. - डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरणतज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीforestजंगल