शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:11 IST

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा.

विश्वास पाटीलकोल्हापूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाबाबत भाजपने जी रणनीती वापरली, तीच रणनीती कायम ठेवल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक होऊ शकते, असे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. निकाल काही लागो, परंतु मतदारसंघातील पाया मजबूत करायचा असेल तर निवडणूक लढवली पाहिजे, असा विचार देगलूरची पोटनिवडणूक लढविताना झाला. भाजपच्या उमेदवारास ६६ हजार ९७४ मते मिळाली व ज्या मतदारसंघातून कमळ चिन्ह मतपत्रिकेवरून पुसले गेले होते, तिथे भाजप आता दुसऱ्या स्थानावर आला.कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार यासंबंधीची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. भाजपने अजूनही अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. डॉ. प्रज्ञा सातव यांना भाजपने बिनविरोध निवडून दिले. ही जागा आमदारांतून निवडून द्यावयाची होती. तिथे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे तो निकष येथे लागू होत नाही. नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचेच आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने गेल्या महिन्यात तिथे पोटनिवडणूक झाली. अंतापूरकर हे अनुसूचित जातीतील असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव पुढे आला होता.परंतु, या मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली. तिथे भाजपला स्थानच नव्हते. त्यामुळे ही निवडणूक लढविल्यास पक्षाचा पाया भक्कम होईल असा विचार पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर झाला. निकाल काही लागायचा तो लागू दे, परंतु निवडणूक लढवावी असा निर्णय झाला. पक्षाने तिथे शिवसेनेचेच माजी आमदार सुभाष साबणे यांना रात्रीत भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली व त्यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले तरी आता तिथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सुरू झाला असून, शिवसेना मात्र चित्रातून बाजूला फेकली गेली आहे. आगामी विधानसभेचा विचार करता भाजपला असेच राजकारण अपेक्षित आहे.पाचवेळी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत - जी स्थिती देगलूरमध्ये होती, तशीच कोल्हापूर उत्तरमध्येही आहे. येथेही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत मागील पाच निवडणुकीत झाली आहे. फक्त २०१४ मध्येच या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवून महेश जाधव यांनी ४० हजार मते घेतली आहेत.- हा पक्षाचा करिष्मा आहे. आता शिवेसना हा राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेसची उमेदवारी जयश्री जाधव यांना मिळाल्यास त्या पक्षाचा उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता कमी आहे.जानेवारी अखेरीस निवडणूक शक्य.. आमदार जाधव यांचे निधन झाले असून, विधानसभेची कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने विधिमंडळाकडे ३ डिसेंबरला पाठविला आहे. विधिमंडळ आता अधिसूचना काढून केंद्रीय निवडणूक आयोगास ते कळवते. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासोबत जानेवारीच्या अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता आयोगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा