शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:11 IST

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा.

विश्वास पाटीलकोल्हापूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाबाबत भाजपने जी रणनीती वापरली, तीच रणनीती कायम ठेवल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक होऊ शकते, असे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. निकाल काही लागो, परंतु मतदारसंघातील पाया मजबूत करायचा असेल तर निवडणूक लढवली पाहिजे, असा विचार देगलूरची पोटनिवडणूक लढविताना झाला. भाजपच्या उमेदवारास ६६ हजार ९७४ मते मिळाली व ज्या मतदारसंघातून कमळ चिन्ह मतपत्रिकेवरून पुसले गेले होते, तिथे भाजप आता दुसऱ्या स्थानावर आला.कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार यासंबंधीची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. भाजपने अजूनही अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. डॉ. प्रज्ञा सातव यांना भाजपने बिनविरोध निवडून दिले. ही जागा आमदारांतून निवडून द्यावयाची होती. तिथे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे तो निकष येथे लागू होत नाही. नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचेच आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने गेल्या महिन्यात तिथे पोटनिवडणूक झाली. अंतापूरकर हे अनुसूचित जातीतील असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव पुढे आला होता.परंतु, या मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली. तिथे भाजपला स्थानच नव्हते. त्यामुळे ही निवडणूक लढविल्यास पक्षाचा पाया भक्कम होईल असा विचार पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर झाला. निकाल काही लागायचा तो लागू दे, परंतु निवडणूक लढवावी असा निर्णय झाला. पक्षाने तिथे शिवसेनेचेच माजी आमदार सुभाष साबणे यांना रात्रीत भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली व त्यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले तरी आता तिथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सुरू झाला असून, शिवसेना मात्र चित्रातून बाजूला फेकली गेली आहे. आगामी विधानसभेचा विचार करता भाजपला असेच राजकारण अपेक्षित आहे.पाचवेळी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत - जी स्थिती देगलूरमध्ये होती, तशीच कोल्हापूर उत्तरमध्येही आहे. येथेही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत मागील पाच निवडणुकीत झाली आहे. फक्त २०१४ मध्येच या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवून महेश जाधव यांनी ४० हजार मते घेतली आहेत.- हा पक्षाचा करिष्मा आहे. आता शिवेसना हा राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेसची उमेदवारी जयश्री जाधव यांना मिळाल्यास त्या पक्षाचा उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता कमी आहे.जानेवारी अखेरीस निवडणूक शक्य.. आमदार जाधव यांचे निधन झाले असून, विधानसभेची कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने विधिमंडळाकडे ३ डिसेंबरला पाठविला आहे. विधिमंडळ आता अधिसूचना काढून केंद्रीय निवडणूक आयोगास ते कळवते. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासोबत जानेवारीच्या अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता आयोगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा