शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'देगलूर पॅटर्न'वर ठरणार कोल्हापूर पोटनिवडणुकीचे 'उत्तर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2021 12:11 IST

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याची जोरदार चर्चा.

विश्वास पाटीलकोल्हापूर : नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदार संघाबाबत भाजपने जी रणनीती वापरली, तीच रणनीती कायम ठेवल्यास कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक होऊ शकते, असे भाजपच्या वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे. निकाल काही लागो, परंतु मतदारसंघातील पाया मजबूत करायचा असेल तर निवडणूक लढवली पाहिजे, असा विचार देगलूरची पोटनिवडणूक लढविताना झाला. भाजपच्या उमेदवारास ६६ हजार ९७४ मते मिळाली व ज्या मतदारसंघातून कमळ चिन्ह मतपत्रिकेवरून पुसले गेले होते, तिथे भाजप आता दुसऱ्या स्थानावर आला.कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेली जागा बिनविरोध होणार की निवडणूक लागणार यासंबंधीची जोरदार चर्चा कोल्हापुरात आहे. भाजपने अजूनही अधिकृत कोणतेही भूमिका जाहीर केलेली नाही. डॉ. प्रज्ञा सातव यांना भाजपने बिनविरोध निवडून दिले. ही जागा आमदारांतून निवडून द्यावयाची होती. तिथे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे तो निकष येथे लागू होत नाही. नांदेड जिल्ह्यातील देगलूर राखीव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचेच आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने गेल्या महिन्यात तिथे पोटनिवडणूक झाली. अंतापूरकर हे अनुसूचित जातीतील असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी असा प्रस्ताव पुढे आला होता.परंतु, या मतदारसंघात मागील तीन निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत झाली. तिथे भाजपला स्थानच नव्हते. त्यामुळे ही निवडणूक लढविल्यास पक्षाचा पाया भक्कम होईल असा विचार पक्ष नेतृत्वाच्या पातळीवर झाला. निकाल काही लागायचा तो लागू दे, परंतु निवडणूक लढवावी असा निर्णय झाला. पक्षाने तिथे शिवसेनेचेच माजी आमदार सुभाष साबणे यांना रात्रीत भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिली व त्यांनी चांगली लढत दिली. काँग्रेसचे जितेश अंतापूरकर हे विजयी झाले तरी आता तिथे काँग्रेस विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष सुरू झाला असून, शिवसेना मात्र चित्रातून बाजूला फेकली गेली आहे. आगामी विधानसभेचा विचार करता भाजपला असेच राजकारण अपेक्षित आहे.पाचवेळी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत - जी स्थिती देगलूरमध्ये होती, तशीच कोल्हापूर उत्तरमध्येही आहे. येथेही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत मागील पाच निवडणुकीत झाली आहे. फक्त २०१४ मध्येच या मतदारसंघातून भाजपतर्फे निवडणूक लढवून महेश जाधव यांनी ४० हजार मते घेतली आहेत.- हा पक्षाचा करिष्मा आहे. आता शिवेसना हा राज्यातील सत्ताधारी पक्ष असल्याने महाविकास आघाडीतून काँग्रेसची उमेदवारी जयश्री जाधव यांना मिळाल्यास त्या पक्षाचा उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता कमी आहे.जानेवारी अखेरीस निवडणूक शक्य.. आमदार जाधव यांचे निधन झाले असून, विधानसभेची कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली असल्याचा अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने विधिमंडळाकडे ३ डिसेंबरला पाठविला आहे. विधिमंडळ आता अधिसूचना काढून केंद्रीय निवडणूक आयोगास ते कळवते. गोवा, मणिपूर, उत्तराखंड, पंजाब व उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यासोबत जानेवारीच्या अखेरीस ही निवडणूक होण्याची शक्यता आयोगाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा