शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

खाद्यतेल, तिळाचे दर वधारले, भाजीपाला, फळांमध्ये मात्र स्वस्ताई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:53 AM

संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाल्याने बाजार फुलला आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याने बाजारात स्वस्ताईचा माहौल आहे; पण याच वेळी रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देखाद्यतेल, तिळाचे दर वधारले, भाजीपाला, फळांमध्ये मात्र स्वस्ताईसंक्रांतीच्या तोंडावर बाजार फुलला

कोल्हापूर : संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फळे, भाजीपाल्याने बाजार फुलला आहे. आवक वाढल्याने दर घसरल्याने बाजारात स्वस्ताईचा माहौल आहे; पण याच वेळी रोजच्या आहारातील अविभाज्य घटक असलेल्या खाद्यतेलाचे दर मात्र गगनाला भिडत असल्याने गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडण्याची वेळ आली आहे.

शेंगतेल प्रतिकिलो दीडशेकडे कूच करीत असून सरकी, सूर्यफूल या तेलांनीदेखील शंभरी पार केली आहे. अतिवृष्टीमुळे तिळाचे पीक वाया गेल्याचा परिणाम बाजारात दिसत असून, ऐन संक्रांतीला तिळाचा गोडवा महागाईने कडवटपणात बदलला आहे. १०० रुपये किलो असणारा तीळ आता १५० च्याही वर गेला आहे. गूळही ५० ते ५५ रुपयांवर गेला आहे.रविवारी लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात फेरफटका मारला असता हरतऱ्हेच्या भाज्या आणि फळांनी बाजार ओसंडून गच्च भरल्यासारखी परिस्थिती आहे. गवारी आणि भेंडीचे दर केवळ ५० ते ६० रुपये किलो आहेत; अन्यथा सर्वच फळभाज्या २० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत.

कोबी आणि फ्लॉवरची आवक प्रचंड झाल्याने दरही १० ते १५ रुपये गड्डा असा झाला आहे. काकडी आणि गाजरांचे ढीग वाढू लागले आहेत. त्यांचा दरही २० ते ४० रुपये किलो आहे. कोथिंबिरीसह पालेभाज्या १० रुपयांना जुडी असा दर आहे.लहान-मोठ्या आकारांचे तिळगूळ १०० रुपये, तीळवडी व रेवड्या २०० रुपये किलो असा दर झाला आहे. पूजनासाठी लागणारी सुगडीही ५० रुपयांना अर्धा डझन आहेत.

नवीन कांदा-बटाट्याची आवक वाढलीबाजारात नवीन कांदा व बटाट्यांची आवक वाढली आहे. जुना कांदा व बटाटा ४०, तर नवीन ३० रुपये किलो असा दर आहे. आलेही ८० ते ९० रुपये किलोवर आले आहे. लसूण अजूनही १५० रुपयांवर स्थिर आहे. टोमॅटोचे दर १५ रुपये किलो झाले आहेत.संक्रांतीला प्रामुख्याने लागणारा आणि फक्त हिवाळ्यातच खायला मिळणारा ओला हरभरा बाजारात आला आहे. १० रुपयांना दोन डहाळे असा दर आहे.डाळिंबांचे दर घसरलेबाजारात सांगोल्याहून येणारे अ‍ॅपल बोर आणि गणेश डाळिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. २० रुपये किलो असा दर आहे. याशिवाय संत्र्यासारख्या दिसणाऱ्या माल्टाचीही आवक मोठी आहे. ४० ते ५० रुपये असा किलोचा दर आहे.बाजारात सहसा दृष्टीस न पडणारे अंजीर आता मात्र मुबलक प्रमाणात दिसत असल्याने दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. ५० ते ६० रुपये असा किलोचा दर आहे. पपई १० रुपयांना एक नग आहे. सफरचंद ८० ते १२० रुपये किलो आहेत. द्राक्षांचे दरही कमी होऊ लागले आहेत. ५० रुपयांना अर्धा किलो असा दर आहे.डाळींचे दरतूर ९६, उडीद १२०, मसूर ७०, हरभरा ७०, मूग ९६, मसूरा ७०, चवळी ८०, हरभरा ८०, मटकी १२०, मूग ८४ रु. प्रतिकिलो. दर आहेत.

 

 

टॅग्स :Marketबाजारkolhapurकोल्हापूर