शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या नव्या धोरणामुळे यंदा पहिली उचल १६८० रुपयेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST

कोल्हापूर : निती आयोगाला पुढे करून केंद्र व राज्य सरकारने एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचे कारस्थान रचल्याने जिल्ह्यासाठी पहिली उचल ...

कोल्हापूर : निती आयोगाला पुढे करून केंद्र व राज्य सरकारने एफआरपीचे तीन तुकडे पाडण्याचे कारस्थान रचल्याने जिल्ह्यासाठी पहिली उचल टनाला १६८०, तर जिल्ह्याबाहेर १३२० रुपये मिळणार आहे. उर्वरित दोन हप्ते हंगाम संपल्यानंतर मिळणार आहेत. साखर कारखानदारांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना भिकेला लावण्याचा हा व्यापक कट आहे, अशी टीका स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी कोल्हापुरात केली. याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही दिला. याविरोधात रविवारपासून राज्यभर मिसकॉल मोहीम सुरू करत असल्याची घोषणाही त्यांनी केली.

एफआरपीच्या संदर्भात शेट्टी यांनी सर्किट हाउसवर पत्रकार बैठकीत स्वाभिमानीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले कृषिमूल्य आयोगाने ८७ टक्के नफ्याचा दावा करत यंदाची २९०० रुपये प्रतिटन एफआरपी जाहीर केली. १५५० रुपये प्रतिटन उसाचा उत्पादन खर्च गृहीत धरून ही एफआरपी काढली हेच चुकीचे आहे. आता जी एफआरपी जाहीर केली आहे, तीदेखील तीन टप्प्यात द्यावी, अशी शिफारस निती आयोग, कृषिमूल्य आयोगाने केली आहे. त्याला केंद्र व राज्य सरकार दोघांनीही होकार दर्शवला आहे. त्यानुसार पहिली उचल एफआरपीच्या ६० टक्के ऊस तुटल्याच्या १४ दिवसात, २० टक्के उचल दोन महिन्यानंतर, तिसरी २० टक्के उचल ही हंगाम संपल्यानंतर अथवा दुसरा हंगाम सुरू होण्याआधी द्यावी, अशी शिफारस केली. असे केले तर जिल्ह्याचा सरासरी १२ टक्के उतारा गृहीत धरला तर २७०० ते २८०० रुपये एफआरपी बसणार, त्यात ६० टक्केचा निकष लावला तर केवळ १६८० रुपये पहिली उचल मिळणार आहे. यातून उसासाठी घेतलेले कर्जदेखील फिटत नाही. व्याजाचा मात्र १० ते १२ हजारांचा अतिरिक्त बोजा शेतकऱ्यांच्या अंगावर पडणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सावकर मादनाईक, वैभव कांबळे, स्वस्तिक पाटील उपस्थित होते.

चौकट

मोठी राजकीय किंमत चुकवावी लागेल

ऊस उत्पादक शेतकरी राजकीयदृष्ट्या खूप जागरूक असल्याने भविष्यात चार बड्या राजकीय पक्षांना याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, हे माहीत असल्याने उघडपणे न करता चोरी छुपे लादले जात आहे. यावर स्वाभिमानी गप्प राहाणार नाही, कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई नेटाने लढणार आहे, सर्वांची पळताभुई थोडी करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

चौकट

ना रहेगा.. ना बजेगी बासुरी

१८ हजार कोटीची एफआरपी थकवणाऱ्या १४ कारखान्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्याच्या सुनावण्याही सुरू आहेत. न्यायालयाने केंद्राला याबाबत विचारणा केली असता, कारवाईऐवजी केंद्र सरकारने थेट एफआरपी देण्याच्या सूत्रातच बदलाची शिफारस केली आहे. कायदाच मोडला तर थकबाकीच राहणार नाही, मग कारवाईचा प्रश्न नाही असे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी असे सरकारचे धोरण आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.

चौकट

रविवारपासून मिसकॉल्ड मोहीम

तीन टप्प्यात एफआरपी देण्याला विरोध म्हणून १२ ते ३० सप्टेंबरपर्यंत स्वाभिमानी राज्यभर मिसकॉल मोहीम राबवणार आहे. ८४४८१८३७५१ या क्रमांकावर शेतकऱ्यांनी मिसकॉल देऊन सरकारचा एफआरपी मोडण्याचा डाव हाणून पाडावा असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

चौकट

मी आता स्थितप्रज्ञ

विधानपरिषद आमदारकीबाबत विचारले असता, मला आता चर्चेचा कंटाळा आला आहे. मी स्थितप्रज्ञ झालो आहे. नावे असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही, अशी उद्विग्नता शेट्टी यांनी व्यक्त केली. सदाभाऊ खोत यांच्या मुलाने केलेल्या मारहाणीवर बोलताना स्वाभिमानी गप्प बसणार नाही, असा सुचक इशारा दिला.