शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

संप, मंदी, तणावाने वस्त्रनगरीला ग्रासले

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

कुठे आहेत नेते : सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न

इचलकरंजी : कामगारांचा संप, वस्त्रोद्योगात आलेली मंदी, वारंवार निर्माण होणाऱ्या तणावामुळे संवेदनशील शहर म्हणून होणारा लौकिक यामुळे वस्त्रनगरीची प्रगती व विकास खुंटत आहे. अशा स्थितीत शहराचे पुढारीपण करणारे नेतृत्व कुठे आहे, असा प्रश्न उद्योजक, व्यापारी व सर्वसामान्यांना पडला आहे.इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाला शंभराहून अधिक वर्षांची परंपरा असून, येथील कारखानदार व कामगार यांच्या सलोख्याच्या वातावरणामुळे येथील उद्योग-धंद्याची प्रगती झाली. कामगारांना मिळणाऱ्या वेतनात वाढ व्हावी, यासाठी इचलकरंजीत अनेकवेळा आंदोलने झाली. मेळावे, सभा, मोर्चे, धरणे, उपोषण असे अनेकविध प्रकार आंदोलनात अवलंबले गेले; पण त्यावेळच्या कामगार नेत्यांना आंदोलनाची योग्य वेळ जशी समजत होती, तशी आंदोलन तुटेपर्यंत कधीही ताणले गेले नाही. त्यामुळे कॉ. के. एल. मलाबादे यांच्यासारख्या कामगार नेतृत्वाची अद्याप आठवण निघते. तसेच आपल्याला मिळणाऱ्या चार पैशांतील दोन पैसे कामगाराला देण्याची येथील यंत्रमाग कारखानदारांतही प्रवृत्ती आहे.वस्त्रोद्योगात येणारी मंदी वस्त्रनगरीला काही नवीन नाही. मात्र, त्या-त्यावेळी शासनाशी लढा देऊन काही सवलती मिळवत मंदीवर मात करण्याचे बळ त्यावेळी दाखविले गेले. सन २००० नंतर आलेल्या अभूतपूर्व मंदीच्या काळात तत्कालीन आवाडे समितीने वस्त्रोद्योगासाठी २३ कलमी पॅकेजची शिफारस केली आणि शासनाने स्वीकारली, तेव्हा मंदीवर मात तर केलीच; पण यंत्रमाग उद्योगाने त्यातून प्रगती साधली. आता एकूणच वस्त्रोद्योग मंदीच्या संक्रमणात सापडला आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी कुणाकडे पाहावे, अशी स्थिती उद्योग-व्यापारी आणि व्यावसायिकांची झाली आहे.अलीकडील काळात सन २००९ पासून शहरात वारंवार तणाव निर्माण होताना दिसतो आहे. सण, उत्सव, देशात कोठेही होणाऱ्या घातपाताच्या घटना किंवा दंगली यामुळे शहरात तणाव निर्माण होतोय. फलक लागणे किंवा पताका बांधणे यासारख्या किरकोळ घटनाही तणावाला कारणीभूत ठरत आहेत. ज्या परिसरात अशी घटना घडेल, तेथील दुकाने पटापट बंद होतात, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरते. उद्योग-व्यावसायिकांना वित्त-जीविताची भीती वाटू लागते. अशावेळी अगदी गल्लीबोळांतून ते शहराचे पुढारीपण करणारे नेते कुठे गायब होतात, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतो आहे. (प्रतिनिधी)मोठे उद्योजक येत नाहीतइचलकरंजीमध्ये वारंवार होणारे संप आणि तणावाच्या घटना यामुळे गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत शहर व परिसरामध्ये कोणताही मोठा उद्योग आलेला नाही. स्थानिक फाळकूटदादा व स्वत:ला कामगार पुढारी म्हणवून घेणाऱ्यांच्या सतावण्याच्या प्रवृत्तीला कंटाळून बीआरएफएलसारखा बडा उद्योग येथून निघून गेला. वास्तविक पाहता गारमेंट, रेडीमेड आणि प्रोसेसिंग उद्योगामधील मोठे कारखाने उभ्या राहण्यासारख्या पायाभूत सुविधा या परिसरात असतानाही मोठे उद्योजक येथे यायचे धाडस दाखवीत नाहीत, याचाही विचार नेतेमंडळींबरोबरच राजकीय व कामगार क्षेत्रातील पुढाऱ्यांनी करावा, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये आहे.