शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पेयजल योजना वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: December 2, 2014 23:17 IST

शिरढोण, टाकवडेतील योजना : काम अपूर्ण; ग्रामस्थांची गैरसोय

गणपती कोळी - कुरुंदवाड --शिरढोण व टाकवडे गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी दोन्ही गावांच्या नेत्यांनी राजकीय वजन वापरून राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून कामालाही सुरुवात झाली. काम अर्ध्यावर येताच योजनेत कारभाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेणे, एकतंत्री कारभार, ठेकेदारांच्या चुका, काहींची दुखावलेली मने यातून निर्माण झालेल्या आंदोलनामुळे दोन्ही गावांच्या योजना रखडल्या आहेत. सत्ताधारी व विरोधकांच्या जुगलबंदीत ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांचा घसा मात्र पाण्याविना कोरडा राहण्याची शक्यता आहे. दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील शिरढोण व टाकवडे गावाला बसतो. टाकवडेसाठी इचलकरंजी नगरपालिकेकडून पिण्यासाठी फिल्टर झालेले पाणी दिले जाते. मात्र, वाढलेली लोकसंख्या, योजनेला असलेली गळती, अपुरा व अनियमित होत असलेला पाणीपुरवठा यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. ग्रामपंचायतीने पाण्यासाठी कुरुंदवाड येथील कृष्णा नदीतून राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. या योजनेसाठी चार कोटी १६ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर होऊन काम चालू झाले आहे.शिरढोण ग्रामस्थांना पंचगंगेतून पाणीपुरवठा होत असल्यामुळे या दूषित पाण्यापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी या गावानेही स्वतंत्ररीत्या कुरुंदवाड कृष्णा नदीतून चार कोटी ९५ लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून घेतली. दोन्ही गावांच्या स्वतंत्र योजना असल्या, तरी ठेकेदार मात्र एकटाच आहे. योजनेतील त्रुटी, कारभाऱ्यांनी इतरांना विश्वासात न घेतल्यामुळे दुखावलेली मने, ठेकेदारांच्या चुका यातून वाद निर्माण झाला आहे. दोन्ही योजना स्वतंत्र असताना ठेकेदारांनी एकाच चरीतून दोन्ही गावांच्या जलवाहिन्या घातल्या आहेत. ते चुकीचे आहे. यावरून शिरढोणचे माजी सरपंच रमेश ढाले व मधुकर सासणे यांनी उपोषणाचे शस्त्र घेऊन योजना स्वतंत्र केल्याशिवाय काम चालू न करण्याचा इशारा ठेकेदारांना दिला आहे. त्यामुळे गेल्या आठ-दहा दिवसांपासून योजनेचे काम बंद पडले आहे. तर टाकवडेचे माजी सरपंच सुजाउद्दीन मुल्ला, सदाशिव पाटील यांनीही निकृष्ठ दर्जाचे काम निविदेप्रमाणे होत नसल्याचा आरोप करून काम बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला .