शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

खोटा इतिहास सांगू नका; सुरत लुटलीच आहे, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 17:43 IST

त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी एकदा नव्हे तर दोनवेळा सुरतेवर स्वारी करून ती लुटली आहे. त्यामुळे राजकारण्यांनी इतिहास वाचावा, तो खोटा सांगू नये, या शब्दांत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी सुरत लुटीवर भाष्य करणाऱ्यांना मंगळवारी सत्ताधाऱ्यांना चांगलेच खडसावले.कोल्हापुरातील सायबर कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. पवार म्हणाले, मोगलांमुळे आम्हाला पदरी फौजा बाळगाव्या लागतात. त्यामुळे या फौजेच्या देखभालीसाठी शिवाजी महाराज यांनी १६६४ व १६७० अशी दोनवेळा सुरतेवर स्वारी करून १०० कोटी हाेन आणले. त्याच पैशांतून त्यांनी सिंधुदुर्गसारखे किल्ले उभारले. छत्रपतींनी एकूण १११ किल्ले उभारले. सुरत लुटीतून आणलेल्या सर्व पैशांचा त्यांनी विनियोग केल्याकडे डॉ. पवार यांनी लक्ष वेधले. डॉ.पवार म्हणाले, सध्या राजकारण्यांकडून खोटा इतिहास सांगितला जात आहे. त्यांनी तो अभ्यासावा, मात्र, खोटे काही सांगू नये.

आधी सांगून पाहिलेमुळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटण्याआधी तेथील व्यापाऱ्यांना आमच्या फौजेचे खर्च देण्याची विनंती केली. मात्र, त्यांच्या दुतांनी छत्रपतींवरच हल्ला केला. त्यानंतरच महाराज यांनी सुरत लुटली. ही लुटताना त्यांनी आपली नीतीमत्ता सोडली नाही. मोहनदास पारेख नावाच्या व्यापाऱ्याचे निधन झाल्याने त्याचा वाडा जाळायचा नाही, लुटायचा नाही, अशी सक्त ताकीद महाराजांनी मावळ्यांना दिली होती, अशी आठवणही डॉ.पवार यांनी सांगितली.

सूरत लुटली की..या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरत लुटली की नेमके काय झाले? असा सवाल आपल्या भाषणात उपस्थित केला होता. पाटील यांच्या याच भाषणाचा धागा पकडत डॉ. जयसिंगराव पवार यांनी दुसऱ्यांदा भाषणाला उभा राहत सुरत लुटीचा पटच सभागृहासमोर उलगडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSuratसूरतhistoryइतिहास