शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गचे संरक्षण २८ पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 20:54 IST

शहरही बीट अंमलदार विनाच : अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत

वैभव साळकर - दोडामार्ग -‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन आॅन ड्युटी २४ तास जनतेच्या सेवेसाठी हजर असलेल्या दोडामार्ग पोलीस ठाण्यात केवळ २८ एवढ्या अपुऱ्या कर्मचारी वर्गावर अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कुंभवडेपासून ते तेरवणपर्यंत आणि मांगेली-विर्डीपासून ते मोरगावपर्यंत तालुक्यातील ५७ गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखताना पोलिसांची दमछाक होत आहे. एका-एका कर्मचाऱ्याकडे तीन-तीन विभागांचे काम असल्याने कर्मचाऱ्यांना कमालीचा मानसिक ताण सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कर्मचारीदेखील तणावमुक्त रहावेत, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पुरेसा कर्मचारी वर्ग देण्याची आवश्यकता आहे. दोडामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवा तालुका. २६ जून १९९८ रोजी तालुक्याची निर्मिती झाली; परंतु तालुका निर्मितीनंतर सलग दहा वर्षे येथील कायदा व सुव्यवस्थेचे काम सावंतवाडी तालुक्यातील बांदा पोलीस ठाण्यातूनच पाहिले जात होते. दोडामार्ग, कळणे आणि कोनाळकट्टा अशी तीन पोलीस दूरक्षेत्रे त्यावेळी कार्यरत होती. सन २००२ ते २००८ पर्यंतच्या काळात तालुक्यात परप्रांतीयांचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आणि गुन्हेगारीचे प्रमाणही याच दरम्यान कमालीचे वाढले. खून, आत्महत्या, संशयास्पदरीत्या बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रकारदेखील वाढले. आधीच भौगोलिकदृष्ट्या गावे विखुरलेली असल्याने कमीत कमी वेळेत गुन्ह्याच्या ठिकाणी पोलीस कुमक पोहोचण्यात अनेक अडचणी येऊ लागल्या. याच काळात तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनीत गांजा लागवडीचे प्रकार उघडकीस आले. परिणामत: वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्गसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे असावे, ही मागणी जोर धरू लागली. त्यावेळी शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून अल्पावधीत जिल्ह्यात प्रसिद्ध झालेले मल्लिकार्जुन प्रसन्ना हे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या काळात दोडामार्गसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा विषय चांगलाच गाजला. इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रसन्ना यांची भेट घेऊन स्वतंत्र पोलीस ठाण्याबाबत आवश्यकता पटवून दिल्यानंतर दोडामार्गवासीयांना पोलीस ठाणे देण्याचे मान्य झाले. मात्र, त्याच दरम्यान त्यांची बदली झाली अन् रवींद्र शिसवे हे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. त्यांच्या कारकिर्दीतच १ जानेवारी २००९ रोजी दोडामार्गसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे मंजूर करून रीतसर उद्घाटन करण्यात आले. सुरुवातीला नंदकुमार देशमुख हे पोलीस निरीक्षक म्हणून दोडामार्ग पोलीस ठाण्याचा कार्यभार हाकू लागले. त्यावेळी त्यांना केवळ एक सहायक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक व फक्त ३६ कर्मचारी देण्यात आले. या ३६ कर्मचाऱ्यांवरच पोलीस ठाण्याचा डोलारा उभा होता. मात्र, जे कर्मचारी उपलब्ध होते ती संख्या पुरेशी नव्हती. सन २००९ नंतर आज सहा वर्षे पोलीस ठाणे मंजूर होऊन झाली; परंतु या सहा वर्षांत इथली कर्मचारी संख्या वाढलेली नाही. उलट कमीच झाली. सहा वर्षांच्या काळात पाच पोलीस निरीक्षक बदलले; परंतु या पाचही अधिकाऱ्यांना केवळ तुटपुंजा कर्मचारी वर्ग घेऊनच तालुका आणि कायदा सुव्यवस्था पाहण्याची वेळ आली. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी तालुकावासीयांमधून केली जात आहे.दोडामार्ग पोलीस ठाण्यात २८ पोलीस कर्मचारीच सध्या दोडामार्ग पोलीस ठाण्यासाठी ४० ते ४५ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे; परंतु सद्य:स्थितीत केवळ २८ पोलीस कर्मचारीच दोडामार्ग पोलीस ठाण्यात आहेत. तर दोघेजण सावंतवाडी उपविभागीय पोलीस ठाण्यात संलग्न आहेत. त्यामुळे २६ कर्मचारीच खरे तर मूर्त स्वरुपात कार्यरत आहेत. याठिकाणी सहायक पोलीस उपनिरीक्षक पदे दोन असून, त्यापैकी एकच कार्यरत आहे, तर एकजण सावंतवाडी येथे संलग्न आहे. हवालदार म्हणून पाच कर्मचारी कार्यरत असून, कळणे पोलीस दूरक्षेत्रावर दोन, कोनाळकट्टा पोलीस दूरक्षेत्रावर दोन व विजघर या ठिकाणी दोन कर्मचारी कार्यरत आहेत. मुळात विजघर चेकनाक्यावर एकूण तीन कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, या ठिकाणी कर्मचारी संख्या अपुरी असल्याने फक्त दोनच कर्मचारी देण्यात आले आहेत. एकाच कर्मचाऱ्यावर बीट अंमलदार, तंटामुक्ती अशा दोन-दोन विभागाचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण पडत असून, त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावरही जाणवत आहे. दोडामार्ग शहर बीट अंमलदाराविना?दोडामार्ग पोलीस ठाण्यातील खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या दोडामार्ग शहरासाठी सध्या बीट अंमलदारच नाही. त्यामुळे गैरसोय होत असून, शहराचा अतिरिक्त कारभार प्रभारी बीट अंमलदाराकडे सोपविण्यात आला आहे.