शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

कोरेगाव भीमा घटनेची उजळणी नको -उत्तम कांबळे कागलमध्ये सामाजिक सलोखा परिषदेतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:41 IST

कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा

कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याचे टाळूया. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत अशा लाजिरवाण्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी दक्षता घेऊया, अशा भावना सर्वच वक्त्यांनी येथे झालेल्या ‘सामाजिक सलोखा परिषदेत’ व्यक्त केल्या.

येथील गैबी चौकात आरपीआय (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या परिषदेचे आयोजन केले होते. आमदार हसन मुश्रीफ, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, डॉ. अच्युतराव माने, भन्ते एस. संबोधी, आर. आनंद, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आर. पी. आय.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे होते.

यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जाती, धर्म, विविध भाषा, संस्कृतींचा आपला देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अठरापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शाहू-फुले-आंबेडकरांनीही हाच विचार सांगितला. या विचारांमुळेच सामाजिक सलोखा नांदेल. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहूंच्या कोल्हापूरनगरीत जातीयतेला कधी थारा मिळालेला नाही.

कागल तालुक्यात कै. सदाशिव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी पुरोगामित्वाचा वारसा जोपासला. कोल्हापुरात आम्ही भारतीय चळवळ लोक आंदोलन पुन्हा सुरू करूया. संजयबाबा घाटगे म्हणाले, पेशवाई नष्ट करण्याचे काम दलित योद्ध्यांनी केले. छ. शिवरायांनी दलितांना शस्त्र हाती घेण्याचा अधिकार दिला होता. हा इतिहास नाकारून चालणार नाही.

कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ सर्व बहुजनांची अस्मिता आहे.समरजितसिंह घाटगे म्हणाले, जो इतिहास घडला आहे तो आपण बदलू शकत नाही. मात्र, इतिहासापासून शिकले पाहिजे. एका कोरेगाव भीमा घटनेनंतर आमच्यात फूट पडावी, एवढे दुबळे संस्कार आमच्यावर झाले आहेत का? इतिहासात झालेल्या चुका वर्तमानात दुरुस्त करूया.

बी. आर. कांबळे यांनी स्वागत, तर बाबासाहेब कागलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. अच्युतराव माने, प्रा. शहाजी कांबळे, डॉ. अनिल माने, विश्वास देशमुख, मंगलराव माळगे, दगडू भास्कर, सखाराम कामत, बळवंतराव माने, सुभाष देसाई, चंद्रशेखर कोरे, सत्कारमूर्ती उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली.साडेतीन तास चालली परिषदसायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही परिषद साडेदहाला संपली. व्यासपीठाला कै. पांडुरंग सोनुले, भीमराव मोहिते या कार्यकर्त्यांचे नाव दिले होते. उत्तम कांबळे यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. कै. सदाशिवराव मंडलिक, कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील प्रमुख नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती.संजय घाटगेंनी मांडला इतिहासया परिषदेत सर्वांत प्रभावी भाषण करीत संजय घाटगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, इंग्रज-पेशवे युद्ध, दलित योद्ध्यांची कामगिरी, असा ओघवता इतिहास मांडला. औरंगजेब आणि पेशव्यांच्या फर्मानाला घाबरून कोणीही पुढे आला नाही; पण दलित समाजातील लोक पुढे आले आणि त्यांनी आमच्या छत्रपतींवर महारवाड्यात अत्यसंस्कार केले. हे मान्य करायला लाज कसली वाटते? असा सवाल करताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कागल येथे झालेल्या सामाजिक सलोखा परिषदेत उत्तम कांबळे यांचा बुद्धमूर्ती देऊन भन्ते एस. संबोधी, आर. आनंद यांनी सत्कार केला. यावेळी बी. आर. कांबळे, शहाजी कांबळे, समरजित घाटगे, संजय घाटगे, डॉ. अच्युत माने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र