शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कोरेगाव भीमा घटनेची उजळणी नको -उत्तम कांबळे कागलमध्ये सामाजिक सलोखा परिषदेतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:41 IST

कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा

कागल : कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना आणि त्यानंतर राज्यभर झालेला हिंसाचार हा अत्यंत दुर्दैवी प्रकार होता. पुरोगामी महाराष्ट्राला चुकून पडलेले ‘एक वाईट स्वप्न’ असा विचार करून त्या घटनांची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याचे टाळूया. छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत अशा लाजिरवाण्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी दक्षता घेऊया, अशा भावना सर्वच वक्त्यांनी येथे झालेल्या ‘सामाजिक सलोखा परिषदेत’ व्यक्त केल्या.

येथील गैबी चौकात आरपीआय (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या परिषदेचे आयोजन केले होते. आमदार हसन मुश्रीफ, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, डॉ. अच्युतराव माने, भन्ते एस. संबोधी, आर. आनंद, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी आर. पी. आय.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे होते.

यावेळी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, अठरापगड जाती, धर्म, विविध भाषा, संस्कृतींचा आपला देश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या अठरापगड जातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. शाहू-फुले-आंबेडकरांनीही हाच विचार सांगितला. या विचारांमुळेच सामाजिक सलोखा नांदेल. प्रा. संजय मंडलिक म्हणाले, राजर्षी शाहूंच्या कोल्हापूरनगरीत जातीयतेला कधी थारा मिळालेला नाही.

कागल तालुक्यात कै. सदाशिव मंडलिक आणि विक्रमसिंह घाटगे यांनी पुरोगामित्वाचा वारसा जोपासला. कोल्हापुरात आम्ही भारतीय चळवळ लोक आंदोलन पुन्हा सुरू करूया. संजयबाबा घाटगे म्हणाले, पेशवाई नष्ट करण्याचे काम दलित योद्ध्यांनी केले. छ. शिवरायांनी दलितांना शस्त्र हाती घेण्याचा अधिकार दिला होता. हा इतिहास नाकारून चालणार नाही.

कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ सर्व बहुजनांची अस्मिता आहे.समरजितसिंह घाटगे म्हणाले, जो इतिहास घडला आहे तो आपण बदलू शकत नाही. मात्र, इतिहासापासून शिकले पाहिजे. एका कोरेगाव भीमा घटनेनंतर आमच्यात फूट पडावी, एवढे दुबळे संस्कार आमच्यावर झाले आहेत का? इतिहासात झालेल्या चुका वर्तमानात दुरुस्त करूया.

बी. आर. कांबळे यांनी स्वागत, तर बाबासाहेब कागलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. अच्युतराव माने, प्रा. शहाजी कांबळे, डॉ. अनिल माने, विश्वास देशमुख, मंगलराव माळगे, दगडू भास्कर, सखाराम कामत, बळवंतराव माने, सुभाष देसाई, चंद्रशेखर कोरे, सत्कारमूर्ती उत्तम कांबळे यांचीही भाषणे झाली.साडेतीन तास चालली परिषदसायंकाळी सात वाजता सुरू झालेली ही परिषद साडेदहाला संपली. व्यासपीठाला कै. पांडुरंग सोनुले, भीमराव मोहिते या कार्यकर्त्यांचे नाव दिले होते. उत्तम कांबळे यांचा तसेच त्यांच्या आई-वडिलांचाही सत्कार करण्यात आला. कै. सदाशिवराव मंडलिक, कै. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तालुक्यातील प्रमुख नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी झाली होती.संजय घाटगेंनी मांडला इतिहासया परिषदेत सर्वांत प्रभावी भाषण करीत संजय घाटगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या, इंग्रज-पेशवे युद्ध, दलित योद्ध्यांची कामगिरी, असा ओघवता इतिहास मांडला. औरंगजेब आणि पेशव्यांच्या फर्मानाला घाबरून कोणीही पुढे आला नाही; पण दलित समाजातील लोक पुढे आले आणि त्यांनी आमच्या छत्रपतींवर महारवाड्यात अत्यसंस्कार केले. हे मान्य करायला लाज कसली वाटते? असा सवाल करताच घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कागल येथे झालेल्या सामाजिक सलोखा परिषदेत उत्तम कांबळे यांचा बुद्धमूर्ती देऊन भन्ते एस. संबोधी, आर. आनंद यांनी सत्कार केला. यावेळी बी. आर. कांबळे, शहाजी कांबळे, समरजित घाटगे, संजय घाटगे, डॉ. अच्युत माने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्र