शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

शेताच्या फूटभर जागेसाठी भाऊबंदकीचा 'बांध' फुटला; गेल्या महिनाभरात कोल्हापूर जिल्ह्यात 'किती' गुन्हे दाखल..वाचा

By उद्धव गोडसे | Updated: May 23, 2025 15:49 IST

हद्दीच्या वादातून वितुष्ट, ४० हून जास्त जखमी

उद्धव गोडसेकोल्हापूर : वळीवाच्या पावसाचे आगमन होताच शेतांच्या मशागतींची लगबग सुरू होते आणि हाच मुहूर्त साधून गावागावांत हद्दीच्या वादातून भाऊबंदकी उफाळून येते. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात हद्दीच्या वादांचे १४७ गुन्हे दाखल झाले. हाणामारीत ४० हून जास्त जण जखमी झाले, तर सुमारे ४०० जणांच्या मागे मशागत सोडून कोर्टकचेरीची कामे लागली आहेत. खरिपाच्या पेरण्या होईपर्यंत वाढणारे वाद नियंत्रणात ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.वळीव पावसापासूनच शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. बांधावरील झुडप, झाडे काढून टाकणे, शेतात वाढलेले तण काढणे, वाफे तयार करणे अशा अनेक कामांची घाई उठते. नेमके याच वेळी जमिनींची हद्द निश्चित करण्यावरून शेजाऱ्यांबरोबर वाद सुरू होतात. बांध आणि ताली फोडणे, हद्दीचे दगड हलविणे, वाट बंद करणे... अशा अनेक कारणांनी वादाला तोंड फुटते. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात शेतातील हद्दीच्या वादाचे १४७ गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रार अर्जांचे प्रमाण यापेक्षा दुपटीहून जास्त आहे. भाऊबंदकीचे काही वाद मिटविण्यात गावपातळीवर यश येते. मात्र, अनेक वादांमध्ये पोलिस ठाणे आणि कोर्टाची पायरी चढण्याची प्रवृत्ती वाढली आहे. त्यामुळे शेतक-यांचा कामाचा वेळ आणि पैसाही वाया जात असल्याचे मत वरिष्ठ पोलिस अधिकारी व्यक्त करतात.वादाची कारणे काय?

  • जमिनीची शासकीय मोजणी झालेली नसणे
  • हद्दीच्या खुना निश्चित नसतात
  • पोटहिश्शांमधील वाद
  • बांध आणि ताली फोडणे
  • बांधावरील झाडे तोडणे किंवा कुंपण घालणे
  • वाट बंद करणे
  • एकमेकांच्या जमिनींवर हक्क सांगणे
  • एकमेकांच्या विरोधात तक्रारी करणे

वादातून लाखो रुपयांचे नुकसानएक-दोन फूट इकडे-तिकडे सरकून सामंजस्याने मार्ग काढण्याऐवजी वाढवलेला वाद शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान करतो. रागाच्या भरात झालेल्या हाणामारीत एखाद्याचा जीव जाण्याचा धोका असतो. दरवर्षी अशा प्रकारच्या दोन-तीन घटना घडतात. अनेकजण जखमी होऊन आयुष्यभरासाठी जायबंदी होतात. कोर्टकचेरीच्या कामांसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात.दाखल झालेले प्रमुख गुन्हेपोलिस ठाणे - गुन्हेआजरा : १६हातकणंगले : १५करवीर : १५चंदगड : १४शाहूवाडी :१४भुदरगड : १२पन्हाळा : १२मुरगुड : १०कागल : ११पेठ वडगाव : ९इस्पुर्ली : ६जयसिंगपूर : ५शिरोळ : ४कोडोली : ४

तंटामुक्त समित्यांची जबाबदारी वाढलीहद्दीचे वाद वाढू नयेत यासाठी गावांतील तंटामुक्त समिती महत्त्वाची असते. दोन्ही तक्रारदारांना समोरासमोर घेऊन सामोपचाराने वाद मिटवले जाऊ शकतात. वाद वाढवून होणारे संभाव्य धोके आणि नुकसानीची जाणीव करून दिल्यास हद्दीचे वाद कमी होऊ शकतात. यासाठी तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी हद्दीच्या वादाचे गुन्हे जास्त दाखल होतात. गेल्या महिनाभरात ही संख्या वाढलेली दिसते. असे गुन्हे वाढू नयेत यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिका-यांना दिल्या आहेत. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfarmingशेतीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस