शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कोयनेतून ४९ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 1:45 PM

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक वाढतच आहे. त्यातच धरणात ९० टीएमसीवर साठा असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे पाच फुटांवरुन दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्यात आले. त्यामुळे ४७ हजार क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयनेतून एकूण ४९ हजार ३४४ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील आठवड्यात धुवाँधार पाऊस झाला. कोयना, नवजा, महाबळेश्वर तापोळा, बामणोली भागात धो-धो पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर ओढे, नाले भरुन वाहिल्याने कोयना धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. अवघ्या २४ तासांत साडे सोळा टीएमसी पाणी वाढण्याचाही विक्रम नोंद झाला. त्यामुळे अवघ्या चार दिवसांत कोयना धरणातील साठा ९० टीएमसीच्या वर पोहोचला. तर त्यापूर्वीच धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तर पाऊस वाढल्यानंतर धरणाचे सहा दरवाजे १० फुटापर्यंत दरवाजे उचलण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची आवक कमी झाल्याने साडे पाच फुटांपर्यंत दरवाजे खाली घेण्यात आले. गेले पाच दिवस दरवाजे साडे पाच फुटांवर स्थिर होते. पण, पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणातही आवक होत आहे. तसेच साठा ९० टीएमसीवर असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे ९ फुटांपर्यंत उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास धरणाचे सर्व दरवाजे ९ फुटापर्यंत उघडण्यात आले. त्यामधून ४७२४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृह २१०० असा मिळून ४९३४४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात जात होता. यामुळे कोयना नदीची पाणीपातळी वाढली आहे. पूर आल्याने नदीकाठच्या रहिवशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इतर धरणांतीलही पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

दरम्यान, गुरूवारी सकाळपर्यंच्या २४ तासांत कोयनानगर येथे ४३ मिलीमीटर पाऊस झाला. तर यावर्षी आतापर्यंत ३००७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजाला २० आणि जूनपासून आतापर्यंत ३८२० मिलीमीटर पाऊस पडला आहे. तसेच महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४६ आणि आतापर्यंत ३८८१ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

जिल्ह्यातील धरणांतून होणारा विसर्ग

धोम धरणातून ४०१२ क्यूसेक विसर्ग सुरू होता. कण्हेर ४०९४, बलकवडी ३८६, उरमोडी २९१९ आणि तारळी धरणातून १५३२ क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दरम्यान, धोम धरणात ७५.५८ टक्के पाणीसाठा झाला होता. कोयनेत ८५.२४, बलकवडी ८६.६६, उरमोडी धरण ७४.३५ आणि तारळी धरणात ८५.७० टक्के पाणीसाठा झाला होता. 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसर