शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

दलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 1:21 PM

नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.

ठळक मुद्देदलित विरुद्ध मराठा असा रंग देणाऱ्यांचा कुटील डाव उधळून लावा : खासदार संभाजीराजेअरविंद बनसोड आणि इतरांना न्याय मिळाला पाहिजे

कोल्हापूर : नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या येत आहेत. सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे, परंतु या घटनांना दलित विरुद्ध मराठा असा रंग द्यायचा प्रयत्न कुणी करत असेल तर राजर्षी शाहूंचा वारसदार या नात्याने त्यांचा कुटील डाव उधळून लावला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर दिली आहे.नागपूरातील अरविंद बनसोड आणि आणखी काही दलित बांधवांवर अत्याचार झाल्याच्या बातम्या सोशल मिडियावर येत आहेत. या विषयावर खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे, की बहुजन समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वत:च्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायला काही लोक पुढे सरसावत आहेत, पण यामधून त्यांचं क्षुल्लक राजकारण साध्य होईल, पण समाजाचं मोठं नुकसान होणार आहे.

चौकशीअंती या घटनांमध्ये जे दोषी आहेत, त्यांच्यावर तत्काळ अन कठोर कारवाई करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा समाजाने दलितांवर अन्याय करु नये, परंतु त्याच वेळी काही कायद्यांचा चुकीचा वापर करून मराठा समाजावर सुद्धा अन्याय करु नये. जर अशाप्रकारे कुणावरही अन्याय होत असेल तर त्याचा मी तत्काळ विरोध केला आहे आणि करत राहणार, असेही त्यांनी म्हटले आहे.काही माथेफिरु लोक दोन्हीकडे असतात. त्या सर्वांना आपण बाजूला पाडलं पाहिजे. समाज हिताच्या दृष्टीने, बहुजन समाजाच्या एकीच्या दृष्टीने तेच योग्य आहे. देशाच्या सामाजिक एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या शक्तींचा वेळीच बंदोबस्त करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या केवळ घोषणा देऊन काय उपयोग? त्यांचे विचार आत्मसात करणे, त्याप्रमाणे वागणे महत्वाचे आहे, असे मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोशल मिडियावर व्यक्त केले आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीkolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया