शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
3
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
4
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
5
दक्षिण मुंबईत धनुष्यबाण विरुद्ध मशाल! यामिनी जाधवांना अरविंद सावंतांविरोधात उमेदवारी जाहीर
6
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
7
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
8
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
9
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
10
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
11
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
12
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
13
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
14
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
15
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
16
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
17
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
18
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
19
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
20
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा

‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:53 AM

राजाराम लोंढे कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची ...

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’ची मागणी ३९ ची; तयारी १५ जागांवर‘शिरोळ’चा पेच शेवटपर्यंत राहणार : कोल्हापुरात पाच जागांवर दावा

राजाराम लोंढेकोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कॉँग्रेस आघाडीकडे ३९ जागांची मागणी केली तरी किमान १५ जागांवर मागे-पुढे सरकण्याची मानसिकता संघटनेची दिसते. खरी अडचण शिरोळ मतदारसंघातच आहे. होम पिच असल्याने ही जागा सोडण्यास तयार नाही, तर राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शड्डू ठोकल्याने आघाडीसमोर पेच आहे.

जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरू असली, तरी ‘शिरोळ’वरून आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असून, शेवटपर्यंत पेच राहणार हे निश्चित आहे.शिवसेना-भाजपचा विजयाचा वारू रोखण्यासाठी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लोकसभेनंतर मोर्चेबांधणी केली असली, तरी दोन्हीकडील मातब्बर शिलेदार पक्षातून बाहेर पडल्याने दोघे युतीशी टक्कर देऊ शकत नाहीत; त्यामुळे स्वाभिमानी, शेकाप, जनता दल, रिपाइं या मित्रपक्षांना सोबत घेऊनच युतीशी दोन हात करण्याची तयारी कॉँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. आघाडीत जागा वाटपाचा फारसा तिढा निर्माण होणार नाही, असे वाटत असले, तरी राज्यातील अनेक मतदारसंघ ‘कळी’चे बनले आहेत. त्यातील शिरोळ असून, ‘स्वाभिमानी’चे होमपिच असल्याने या जागेवर त्यांचा अधिकार राहणार आहे.‘स्वाभिमानी’ने आघाडीकडे ३९ मतदारसंघांची यादी दिली आहे; पण २०१४ ला संघटना १५ जागांवर लढली होती. त्यातील पाच जागा कोल्हापूर जिल्ह्यातील होत्या; त्यामुळे यावेळेलाही जिल्ह्यातील ‘शिरोळ’सह राधानगरी-भुदरगड, चंदगड, शाहूवाडी, हातकणंगले या मतदारसंघांवर दावा केला आहे. चर्चेअंती मागे-पुढे सरकण्याची तयारीही संघटनेची राहील.राष्ट्रवादीकडे दहापैकी चार, तर कॉँग्रेसकडे चार मतदारसंघांत ताकदीचे उमेदवार आहेत. प्रकाश आवाडे हे कॉँग्रेसमधून बाहेर पडल्याने इचलकरंजी आणि शाहूवाडीत दोन्ही कॉँग्रेसकडे ताकदीचा उमदेवार सध्यातरी दिसत नाही.

‘शेकाप’ने एकही जागा मिळाली नाही, तर आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे; त्यामुळे त्यांना ‘शाहूवाडी’ची जागा सोडण्याची शक्यता आहे. ‘स्वाभिमानी’ला ‘शिरोळ’ची जागा द्यावीच लागेल. त्यानंतर कोणाकडे ताकदीचे उमेदवार आहेत, हे पाहूनच निर्णय होतील; पण काही झाले, तरी आघाडी तुटणार नाही, याची खबरदारी घेण्यावर आघाडीच्या नेत्यांवर एकमत झाल्याचे समजते.राजेंद्र पाटील यांनी २०१४ ला दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती; त्यामुळे पराभवानंतर त्यांनी लगेच तयारी सुरू केल्याने, आता ते मागे हटणार नाहीत, हे निश्चित आहे. त्यांना ‘स्वाभिमानी’तून उभे करावे, असा प्रयत्न राष्ट्रवादीअंतर्गत सुरू आहे; पण संघटना सावकर मादनाईक यांच्यावर ठाम दिसते.

त्यात पाटील हे साखर कारखानदार असल्याने त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात, हेही पाहावे लागणार असल्याने सध्यातरी हा प्रयोग संघटनेच्या चौकटी बाहेरचा आहे. पाटील यांनी बंडखोरी केली तर आघाडीच्या दृष्टीने ती मारक ठरणार असल्याने हा गुंता सोडवायचा कसा? या चिंतेत राष्ट्रवादी  व स्वाभिमानीचे नेते आहेत.

जागा वाटपाबाबत आठवड्यात फैसला होईल, आम्ही ३९ जागांची यादी दिली आहे. एकमेकांची ताकद पाहून थोडे मागे-पुढे सरकण्याची तयारी आहे. ‘शिरोळ’तर आमचे होमपिच आहेच; पण त्याबरोबरच ‘राधानगरी’, ‘चंदगड’वरही आमचा दावा असेल.- प्रा. जालंदर पाटील,जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkolhapurकोल्हापूर