शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

व्यवहार वादग्रस्त तेवढा लाचेचा दर भ्रष्टाचाराची साखळी मजबूत : सरकार कोणाचेही असले तरी लूट सुरूच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:41 IST

जमिनीचा व्यवहार जेवढा वादग्रस्त तेवढी लाचेची रक्कम जास्त, असाच व्यवहार सातबारा पत्रकी नाव लावताना होतो.

कोल्हापूर : जमिनीचा व्यवहार जेवढा वादग्रस्त तेवढी लाचेची रक्कम जास्त, असाच व्यवहार सातबारा पत्रकी नाव लावताना होतो. ही रक्कम कमीत कमी दोन हजारांपासून दोन लाखांपर्यंत असते. पैसे देऊनही नाव लावताना हेलपाटे मारायला लावणे, असाही अनुभव लोकांना कायमच येतो. तलाठ्याकडून या कामांसाठी लोकांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होते; परंतु तो जणू नियमच झाला असल्याचे चित्र गुरुवारी (दि. १७) कागल येथे झालेल्या लाचखोरीच्या कारवाईमुळे स्पष्ट झाले.

कोल्हापूर शहरात चार व जिल्ह्णात १४ अशी मुद्रांक नोंदणी कार्यालये आहेत. त्यांमध्ये वर्षाला १७ हजार व्यवहार होतात. या सगळ्या व्यवहारांत पूर्वीच्या मालकाचे नाव कमी करून नव्या मालकाचे नाव नोंदविण्याचे काम होते. प्लॉटच्या सातबाऱ्यास नाव लावताना जुन्या प्लॉटमालकाच्या नावे खोटाच तक्रार अर्ज घेऊन त्याआधारेही लाच उकळण्याचा प्रकार होतो. भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी ‘महसूल’मध्ये तत्कालीन जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सर्व व्यवहार आॅनलाईन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यालाही प्रचंड विरोध झाला. खाबूगिरीस पायबंद बसायला नको, हेदेखील त्यामागील महत्त्वाचे कारण होते.

खरे तर जेव्हा शेतजमीन असो किंवा भूखंड; त्याचा आॅनलाईन खरेदी व्यवहार होतो, तेव्हा त्याची नोंद संबंधित तलाठ्याकडे जाते. त्याने त्या खरेदी दस्तानुसार १५ दिवस मुदतीची फेरफार नोटीस काढून त्यास कुणाची हरकत आली नसेल तर ज्यांनी जमीन खरेदी केली आहे, त्यांचे नाव रीतसर सातबारा पत्रकी नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यासाठी तुम्हांला तलाठ्याच्या दारातही जाण्याची गरज नाही; परंतु हा झाला आदर्श व्यवहार. प्रत्यक्षात या व्यवहारात सर्वाधिक लूट होते. तुम्ही किती रकमेची जमीन किंवा प्लॉट घेतला आहे, त्या प्रमाणात लाचेची मागणी होते. ‘वीस लाखांचा प्लॉट घेताय आणि आम्हांला वीस हजार देताना का कुरकूर करताय?’ असेही निर्लज्जपणे तलाठी विचारतात. हे पैसे घेऊनही नोंद करण्यासाठी टाळाटाळ होते.

तलाठ्याच्या हाताखाली काम करणाºया सहायकापासून ते तलाठी, मंडल अधिकारी, नायब तहसीलदार ते तहसीलदार यांच्यापर्यंत ही भ्रष्टाचाराची मजबूत साखळीच असते. सगळेच तलाठी भ्रष्टाचारी आहेत, असे चित्र नाही. काहीजण जरूर चांगलही आहेत. काही लोक जेवढे देतील तेवढे घेऊन काम करून देणारेही आहेत. जमिनीच्या व्यवहारात काही कायदेशीर अडचणी असतील तर लुबाडणुकीची आयतीच संधी मिळते. कागलच्या लाचप्रकरणात एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागण्यामागेही हेच कारण आहे. हा जमिनीचा व्यवहार डिसेंबर २०१२ मध्ये झाला आहे; परंतु जमिनीच्या मालकीबद्दल काही तक्रारी झाल्या असल्याने खरेदी दस्त असूनही सातबाºयास नाव नोंद करून दिले जात नव्हतेसातबारा पत्रकास महत्त्व का?जमिनीच्या व्यवहारात सातबारा व ८ अ पत्रकास फार महत्त्व आहे. त्यावर जोपर्यंत तुमचे नाव नोंद होत नाही तोपर्यंत तुम्ही जमिनीचे मालक होऊ शकत नाही. परिणामी तुम्हांला बँकेपासून सरकारी कार्यालयापर्यंत कुणीच दारात उभे करून घेत नाहीत. शेतीसाठी पाणी परवाना, वीज परवाना, सेवा सोसायटीमध्ये खाते घालणे, पीककर्ज मंजुरी, कृषी खात्याच्या योजनांचा लाभ यांसाठी सातबारा हा महत्त्वाचा दस्तऐवज असतो. त्यामुळे तिथेच तलाठी तुम्हांला कोंडीत पकडतो. जमीन सुधारणा किंवा विहीर खुदाईसाठी कर्ज, ट्रॅक्टर खरेदी यासाठीही तुम्ही बँकेकडून कर्ज घेतल्यास त्याची नोंद सातबारा पत्रकास करावी लागते. ही नोंद झाल्याशिवाय तुम्हांला पीककर्जही खात्यावर जमा होत नाही. म्हणजे शेतकºयाला कर्ज घेतानाही अगोदर तलाठ्याचा खिसा भरावा लागतो..

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMONEYपैसा