शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
4
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
5
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
6
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
7
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
8
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
9
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
10
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
11
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
12
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
13
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
14
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
16
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
17
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
18
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
19
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
20
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी

कर्जमाफीवरून शिवसेनेचा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात शंखध्वनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 5:18 PM

राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

ठळक मुद्देसव्वा लाख शेतकरी वचिंत राहिल्याने आक्रमक सहकार मंत्र्यांना काळे झेंडे दाखविणारजिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून घोषणा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणा

कोल्हापूर, 4 : राज्य सरकारच्या कर्जमाफी मधील तांत्रीक दोषांमुळे जिल्ह्यातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणारे सव्वा लाख शेतकरी वंचित राहणार आहेत. याचा निषेध करत शिवसेनेने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात शंखध्वनी केला. सॉफ्टवेअर मध्ये बदल करून या शेतकºयांना न्याय दिला नाहीतर सहकार मंत्र्याच्या कोल्हापूर जिल्हा दौºयावेळी काळे झेंडे दाखवण्याचा इशाराही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिला.

थकबाकीदार शेतकºयांना दीड लाखापर्यंत तर प्रामाणिकपणे परतफेड करणाºया शेतकºयांना २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी संबधित शेतकºयाने २०१५-१६ च्या कर्जाबरोबरच २०१६-१७ मधील कर्जाची जुलै २०१७ अखेर परतफेड करणे बंधनकारक आहे. ही बाब अन्यायकारक असून २०१६-१७ मध्ये घेतलेल्या कर्जाची परतफेडीची मुदत जुन २०१८ पर्यंत आहे. मुदतीपुर्वी कर्ज भरण्याची सक्ती सरकार कशासाठी करते, या सरकारला प्रामाणिकपणे कर्जमाफीची रक्कम द्यायची नाही, त्यामुळेच शेतकºयांना वंचित ठेवण्याचा मार्ग सरकार शोधत असल्याचा आरोप संजय पवार यांनी केला.

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटीचा पेच आहे. नाबार्ड व सहकार विभागाच्या आदेशानुसार अपात्र रक्कमेची २०१२ मध्ये पुर्नगठन झाले. त्यातील शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ न देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. नैसर्गिक न्याय तत्वानुसार या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. ही आमची मागणी असल्याचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.

याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माहिती दिली पण सॉफ्टवेअर मध्ये बदल करता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आमच्या दृष्टीने सॉफ्टवेअर महत्वाचे नाहीतर शेतकरी महत्वाचा असल्याने योग्य ती दुरूस्ती करून पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी मुरलीधर जाधव यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद करून, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विरोधातील घोषणा व शंखध्वनी करत शिवसेनेने परिसर दणाणून सोडला. यावेळी सुजीत चव्हाण, बाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, मधूकर पाटील, नामदेव गिरी, संभाजी भोकरे, सुनिल शिंत्रे, अवधूत साळोखे, हर्षल सुर्वे, कमलाकर जगदाळे, संदीप पाटील, राजू यादव, विराज पाटील, दत्ता पोवार, कृष्णात पोवार, बाबासाहेब पाटील, शशीकांत बिडकर, मेघना पेडणेकर, दिपाली शिंदे आदी उपस्थित होते.