शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

दप्तरामुळं मुलांना येईल कुबड!

By admin | Updated: June 22, 2015 22:20 IST

डॉक्टरांचे मत : पाठीवरचे ओझे धोकादायकच; शाळा व्यवस्थापन समितीने यावर उपाय योजने गरजेचे -- लोकमत विशेष

सातारा : पूर्वी खांद्याला पिशवी अडकवून मुले शाळत जात होती; परंतु जसा काळ बदलला तशा फॅशनेबल सॅक आणि बॅगा बाझार पेठेत विक्रीस आल्या. या बॅगाबरोबरच मुलांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझेही काळानुसार वाढत गेले; मात्र हे दप्तराचे ओझे अत्यंत धोकादायक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पाठीवर दप्तर अडकविल्यानंतर शरीराचा समतोल साधण्यासाठी मुले पुढे झुकतात. त्यामुळे भविष्यात मुलांना अनेक त्रास उद्भवून कुबड काढून चालण्याची सवयही लागण्याची शक्यता असते, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तिसरी ते चौथीमध्ये शिकत असलेल्या चिमुकल्या मुलांच्या पाठीवर भले मोठे दप्तराचे ओझे पाहून भल्याभल्यांना घाम फुटण्यासारखी सध्या परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने शुक्रवारी शहरातील विविध शाळेत जाऊन चक्क मुलांच्या पाठीवरच्या दप्तराचे वजन केले. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या चिमुकल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा तब्बल २५ टक्के जास्त वजन त्यांच्या पाठीवर असल्याचे उघड झाले. या मुलांच्या पाठीवर अडीच ते तीन किलो वजन कटाकटीने पेलू शकते; परंतु अनेक मुलांच्या पाठीवर साडेचार ते साडेपाच किलो वजन असल्याचे दिसून आले. मुलांच्या पाठीवर नेमके वजन किती असावे आणि त्याचे दुष्परिणाम काय होतात, यासंदर्भात वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय घेतला असता सध्या मुलांच्या पाठीवर असलेले दप्तराचे ओझे धोकादायकच असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. पाठीवरील क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे पाठ दुखणे, थकवा येणे अशी लक्षणे जाणवू लागतात. लहान मुलांना ही लक्षणे जाणवतात; पंरतु त्यांना याविषयी सांगता येत नाही. त्यामुळे जसजसे वय वाढेल तसे मुलांच्या चालण्या-बसण्यात वेगळेपणा दिसतो. त्यामध्ये कुबड काढून चालणे, बसणे, वाकणे अशा मुलांना सवयी लागतात. आपण डोक्यावर वजन ठेवून उभे राहिलो तर गुरुत्वाकर्षण मध्यावर येतो. त्यामुळे समतोल राहतो. परिणामी शरीराला जास्त धोकादायक ठरत नाही; परंतु पाठीवर क्षेमतेपेक्षा जास्त ओझे घेतले तर चिमुकल्या मुलांना लहानपणापासूनच पाठदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. (लोकमत चमू) मुलांची हमालासारखी स्थिती करू नका ! आपण बाजारपेठेमध्ये हमालांना गाड्यावरून माल वाहून नेताना पाहत असतो. हे हमाल त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त माल गाड्यावर ठेवतात. त्यामुळे त्यांना पुढे झुकून आणि वाकून चालावे लागते. या हमालांना भविष्यात पाठीचे आजार वाढत असल्याचे दिसून आले आहे. तशाचप्रकारे सध्याची चिमुकली मुलेही पाठीवर दप्तराचे ओझे घेऊन एखाद्या हमालासारखी वाकलेली आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात या मुलांनाही अशाप्रकारचे आजार उद्भवू शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. सॅक आणि आडवी बॅग पाठीवर अडकविल्यामुळे त्याचा भार मानेवर, मणक्यावर येतो. त्यामुळे मुलांना पाठ दुखणे, थकवा येणे, कुबड काढणे, माण दुखणे असे आजार उद्भवतात. त्यामुळे सहज पेलता यावं, असच वजन पाठीवर असावं. -डॉ. सुहास पोळ, (अस्थिरोग तज्ज्ञ)