शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
4
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
5
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
6
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
7
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
8
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
9
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
10
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
11
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
12
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
13
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
14
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
15
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
16
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
17
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
18
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
19
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
20
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार विद्यार्थ्यांवर संकट

By admin | Updated: July 10, 2015 22:09 IST

शिवाजी विद्यापीठ : तांत्रिक बिघाडाचा पदवीच्या परिक्षार्थींना फटका; पुढील प्रवेश रखडले

रवींद्र माने -ढेबेवाडी -शिवाजी विद्यापीठांतर्गत पदवी परीक्षा दिलेल्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांचे निकालच लटकल्याने विद्यार्थी हतबल झाले असून, शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांच्या विद्यार्थ्यांचा समावेश असून, पुढील प्रवेशप्रक्रिया थांबल्याने संतप्त विद्यार्थ्यांचे महाविद्यालय प्रशासनाशी खटके उडू लागले आहेत. दरम्यान, तांत्रिक अडचणींमुळे हे निकाल अडकल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने कबूल केले असून, लवकरच त्या विद्यार्थ्यांची निकाल प्रक्रिया पूर्ण होईल, असेही स्पष्ट केले. सातारा, सांगली व कोल्हापूर असे तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेले शिवाजी विद्यापीठअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधून सन २०१४-१५ मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान अशा तिन्ही शाखांमधून २ लाख ६२ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तिन्ही शाखांच्या प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले. विद्यापीठाने निकाल प्रक्रियेचे काम ‘एमकेसीएल’या कंपनीकडे ठेक्याने दिले आहे. विद्यापीठानेही माहिती-तंत्रज्ञानाचा आधार घेत सर्वच विद्यार्थ्यांचे निकाल इंटरनेटद्वारे संबंधित वेबसाईटवर प्रसारित केले. मात्र, यामध्ये कमालीच्या त्रुटी आढळून आल्या असून, बहुतेक विद्यार्थ्यांचे निकालच गायब झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लटकले आहेत, अशा विद्यार्थ्यांना धक्का बसल्याने त्यांनी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयांकडे धाव घेतली. महाविद्यालयांनीही याबाबत विद्यापीठाच्या शिक्षण विभाग, परीक्षा मंडळाशी संपर्क साधला. जवळपास एक महिन्यापासून हा पाठशिवणीचा खेळ सुरू असून, विद्यार्थ्यांची कोल्हापूर वारी सुरू आहे.या संपूर्ण प्रक्रियेमुळे चार हजार विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षण प्रवेशाला खो बसल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. विद्यापीठाने ‘एमकेसीएल’कडे चेंडू ढकलल्याने या विद्यार्थ्यांना कोणी न्याय देईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यापीठांतर्गत घेणाऱ्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांच्या निकालाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामध्ये काहीअंशी विद्यार्थी, महाविद्यालयेही जबाबदार आहेत. त्यातच डेटा मायग्रेशन आणि इंटरनेट प्रॉब्लेम याही बाबींचा समावेश आहे. तरी सुद्धा प्राप्त अर्जातील विद्यार्थ्यांच्या निकालाचे काम पुणे येथे सुरू असून, लवकरच त्यांना निकाल प्राप्त होतील. - महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरवीस दिवसांपासून ‘नेट’च बंद निकालाच्या कामासाठी इंटरनेट अत्यावश्यक असताना सुध्दा विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील ‘इंटरनेट’ वीस दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विद्यापीठाच्याच माहिती तंत्रज्ञान विभाग कोमात गेला तर शिक्षणाचे काय? असा प्रश्नही सध्या निर्माण झाला आहे.