शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पालकमंत्र्यांकडून युतीधर्माचे तंतोतंत पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:57 IST

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना दिले पाठबळ

कोल्हापूर : अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पाटील यांनीच प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या पाठीशी सर्व ती ताकद उभी केल्याने या दोघांच्याही विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. 

मंत्री पाटील यांचे धनंजय महाडिक यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळेच एका मेळाव्यात पाटील यांच्याविषयी आक्षेप घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये ऐन प्रचारावेळी थोडा ताणतणाव निर्माण झाला. मात्र हे प्रकरण न वाढविता पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर शहरात भाजपची आपली स्वतंत्र यंत्रणा नेटाने कामाला लावली. 

युतीची राज्यातील विराट अशी सभा घेऊन पाटील यांनी या जिल्ह्यात जी हवा केली, तिचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला. सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील आणखी सात जागांची जबाबदारी असताना पाटील यांनी शेवटच्या तीन दिवसांत ‘गोकुळ’चा मुद्दा बाहेर काढून वातावरण ढवळून काढले. सुरुवातीच्या काळात प्रत्येक तालुक्यात मेळावा, कोल्हापूर शहरात व्यापाऱ्यांपासून ते स्वयंसेवी संस्थांसह अनेकांच्या घेतलेल्या बैठका, अधिकाधिक वैयक्तिक मान्यवरांच्या घरी जाऊन घेतलेल्या गाठीभेटी यांमुळे पाटील यांनी मंडलिक यांच्या प्रचारात कुठेही कसर सोडली नाही.  

‘माझी छाती उघडून बघा, त्यामध्ये धनुष्यबाण दिसेल’ असे सांगत आपल्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड राबणूक करून घेतली. ‘माझी ‘मातोश्री’वर तक्रार जाता कामा नये’ अशी तंबीच पाटील यांनी दिली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांची प्रचारपत्रके घरोघरी वाटेपर्यंत कुठेही कमतरता भासू दिली नाही. ‘मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा,’ या चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि संजय मंडलिक पावणेतीन लाख मतांनी विजयी झाले. 

तिकडे गेली दोन वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेणाºया राजू शेट्टी यांचा पाडाव करण्यासाठी जे काही करावे लागले, ते चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासाठी सदाभाऊ खोत यांच्यावर गेले वर्षभर ती जबाबदारी दिली. सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक या आपल्या आमदारांना पाठबळ देण्याबरोबरच धैर्यशील माने यांनाही सहकार्याचा हात दिला.पाटील यांची प्रतिष्ठा वाढलीएकीकडे राज्याचे महसूल,  कृषी यांसारखी महत्त्वाची खाती असणाºया पाटील यांनी सांगायचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला होकार द्यायचा, असे चित्रे गेले साडेचार वर्षे महाराष्ट्र पाहत आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर किमान दहाजणांना महामंडळेही जाहीर करण्यात आली. कोणत्याही महत्त्वाच्या बाबतीत फडणवीस हे चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतात. फडणवीस यांनी अतिशय गरजेच्या वेळी युती केली असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या ठरल्या. शिवसेनेचे हे दोन्ही खासदार निवडून आल्याने पाटील यांचीच प्रतिष्ठा मुंबईत वाढली आहे.   

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा