शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

पालकमंत्र्यांकडून युतीधर्माचे तंतोतंत पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 10:57 IST

अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना दिले पाठबळ

कोल्हापूर : अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले आहे, याची जाणीव असल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या काहीजणांशी मतभेद असतानाही या लोकसभा निवडणुकीमध्ये युतीधर्माचे तंतोतंत पालन केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. पाटील यांनीच प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या पाठीशी सर्व ती ताकद उभी केल्याने या दोघांच्याही विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. 

मंत्री पाटील यांचे धनंजय महाडिक यांच्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. त्यामुळेच एका मेळाव्यात पाटील यांच्याविषयी आक्षेप घेतल्यानंतर भाजप-शिवसेनेमध्ये ऐन प्रचारावेळी थोडा ताणतणाव निर्माण झाला. मात्र हे प्रकरण न वाढविता पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर शहरात भाजपची आपली स्वतंत्र यंत्रणा नेटाने कामाला लावली. 

युतीची राज्यातील विराट अशी सभा घेऊन पाटील यांनी या जिल्ह्यात जी हवा केली, तिचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला. सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील आणखी सात जागांची जबाबदारी असताना पाटील यांनी शेवटच्या तीन दिवसांत ‘गोकुळ’चा मुद्दा बाहेर काढून वातावरण ढवळून काढले. सुरुवातीच्या काळात प्रत्येक तालुक्यात मेळावा, कोल्हापूर शहरात व्यापाऱ्यांपासून ते स्वयंसेवी संस्थांसह अनेकांच्या घेतलेल्या बैठका, अधिकाधिक वैयक्तिक मान्यवरांच्या घरी जाऊन घेतलेल्या गाठीभेटी यांमुळे पाटील यांनी मंडलिक यांच्या प्रचारात कुठेही कसर सोडली नाही.  

‘माझी छाती उघडून बघा, त्यामध्ये धनुष्यबाण दिसेल’ असे सांगत आपल्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड राबणूक करून घेतली. ‘माझी ‘मातोश्री’वर तक्रार जाता कामा नये’ अशी तंबीच पाटील यांनी दिली होती. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजय मंडलिक यांची प्रचारपत्रके घरोघरी वाटेपर्यंत कुठेही कमतरता भासू दिली नाही. ‘मोदींना पंतप्रधान करण्यासाठी संजय मंडलिक यांना विजयी करा,’ या चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि संजय मंडलिक पावणेतीन लाख मतांनी विजयी झाले. 

तिकडे गेली दोन वर्षे नरेंद्र मोदी यांच्यावर तोंडसुख घेणाºया राजू शेट्टी यांचा पाडाव करण्यासाठी जे काही करावे लागले, ते चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यासाठी सदाभाऊ खोत यांच्यावर गेले वर्षभर ती जबाबदारी दिली. सुरेश हाळवणकर, शिवाजीराव नाईक या आपल्या आमदारांना पाठबळ देण्याबरोबरच धैर्यशील माने यांनाही सहकार्याचा हात दिला.पाटील यांची प्रतिष्ठा वाढलीएकीकडे राज्याचे महसूल,  कृषी यांसारखी महत्त्वाची खाती असणाºया पाटील यांनी सांगायचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला होकार द्यायचा, असे चित्रे गेले साडेचार वर्षे महाराष्ट्र पाहत आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर किमान दहाजणांना महामंडळेही जाहीर करण्यात आली. कोणत्याही महत्त्वाच्या बाबतीत फडणवीस हे चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतात. फडणवीस यांनी अतिशय गरजेच्या वेळी युती केली असताना, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेच्या ठरल्या. शिवसेनेचे हे दोन्ही खासदार निवडून आल्याने पाटील यांचीच प्रतिष्ठा मुंबईत वाढली आहे.   

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपा