शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

CoronaVirus : जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:52 IST

कोल्हापूर : जिल्‌ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे ...

ठळक मुद्देजिल्ह्यात आजपर्यंत कोरोनाचा सामाजिक संसर्ग नाहीजिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली माहिती

कोल्हापूर : जिल्‌ह्यामध्ये सामाजिक संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय रेड झोनमधून जिल्ह्यामध्ये येणाऱ्यांचा स्वॅब घेण्याचे धोरण राबविले. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत सामाजिक संसर्ग नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले.आज दुपारपर्यंत जिल्ह्यामध्ये ३७८ कोरोना बाधित रूग्णांची संख्या आहे. यामध्ये पुणे, मुंबई, रायगड, ठाणे, सोलापूर या रेड झोनमधून आलेल्या व्यक्तींचा समावेश आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक एकही रूग्ण नाही.

तपासणी नाक्यांवरून कोव्हिड हॉस्पिटलमध्ये पाठवून स्वॅब घेतला जातो. त्यानंतर त्यांना अलगीकरण केले जाते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. संख्या जरी वाढलेली असली तरी, बाधित कोण आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यांना रूग्णालयात ठेवून उपचार केले जातात. हे रूग्ण आपण शोधलेले आहेत. यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, याची आपण काळजी घेत आहोत.उपचारानंतर बरे झालेल्या आजअखेर २१ जणांना घरी सोडण्यात आलेले आहे. पुढच्या १० दिवसात मोठ्या प्रमाणावर बरे झालेल्या रूग्णांना घरी सोडण्यात येईल. कोरोनाने बाधित होऊन मृत्यू झालेल्या रूग्णाची संख्या १ आहे. दुसरा तपासणी करण्यापूर्वी मृत्यू झाला आहे, त्यानंतर तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. हे २ मृत्यू जरी धरले तरी जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात यशस्वी झालो आहोत.

ज्या रूग्णांना मधुमेह, मूत्रपिंड विकार, हृदयविकार, कर्करोगचा व्याधी आहे, अशा रूग्णांची विशेष काळजी घेतली जाते. अशा व्याधी असणाऱ्या कोरोना बाधितांना सी.पी.आर. आणि डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचार देण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर