शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

CoronaVirus News : कुटुंबनियोजन कार्यक्रमाला बसला कोरोनाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:49 AM

CoronaVirus News in Marathi and Live Updates : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे.

- पोपट पवारकोल्हापूर : कोरोनाचा कुणाला कसा फटका बसला याचे वेगवेगळे किस्से आता बाहेर येत आहेत. उद्योजक, नोकरदार, मजुरांसह सर्वांना आर्थिक फटका बसला असला, तरी सरकारच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमालाही त्याचा ‘जोर का झटका’ बसला आहे. लॉकडाऊन काळात दोन कोटी ५६ लाख जोडप्यांपर्यंत गर्भनिरोधके न पोहोचल्याने या कार्यक्रमाचे लक्ष्य २० टक्क्यांनी मागे राहील. २३ लाख महिलांची इच्छा नसताना गर्भधारणा होईल, आठ लाखांवर असुरक्षित गर्भपात होतील, असा निष्कर्ष दिल्लीतील फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टिव हेल्थ सर्व्हिसेस इंडिया (एफआरएचएस) या संस्थेने काढला आहे.केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे. जर ही स्थिती सप्टेंबरपर्यंत पूर्वपदावर आली नाही तर देशातील अडीच कोटींपेक्षा अधिक दाम्पत्यांपर्यंत गर्भनिरोधके पोहोचणार नाहीत, परिणामी, २३ लाख महिला इच्छा नसताना गर्भवती राहण्याचा अंदाज ‘एफआरएचएस’ने वर्तविला आहे; शिवाय, लॉकडाऊनची स्थिती अशीच राहिली, तर गर्भपात करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध होणार नाही. परिणामी, इच्छा नसताना गर्भ राहिल्याने आठ लाखांपेक्षा अधिक महिला असुरक्षित गर्भपात करून घेतील, अशी भीती आहे.दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी देशात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असली, तरी लॉकडाऊनमुळे सहा लाखांपेक्षा अधिक दाम्पत्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करता येणार नाहीत; शिवाय देशात सध्या कंडोमचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.परिणामी, २३ लाख ९५ हजार महिलांना इच्छेविरोधात गर्भ ठेवावा लागणार आहे. किंवा त्यांची नकळत गर्भधारणा होऊ शकते. यामुळे देशात सहा लाख ७९ हजार ८६४ अतिरिक्त बाळांचा जन्म होणार आहे. यामुळे सरकारने सुरू केलेल्या कुटुंबनियोजन कार्यक्रमालाही ‘खो’ बसणार आहे. गर्भनिरोधक साधनांचा उपयोग न केल्याने १० लाखांपेक्षा अधिक अतिरिक्तगर्भपात होण्याची भीतीही ‘एफआरएचएस’ने व्यक्त केली आहे. यामध्ये आठ लाख ३४ हजार असुरक्षित गर्भपात, तर प्रसूती काळात दीड हजारांपेक्षा अधिक गर्भवतींचा मृत्यू होण्याचा धोका आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर रुग्णालयांवर ताणलॉकडाऊन उठल्यानंतर वा शिथिल झाल्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया आणि गर्भनिरोधक गोळ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ शकते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यास त्यांची ही मागणी पूर्ण करताना आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.लॉकडाऊन काळात गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. इच्छेविरुद्ध गर्भ राहिल्याने पुढील काळात असुरक्षित गर्भपातही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. सरकारी पातळीवरच यासाठी जनजागृती आवश्यक आहे.-डॉ. राजीव चव्हाण,स्त्रीरोगतज्ज्ञ, कोल्हापूर.

टॅग्स :FamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस