शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

CoronaVirus Lockdown : माणुसकीचे दर्शन, शिप्पुरकर धावले मुंबईकरांच्या मदतीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 17:42 IST

गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देगावाकडच्या लोकांनी घडविले माणुसकीचे दर्शन ! शिप्पुरकर धावले मुंबईकरांच्या मदतीला

रवींद्र हिडदूगीनेसरी : गड्या आपुला गाव बरा, अशीच ठायी ठायी आठवण मुंबईत राहणाऱ्या गावाकडच्या लोकांना येईल, अशीच कामगिरी गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर तर्फ नेसरी येथील ग्रामस्थांनी केली आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन झाल्यामुळे सर्वत्र विशेषत: मुंबईतील रहिवाशांवर मोठे संकट ओढवल्यामुळे नेहमी मुंबईहून मदत मागविण्याची पायंडा असताना गावाकडच्या मंडळींनी प्रथमच मुंबईकरांनाच मदत पाठविली आहे. या मदतीचे मुंबईकरांसह इतरांनी कौतुक केले आहे.कोरोना विषाणूचा विळखा मुंबईभोवती असल्याने सध्या मुंबईकडे सारेजणच संशयाने पहात आहेत. आजाऱ्यांशी नव्हे, आजाराशी लढायचे आहे, अशा जाहिरातीमुळे गावोगावच्या लोकांचेही मनोधैर्य वाढत आहे. त्यामुळे गडहिंग्लज तालुक्यातील शिप्पुर येथील ग्रामस्थांनी मुंबईत अडकलेल्या आपल्या परिचयाच्या सुमारे पन्नास कुटुंबीयांसाठी साहित्य जमा करुन आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दाखवून दिले.मुंबईहून गावी परतलेल्या लोकांसाठीही गावच्या बाहेर ग्रामस्थांनी उत्तम व्यवस्था करून त्यांचीही मने जिंकली आहेत. तांदूळ, गहूपीठ, डाळी, चटणी आदी साहित्यासह प्रत्येकाच्या नावाची यादी तयार करून ते मुंबई पाठविले आहे.

यासाठी माजी सरपंच बाबुराव शिखरे, पोलीस पाटील भरमा गुरव, सचिन भालेकर, पांडुरंग गाडे, नामदेव माटले आदींनी पुढाकार घेऊन हे काम तडीस नेले. भैरवनाथ ग्रामस्थ मंडळ, मुंबईचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी दोन्ही वेळा मुंबईहून माल वाहतूकीच्या गाड्या पाठवून मदत केली.मुंबईकरांसाठी गावाकडून आलेली ही मदत माणुसकीचे उत्तम दर्शन देत तर आहेच, परंतु तिरस्काराच्या वातावरणात चांगले उदाहरणही घालून देत आहे. याबद्दल मुंबईकरांनीही ग्रामस्थांचे आभार मानले असून केलेल्या धडपडीबद्दल कौतुक केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई