शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

CoronaVirus Lockdown : गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 17:57 IST

लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी,उत्रे,वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत.

सतीश पाटीलशिरोली : लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी, उत्रे, वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत.कोरोना मुळे संपूर्ण देशभरात गेल्या दिड महिन्या पासुन लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार बंद झाले आहेत. ज्या प्रमाणे सर्वच उद्योग आणि व्यवसायांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे तसाच पश्चिम महाराष्ट्रातील रसवंती व्यवसायाला ही बसला आहे.

उन्हाळ्यात कोल्हापूर,सांगली,सातारा येथे मोठ्या प्रमाणात रसवंती व्यवसाय सुरू असतो. यासाठी हे व्यावसायीक शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात उस खरेदी करत असतात. चालू वर्षी ही मोठ्या प्रमाणात रसवंती व्यवसायीकांनी उस खरेदी करुन शेतकऱ्यांना ऍडव्हान्सही काही प्रमाणात दिला होता.

पण ऐन उन्हाळ्यात कोरोनाचा शिरकाव भारतात झाला आणि खबरदारी म्हणून गेली ४५ दिवसापासून संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. त्यामुळे रसवंतीचा उस शेतातच अडवून पडला. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखरकारखाने बंद झाले होते.गुऱ्हाळघरे ही फेब्रुवारी महिन्यात बंद झाले होते.पण शेतकरीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार.शिल्लक उस गाळपासाठी घेऊन शेतकरी गुऱ्हाळघराच्या मालकांच्याकडे आले पण गुऱ्हाळघरेपुन्हा सुरू करायची म्हणजे मनुष्यबळ लागत तरी ही कमी मनुष्यबळावर जिल्ह्यातील भुयेवाडी, वंदूर, उत्रे, बाचणी येथील गुऱ्हाळघरे सुरू झाली आहेत.सर्वसाधारणपणे गुऱ्हाळघरे सुरू करण्याचा हंगाम आॅक्टोबंर महिन्यात सुरू होतो.हा हंगाम पाच ते सहा महिने चालतो.लॉकडाऊनपुर्वीच भुयेवाडी, निगवे दुमाला परिसरातील गुऱ्हाळघरे बंद झाली आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रसवंतीसाठी ८६०३२ या ऊस लागवड केलेली असते. लॉकडाऊनमुळे गेल्या दिड महिन्यांपासून रसवंती व्यवसाय बंद असल्यामुळे रसवंतीचा ऊस शिल्लक राहिला आहे.

रसवंतीचा धंदा मे महिन्यापुरता राहीला आहे.पण लॉकडाऊन वाढल्याने यंदाचा रसवंतीचा व्यावसाय वाया गेल्याने रसवंतीचा ऊस गाळप करण्याचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.तसेच आडसाली ऊस व नर्सरीसाठी ऊस रोपांसाठी ऊस डोळा काढून घेऊन शिल्लक राहीलेला ऊस ही गाळपासाठी येत आहे.असा प्रत्येक गुऱ्हाळावर ऊस येतो.

भुये, भुयेवाडी, कासारवाडी,तमदलगे,हातकणंगले येथून ऊस उत्पादक शेतकरी स्वतः तोड करून ऊस पोहोच करत आहेत तर नर्सरीतील ऊसाचे तुकडे पोत्यामध्ये भरून तेही गुऱ्हाळ घरावरती पोच केले जात आहेत. त्यामुळे गुऱ्हाळ घरातील आठ ते दहा मजुरा वरची गुऱ्हाळ घरे सुरू आहेत. सध्या कोल्हापूर बाजार समितीत गुळाला ४००० ते ४२०० रुपये इतका दर मिळत आहे. त्यामुळे गुऱ्हाळघर मालकांनी पुन्हा गुर्हाळ घरे सुरू केली आहेत.महिना-दिड महिना गुऱ्हाळघर सुरू राहतीललॉकडाऊन मुळे उस शेतात शिल्लक आहे.पुढील महिना -दिड महिना उस गाळपासाठी येईल, असे गुऱ्हाळ मालकानी सांगितले.गुळाला चांगला दर...गुळ हंगाम संपला आहे पण शिल्लक राहिलेला उस पुन्हा गाळपासाठी येत असुन गुळाला ४००० ते ४५०० इतका प्रति क्लिंटल दर मिळत आहे. 

रसवंती व्यवसाय बंद असल्यामुळे ८६०३२ ऊस शिल्लक राहिला आहे. ऊस उत्पादक शेतकरी संकटात आला आहे.त्यामुळे आम्ही पुन्हा गुऱ्हाळ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रसवंतीचा ऊस,आडसाली ऊस व नर्सरीतील उसाचे तुकडे हा ऊस गुऱ्हाळ घरावर येत आहे.त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत हा गळीत हंगाम सुरू राहील.-सचिन चौगले, गुऱ्हाळघर मालक, भुयेवाडी 

रसवंतीसाठी ८६०३२ जातीचा आडसाली लागण केलेला आणि १२ महीने पुर्ण झालेला ऊस वापरतो. या ऊसासाठी ऊसउत्पादक शेतकऱ्यांना अ‍ॅडव्हान दिलेला असतो.लॉकडाऊनमुळे चालू वर्षी व्यवसाय बंद असल्यामुळे ऊस घेतला नसल्याने अ‍ॅडव्हान बुडाला आहे.तसेच व्यवसाय बंद असल्यामुळे रसवंती गृह चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.सागर पाटील, रसवंती व्यावसायीक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर