शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

स्वच्छता सर्वेक्षणास कागलकर एकवटले गट-तट बाजूला... : नेतेमंडळी, नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक हातात झाडू घेऊन साफ-सफाईसाठी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:22 IST

कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे

जहाँगीर शेख ।कागल : केंद्र सरकारच्यावतीने घेण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ या स्पर्धेसाठी कागल नगरपरिषदेने जय्यत तयारी केली असताना या स्पर्धेचा ‘फिव्हर’ कागलकरांमध्येही संचारला आहे. अनेक दिग्गज्जांसह नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक हातात झाडू घेऊन साफ-सफाईसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र रोज सकाळी प्रत्येक प्रभागात पाहावयास मिळत आहे.

एकूणच कागल देशात अव्वल करण्यासाठी गट-तट, पक्ष-भेद विसरून कागलकर एकवटले आहेत.प्रशासकीय पातळीवर गेले सहा महिने या स्पर्धेची तयारी सुरू आहे. विशेषत: स्वच्छता आरोग्य विभागाचे कर्मचारी यांचे नियोजन करीत आहेत. स्थानिक पातळीवर ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसडर म्हणून आम. हसन मुश्रीफ यांची निवड केली आहे. त्यांनीही या मोहिमेसाठी पुरेसा वेळ दिला आहे. मोबाईल अ‍ॅपसाठी युवकांशी संवाद साधला आहे.

महारॅलीद्वारे संपूर्ण शहरात पदयात्रा काढली आहे. या महारॅलीत भाजपाचे नगरसेवकही सहभागी झाले. शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असणाºया भिंती रंगवून त्यावर संदेश लिहिले आहेत. वेशींना रंगरंगोटी केली आहे, त्यामुळे शहर आकर्षक दिसत आहे. आता प्रत्यक्ष केंद्रीय समिती सर्वेक्षणासाठी येणार असून, पालिकेचे कर्मचारी सकाळ-संध्याकाळ गटर्स, रस्ते सफाई, तसेच कचरा उठाव करीत आहेत. हे पाहून त्यांना सहकार्य म्हणून आता कार्यकर्ते, नेते, नागरिक, युवक मंडळे, स्वत:हून गटर्स, रस्ते साफ-सफाई करीत आहेत. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावयाचा हाच यामागचा निर्धार आहे. म्हणूनच चंद्रकांत गवळी, भय्या मानेपासून नविद मुश्रीफही सफाईसाठी रस्त्यावर दिसत आहेत.कागल नवव्या स्थानावरदेशातील ४०४१ शहरात या स्पर्धा होत आहेत. कागल नगरपालिकेने सांघिक पातळीवर केलेल्या प्रयत्नाने मोबाईल अ‍ॅप विभागात नवव्या स्थानावर झेप घेऊन पैकीच्या पैकी गुण संपादन केले आहेत. मात्र, आता सर्वेक्षणात शहरातील स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, शौचालय व्यवस्थापन, उद्याने, बगीचे, व्यापारी क्षेत्र लाईन, जनसंवाद, आदींची पाहणी करून स्थान निश्चित केले जाणार आहे. म्हणूनच लोकसहभाग महत्त्वाचा ठरत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेत कागल अव्वल स्थानावर आले पाहिजे. यासाठी राजकारण बाजूला ठेवून आम्ही विरोधी पक्षांचे सर्व नगरसेवक सकारात्मक विचाराने या मोहिमेत सहभागी झालो आहोत. आमचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी नेहमीच चांगल्या गोष्टींना पाठिंबा दिला आहे.- विशाल पाटील-मलगेकर, विरोधी पक्ष नेता, नगरपरिषद 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानkolhapurकोल्हापूर