शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी पात्रता तपासणार

By admin | Updated: November 9, 2015 23:22 IST

सातव्या वेतन आयोगातील बदलांची चाहूल : गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

भरत शास्त्री -- बाहुबली--सरकारचे काम चांगले व लोकाभिमुख होण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो. अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वयाची ५०-५५ वर्षे पूर्ण झाली असतील तर शासनाने त्यांची पात्रता-अपात्रता तपासण्यासाठी कंबर कसली आहे. ३० वर्षे सेवा झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करण्यासाठी शासनाने चाचपणी सुरू केली आहे. गृह विभागाने २८ सप्टेंबरला शासनाचे कार्यासीन अधिकारी विजय लिटे यांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक सर्व विभागांना धाडले आहे. यासाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन केली आहे.शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही नियमावली शासनाने ठरविली आहे. त्यामध्ये त्यांची कार्यक्षमता व कामाची सचोटी या बाबी मुख्य आहेत. त्यासाठी १९८६ साली सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पुनर्विलोकनाबाबत व नंतर १९९३ ला धोरण ठरविण्यात आले, पण याकामी शासनाला यश मिळाले नाही. सध्या सरकारने याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ५०-५५ वर्षे किंवा ३० वर्षे सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यांची पात्रता-अपात्रता तपासून कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच सेवेत ठेवण्यात येणार आहे. अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरकारने मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे ठरविले आहे. या निर्णयात केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जोडूनही पाहण्यात येत असल्याचे बोलले जाते. सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्राने ३०-३३ सेवा झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करणार असल्याची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे, पण परिपत्रकाने मात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. सेवाहमी कायदा व नोकरभरतीचा यक्षप्रश्नअशाप्रकारे जर निवृत्ती घेण्यास शासनाने कर्मचाऱ्यांना सक्ती केली, तर सेवाहमी कायद्याची पूर्तता शासन कसे करणार? त्याचबरोबर अकार्यक्षम नोकरदारांना घरी बसवल्यावर नोकरभरतीबाबत शासनाची काय भूमिका असणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.