शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांसाठी पात्रता तपासणार

By admin | Updated: November 9, 2015 23:22 IST

सातव्या वेतन आयोगातील बदलांची चाहूल : गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

भरत शास्त्री -- बाहुबली--सरकारचे काम चांगले व लोकाभिमुख होण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा असतो. अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वयाची ५०-५५ वर्षे पूर्ण झाली असतील तर शासनाने त्यांची पात्रता-अपात्रता तपासण्यासाठी कंबर कसली आहे. ३० वर्षे सेवा झालेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करण्यासाठी शासनाने चाचपणी सुरू केली आहे. गृह विभागाने २८ सप्टेंबरला शासनाचे कार्यासीन अधिकारी विजय लिटे यांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक सर्व विभागांना धाडले आहे. यासाठी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन केली आहे.शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही नियमावली शासनाने ठरविली आहे. त्यामध्ये त्यांची कार्यक्षमता व कामाची सचोटी या बाबी मुख्य आहेत. त्यासाठी १९८६ साली सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पुनर्विलोकनाबाबत व नंतर १९९३ ला धोरण ठरविण्यात आले, पण याकामी शासनाला यश मिळाले नाही. सध्या सरकारने याबाबत कडक धोरण अवलंबले आहे. शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची ५०-५५ वर्षे किंवा ३० वर्षे सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यांची पात्रता-अपात्रता तपासून कार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच सेवेत ठेवण्यात येणार आहे. अकार्यक्षम अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरकारने मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे ठरविले आहे. या निर्णयात केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी जोडूनही पाहण्यात येत असल्याचे बोलले जाते. सातव्या वेतन आयोगामध्ये केंद्राने ३०-३३ सेवा झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त करणार असल्याची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे, पण परिपत्रकाने मात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. सेवाहमी कायदा व नोकरभरतीचा यक्षप्रश्नअशाप्रकारे जर निवृत्ती घेण्यास शासनाने कर्मचाऱ्यांना सक्ती केली, तर सेवाहमी कायद्याची पूर्तता शासन कसे करणार? त्याचबरोबर अकार्यक्षम नोकरदारांना घरी बसवल्यावर नोकरभरतीबाबत शासनाची काय भूमिका असणार, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतात.