शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

चाफोडी तर्फ ऐनघोलला धरणामुळे बेटाचे स्वरूप : काळम्मावाडी धरणामुळे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:51 IST

संजय पारकर।राधानगरी : काळम्मावाडी धरणामुळे अंशत: बाधित वाकिघोल येथील चाफोडी तर्फ ऐनघोल या खेड्यातील उर्वरित लोकांच्या पुनर्वसनाची मागणी तीव्रतेने पुन्हा पुढे आली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामुळे या गावाला येणाऱ्या बेटाच्या स्वरूपामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, पुनर्वसनाची बाब शासन निर्णयाच्या कचाट्यात सापडल्याने स्थानिक यंत्रणेने मंत्रालयस्तरावर निर्णय होण्याची ...

ठळक मुद्देपुनर्वसन शासन निर्णयाच्या कचाट्यात अडकले, दोन्ही विभागांकडून अडचणी

संजय पारकर।राधानगरी : काळम्मावाडी धरणामुळे अंशत: बाधित वाकिघोल येथील चाफोडी तर्फ ऐनघोल या खेड्यातील उर्वरित लोकांच्या पुनर्वसनाची मागणी तीव्रतेने पुन्हा पुढे आली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामुळे या गावाला येणाऱ्या बेटाच्या स्वरूपामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, पुनर्वसनाची बाब शासन निर्णयाच्या कचाट्यात सापडल्याने स्थानिक यंत्रणेने मंत्रालयस्तरावर निर्णय होण्याची गरज असल्याचे सांगून बाजू ढकलून हात वर केले आहेत.

१९७० च्या दशकात उभारणीला सरुवात झालेल्या आसनगाव येथील दुधगंगा प्रकल्पात वाकिघोल येथील अनेक गावे विस्थापित झाली. बहुतेक गावे पूर्ण बाधित झाल्याने त्यांचे पुनर्वसन केले. चाफोडीतील त्यावेळी शंभरावर कुटुंबे होती. गावाच्या १५१ हेक्टर क्षेत्रापैकी ५५ हेक्टर जमीन बुडीत क्षेत्रात आली. ही सर्व जमीन गावाच्या पश्चिम बाजूला असणारी बागायती, पिकाऊ होती. या जागेत घरे असणाºया ४४ कुटुंबांचे त्यावेळी पुनर्वसन झाले. शिवाय या गावापैकी वाडदे या वाडीचे पुनर्वसन झाले. गावातील राहिलेली घरे व जमीन डोंगर भागाकडे असल्याने सुमारे ५० कुटुंबे पुनर्वसनापासून वंचित राहिली. या लोकांची सगळी पिकाऊ जमीन गेली. शासन निर्णयानुसार ७५ टक्के भूभाग बुडीत झाला तरच पुनर्वसन होण्यास पात्र ठरविले जाते. मात्र, येथील डोंगराळ जमीन शिल्लक राहिल्याने या निकषात हे गाव येत नाही. त्यामुळे त्याकाळात तुटपुंजा व नाममात्र दर देऊन त्यांच्या जमिनी शासनाने ताब्यात घेतल्या. लोकांच्या अज्ञानामुळे त्याची तीव्रता त्याकाळी लक्षात आली नाही. तरीही लोकांनी पुनर्वसनाची मागणी कायम ठेवली होती.

१९ जानेवारी १९८७ ला शासनाने हे गाव पुनर्वसनासाठी पात्र नसल्याने हा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे येथील गणपती धोंडिराम तातवडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती; पण येथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. दरम्यान, अभयारण्याचा विस्तार झाल्यावर हा संपूर्ण परिसर त्यात समाविष्ठ झाला. वनविभागाकडून झालेल्या हक्क चौकशीवेळी त्यांनी पुनर्वसनासाठी विचारणा केली होती. मात्र, त्यांच्याकडून याबाबत नेमकेपणा उघड न झाल्याने पाटबंधारेच्या वतीनेच पुनर्वसन व्हावे, अशी भूमिका घेऊन वनविभागाचा प्रस्ताव नाकारला होता. दोन वर्षांपूर्वी पुन्हा या लोकांनी महसूल विभागाकडे पुनर्वसनाची मागणी केली होती.

काही दिवसांपूर्वी प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी या गावाला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शासनाच्या पूर्वीच्या निकषात या गावाचे पुनर्वसन करता येत नाही. शासनस्तरावर निकषांत बदल झाला तरच याबाबत विचार होऊ शकतो, असे स्पष्ट केले व वनविभागालाया गावाच्या पुनर्वसनाबाबत कार्यवाही करण्याचे कळविले. मात्र, वनविभागाला पूर्वी नकार दिल्याने तेथेही अडचण निर्माण झाली आहे.लोकांची मोठी गैरसोयसद्य:स्थितीत धरण पूर्ण भरले की गावाला पाण्याचा वेढा पडतो, तर दुसºया बाजूला अभयारण्य हद्द असल्याने कोंडी होते. वन्यजीव विभागाच्या संवेदनशील भागात हा परिसर येत असल्याने त्यांचे अनेक निर्बंध लागू आहेत. रस्ते, पाणी योजना, विजेचे खांब उभारणी, विहीर खोदाई, नवीन बांधकाम यासाठी अडचणी निर्माण होतात. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. 

एका बाजूला धरणाचे पाणी व दुसºया बाजूला जंगल यामुळे पावसाळ्यात बेटावर राहत असल्यासारखे वाटते. दुर्गम परिसरामुळे अनेक अडचणी येतात. बागायत जमिनी शिल्लक नाहीत. डोंगर भागात केलेली पिके वन्यप्राणी शिल्लक ठेवत नाहीत. सध्या शंभरावर कुटुंबे व ६०० लोकवस्ती आहे.पुनर्वसन झाले नाही तर पुढील पिढीचे भविष्य उद्ध्वस्त होणार आहे.-गणपती धोंडिराम तातवडे, जेष्ठ नागरिक चाफोडी.