शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

आरोपांच्या फैरी झडू लागल्या

By admin | Updated: July 17, 2015 23:02 IST

शिरोळ तालुका : ९४१ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती

संदीप बावचे- शिरोळ  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ७४ जागा बिनविरोध झाल्या असून, आता ३२ ग्रामपंचायतींसाठी लढत होणार आहे. एकूण ग्रामपंचायत सदस्यांच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे. दरम्यान, बुहतांशी ठिकाणी सत्ताधारी व विरोधी गटाकडून प्रचाराचा नारळ फुटला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्याने गावातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी बुबनाळ ग्रामस्थांनी इतिहास घडविताना संपूर्ण अकरा जागांवरती महिलांना बिनविरोध निवडून आणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे, तर कोथळी, शिरढोण, शेडशाळ, जुने दानवाड व मजरेवाडी येथे बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या. मात्र, संपूर्ण जागा बिनविरोध करण्यात नेत्यांना अपयश आले. काही गावांत निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या त्याठिकाणी अर्ज माघारीसाठी गट नेत्यांना विनवणी करावी लागली. गावातील इतर संस्थांवर संधी देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच काही उमेदवारांनी यासाठी आर्थिक उलाढालही घडवून आणली. तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. तालुक्यात राजकीय गट-तट मोठ्या संख्येने असला, तरी काही गटांनी व उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार तडजोडी घडवून आणल्या. काही गावांत सत्तेसाठी जातीचाही आधार घेतला जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर विजयासाठी सत्ताधारी व विरोधी गटांकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. विविध आघाड्यांकडून प्रचाराचा नारळ फोडला जात असून, एकमेकांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने गावातील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. एकेका मतासाठी आतापासूनच व्यूहरचना आखली जात असून, नातीगोती आणि पै-पाहुण्यांचाही आवश्यकतेनुसार उपयोग करून घेतला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या यशावरच विविध पक्षांच्या नेत्यांची ताकद समजणार असल्याने सर्वच नेतेमंडळींकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना केली जात आहे. विधानसभेचे पडसाद उमटणारविधानसभा निवडणुकीतील पडसाद काही गावांत हमखास उमटणार आहेत. गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात जातीय समीकरणाने पुन्हा जोर धरला आहे. पक्षापेक्षा गटा-तटांच्या निवडणुका होत असल्या, तरी विधानसभा निवडणुकीत पेरलेले राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत उगवणार, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.