शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

Char Dham Yatra: ‘उत्तराखंड’मध्ये अडकले कोल्हापूरचे भाविक, नव्या यात्रेकरूंची नोंदणी रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 2:04 PM

एरवी हरिद्वारहून ऋषिकेशला जाण्यासाठी दीड तास पुरत असे. परंतु आता ५ ते ६ तास लागत आहेत.

कोल्हापूर : ‘उत्तराखंड’मधील चारधाम यात्रेसाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्यामुळे या परिसरातील नियोजन कोलमडले आहे. अनेक हॉटेल्सचालकांनी खोल्यांचे दर मोठ्या प्रमाणावर वाढवले आहेत. रस्त्यावर भाविकच भाविक असल्याने गर्दी पुढेच सरकत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून मे महिनाअखेरीपर्यंतची नवी नोंदणी बंद करण्यात आली आहे. कोल्हापुरातून या यात्रेसाठी गेलेल्या पर्यटकांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली. एरवी हरिद्वारहून ऋषिकेशला जाण्यासाठी दीड तास पुरत असे. परंतु आता ५ ते ६ तास लागत आहेत.

उत्तराखंडमधील बद्रीनाथ, केदारनाथ, यमनोत्री आणि गंगोत्रीला जाऊन चारधाम यात्रा करणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडच्या पर्यटन विभागाच्या वतीने ऑनलाईन तसेच हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी नोंदणीही करण्यात येते. ६ मेपासून या यात्रांना सुरुवात झाली. चारधामसाठी जाण्यासाठी नोंदणी आवश्यक असल्याने नागरिक प्रतीक्षेत आहेत.

अनेक भाविक अडकलेथेट हरिद्वार किंवा ऋषिकेश येथे जाऊन नोंदणी करण्यासाठी हजारो भाविक आले आहेत. परंतु वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यटन विभागाने आता चारधामसाठीची नोंदणी बंद केली आहे. २७ मेपर्यंतची नोंदणी बंद केल्याने आता तोपर्यंत या भाविकांना या दोन शहरांमध्येच मुक्काम करावा लागणार आहे किंवा परत जावे लागणार आहे.

एका खोलीसाठी १० हजार रुपयेकेदारनाथ येथे राहण्यासाठी मोठ्या सुविधा नाहीत. त्या मर्यादित आहेत आणि भाविकांची संख्या मात्र वाढली आहे. त्यामुळे एक रात्र राहण्यासाठी एका खोलीला १० हजार रुपयांचा दर सांगितला जात आहे आणि भाविक पर्याय नसल्याने तो स्वीकारत आहेत. केदारनाथ येथे दर्शनाची रांग तीन किलोमीटरपर्यंत गेल्याचे सांगण्यात आले.सन          केदारनाथ दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या२०१९       ९ लाख २६ हजार२०२०       २ लाख २० हजार२०२१       २ लाख ४२ हजार२०२२       १ लाख ३२ हजार (७ दिवसात)

कोरोना संपल्याने मोठ्या संख्येने भाविक चारधाम यात्रेसाठी येत आहेत. परंतु नोंदणी बंद केली आहे. नोंदणी बंद करताना थेट आलेल्या भाविकांचे काय करायचे, याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. - रवी सरदार, अध्यक्ष, टुर ऑपरेटर्स असोसिएशन

टॅग्स :kolhapurकोल्हापूर