शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

कोल्हापूरसाठी काय केले, बिंदू चौकात सामना होऊ दे; चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटलांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 11:37 IST

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता त्याची तुम्ही पावती फाडली, परंतु ...

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता त्याची तुम्ही पावती फाडली, परंतु भाजपने ४७३ कोटी रुपये भरून टोल घालवला. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरसाठी काय केले आणि आम्ही काय केले याचा जाहीर सामना बिंदू चौकात होऊन जाऊ देे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.

‘कोल्हापूर उत्तर’चे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत कदम यांनी अर्ज दाखल केला.

पाटील म्हणाले, २०१९ ला महापूर आला असताना तातडीने सर्व घटकांसाठी मदत देण्याचा आदेश काढला. वेळ जायला नको म्हणून रोख रक्कम दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तर महाविकास आघाडीत असूनही राजू शेट्टी यांच्यावर आंदोलनाची वेळ आली. विमानतळासाठी केंद्र सरकारने २७३ कोटी देण्याआधी राज्य शासनाचे ८० कोटी रुपये आम्ही दिले. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी आम्ही निधी दिला. परंतु तुम्हाला तो राबवता आला नाही. थेट पाईपलाईनचे पाणी आले नाही तर निवडणूक लढवीत नाही म्हणाला हाेता. परंतू अजून पाण्याचा पत्ता नाही.

धनंजय महाडिक म्हणाले, यांना केवळ सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात हवीत. विकास कामांची चर्चा नको आहे. शिवसेनेची अवस्था तर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. कोल्हापूरचा भगवा आता आमचा पेटंट आहे. काही जणांना पोलिसांकडून त्रास देणे सुरू आहे. परंतु मोदींनी राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून भाजपचा झेंडा फडकवा.

सुरेश हाळवणकर म्हणाले, कोणाची मस्ती कशी उतरवायची, हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे. बंटी पाटील यांच्या अहंकाराविरोधात, हुकूमशाहीविरोधातील ही निवडणूक आहे. यावेळी सत्यजित कदम, जयंत पाटील, शहाजी कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, विजय सूर्यवंशी, राहुल आवाडे, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे, सुनील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजावर अन्याय

समरजित घाटगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या त्या देणेही सध्या महाविकास आघाडीला जमलेले नसल्याने, राज्यातील मोठ्या समाजावर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. मंत्र्यांच्या गाड्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी निधी आहे. मात्र आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांचे व्याज देण्यासाठी निधी नाही. माझे वडील विक्रमसिंह घाटगे हे २०१४ मध्ये सत्यजित कदम यांच्या प्रचारात होते. त्यांचे अर्धे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

...तर अडवून चिंध्या करू

प्रकाश आवाडे म्हणाले, काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द केल्यानंतर मी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले म्हणून माझ्याकडे विचारणा झाली, तेव्हा मी पक्षच सोडला. कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. हा जिल्हा कुणाची बटिक नाही. संपत्तीच्या आणि सत्तेच्या जोरावर जर कोणी मागून फरफटत न्यायचा प्रयत्न केला तर अडवून चिंध्या केल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटील