शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:45 IST

pruthwirajpchavan, congressrally, kolhapurnews घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा केंद्राचा प्रयत्न. पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅली

कोल्हापूर : घाम गाळून पिकविलेल्या हक्काच्या शेतजमिनी तसेच उत्पादित शेतीमाल अंबानी, अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या घशात घालून शेतकऱ्यांना गुलाम बनिवण्याचा डाव केंद्रातील मोदी सरकारने आखला असल्याचा घणाघाती आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी येथे बोलताना केला. केंद्र सरकारच्या या कुटिल प्रयत्नाविरोधात शेतकरी, कामगार यांनी पेटून उठण्याची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली.प्रदेश कॉंग्रेस समितीच्यावतीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीला चव्हाण मार्गदर्शन करत होते. राज्यभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते या रॅलीत ऑनलाईन सहभागी झाले. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते संगमनेर, औरंगाबाद, नंदूरबार, नागपूर, कोल्हापूर, पालघर, अमरावती, ग्वाल्हेर येथून सहभागी झाले.कॉंग्रेस सरकारच्या काळात देशभरात शेतीमालाला किमान हमीभाव, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्नसुरक्षा अशी मोठी यंत्रणा उभी करण्यात आली, परंतु मोदी सरकारने ती उद्‌ध्वस्त करून शेतकऱ्यांचे वाटोळे केले. असा आरोपही चव्हाण यांनी केला. मोदींनी शेती उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले, पण किती उत्पन्न वाढविले सांगायला तयार नाहीत.

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊ म्हणून सांगितले, पण सत्तेत येताच असा भाव देऊ शकत नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे लिहून देऊन शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. असे ते म्हणाले. शेतकरी, कामगार विरोधी कायदे मागे घेण्यासाठी व्यापक आंदोलन उभे केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.विकासाऐवजी विकण्याचे कामसत्तेवर येताना विकास करण्याचे आश्वासन दिले, पण सत्तेवर येताच विकासमधील ह्यसह्ण काढून टाकला आणि सहकार, शेती, बँका विकण्याचे काम मोदी सरकार करत असल्याचा आरोप गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला. कॉंग्रेसने देशातील पन्नास कोटी शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे काम केले, पण मोदी यांनी काळे कायदे करून एका रात्रीत रस्त्यावर आणले, असे पाटील म्हणाले.राज्यातील महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची माहिती राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली. शेती आणि शेतकऱ्यास वाचविण्याचे कॉंग्रेसने केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, समन्वय देवीदास भन्साळी उपस्थित होते.

 

टॅग्स :congressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर